विश्वाचे आर्त

शिष्याच्या राजयोगातूनच गुरुंची संजीवन समाधी ii

ऐसी वैराग्याची अंगी । बाणूनिया वज्रांगी ।
राजयोग तुरंगी । आरुढला ।। १०४७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा

ओवीचा अर्थ – याप्रमाणे वैराग्याचे चिलखत अंगात निटनेटके घालून राजयोगरूपी घोड्यावर स्वार झाला.

गुरुंच्या नित्य बोधाने साधक हळूहळू अध्यात्माच्या पायऱ्या चढत असतो. सद्गुरूंच्या कृपेने त्याला तो राजयोग जागा करत असतो. या प्रवासात साधक बऱ्याचदा भरकटतो, थकतो. यातून त्याला काम, क्रोध, वासनेचे विकारही नित्य त्रास देत राहातात. पण सद्गुरुंच्या बोधामृती चिलखताने साधकाचे नित्य संरक्षण होत असते. सद्गुरू हे बोधामृती ज्ञान देऊन त्याला नित्य जागे करत असतात. मग पुन्हा तो साधक पायऱ्या चढण्यासाठी उत्साही होतो. अंतिम ध्येय गाठल्यावर प्राप्त होणारा राजयोग, शाश्वत सुख त्या साधकाला प्रेरित करत राहाते. सद्गुरु साधकाला या नित्य सुखाची अनुभुती देऊन त्याची प्रगती साधत असतात.

सद्गुरु समाधीस्त झाले तरी ते साधकाला नित्य बोध देत असतात. म्हणूनच गुरू-शिष्य परंपरेतील या संताची समाधी ही संजिवन समाधी असे म्हटले जाते. या नित्य बोधानेच साधक ही पंरपरा पुढे नेण्यासाठी समर्थ होत असतो. ज्ञानेश्वरांनी बाराव्या शतकात समाधी घेतली. त्यानंतर पंधराव्या शतकात देवनाथ महाराज यांनी आळंदीत साधना करून गुरु-शिष्य परंपरेची एक नवी शाखा पुढे सुरु केली. या शाखेत देगलुरकर, औसेकर, तिकोटेकर, रुकडीकर, सांगवडेकर, पावसचे स्वरुपानंद असे अनेक संत झाले. देवनाथांना बोधातूनच ज्ञानेश्वरांचा अनुग्रह झाला. अशा अनेक घटनांमुळेच ज्ञानेश्वरांची समाधी ही संजिवन समाधी असे म्हटले जाते.

संत समाधीस्त झाले तरी त्यांच्यातून बोधामृताचा नित्य झरा ओसंडून वाहात असतो. साधकाने या बोधामृताच्या नित्य झऱ्याचा आस्वाद घ्यायला हवा. या बोधामृतामुळे साधक सावध होऊन नित्य साधनेने अंतिम ध्येय गाठण्यासाठी समर्थ होत असतो. प्रवासात येणारे काम, क्रोध, वासनेचे अडथळे बोधामुळे दूर होत असतात. विकारात न अडकता साधक पुन्हा जोमाने प्रवासाला लागत असतो. सद्गुरूच्या भक्तीने मग तो सद्गुरुपदी आरूढ होऊन सेवेतून समाधीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो.

बाळ रडत असेल तर आई त्याला गप्प करण्यासाठी त्याचे मन इतरत्र वळवत असते. नित्य आपण त्याच्या सहवासात असल्याचा बोध ती बाळकाला देत असते. त्यामुळे ते बाळ आई नसली तरी रडत नाही. ते त्याच्या आनंदात बागडत राहाते. आई दूर गेली तरी त्याला ती नित्य आपल्या सहवाासात असल्याचा बोध होतो. सद्गुरु सुद्धा असेच आईसारखे असतात. ते दूर गेले तरी ते नित्य साधकाला बोधामृत पाजून जवळ असल्याची अनुभुती देत असतात. या बोधामृतानेच शिष्याची प्रगती ते साधत असतात. शिष्याला राजयोग रुपी घोड्यावर बसवून पराक्रम करण्यासाठी ते प्रोत्साहित करत असतात. शिष्याची ही प्रगतीच त्यांची समाधी संजिवन करत असते. शिष्याच्या प्रगतीमध्येत त्यांच्या संजिवन समाधीचे सुख दडलेले असते.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

सहाय्यक प्राध्यापक भरती पारदर्शक की पुन्हा ‘व्यक्तीनिष्ठ’? ५,००० हून अधिक पदांच्या प्रक्रियेवर संभ्रम का?

महाराष्ट्रातील उच्च शिक्षण क्षेत्रातील हजारो इच्छुक उमेदवारांसाठी सहाय्यक प्राध्यापक भरतीची प्रक्रिया ही आशेचा किरण ठरली…

5 hours ago

स्वतःच्या डोळ्यांनी ‘अजत्व’ कसे पाहता येते? ज्ञानेश्वरीतील गूढ संदेश काय?

ज्ञानेश्वरीतील ही ओवी साधकाला बाह्य जगाच्या धावपळीपासून अंतर्मुख शांततेकडे घेऊन जाते. ‘तैसे राहोनि ठायठिके’ म्हणताना…

7 hours ago

पुण्याच्या भूमीतून डिजिटल विश्वाला नवी दिशा ! BRICS ICT Track 2026 In Pune

पुण्याचे डिजिटल शिखर १७ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत पुण्यात पार पडलेली 'ब्रिक्स आयसीटी…

16 hours ago

विचारांची मशाल घेऊन अंधाराशी लढलेला लोकशिक्षक : डॉ. नरेंद्र दाभोळकर

चमत्कारांच्या नावाखाली होणारी फसवणूक, अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेला समाज, जात-धर्माच्या भिंती आणि प्रश्न विचारण्यालाच लागलेली भीती—या…

1 day ago

श्रीगुरूंचा महिमा जाणण्याचे साधन कोणते ? Guru Mahima: The Power of Surrender in Dnyaneshwari

गुरूंचा महिमा शब्दांत कितीही सांगितला, तरी तो पूर्णपणे व्यक्त होऊ शकत नाही. कारण गुरू हे…

2 days ago