Jagar Sahitya Puraskar 2026: Marathwada Sahitya Parishad Tuljapur Invites Marathi Literary Works
तुळजापूर : मराठवाडा साहित्य परिषद, शाखा तुळजापूर यांच्या वतीने ‘जागर साहित्य पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. लेखक, कवी आणि प्रकाशकांनी आपल्या साहित्यकृती पुरस्कारासाठी पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्वातंत्र्यसैनिक रामचंद्र खंडेराव कुलकर्णी तसेच शिक्षणमहर्षी गुरुवर्य रा. गे. शिंदे गुरुजी यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जाणार आहे. प्रत्येक पुरस्काराचे स्वरूप रोख रुपये ३,०००, सन्मानचिन्ह आणि गौरव असे आहे. पुरस्कार दोन विभागांत प्रदान करण्यात येणार आहेत. पद्य विभागात स्वातंत्र्यसैनिक रामचंद्र खंडेराव कुलकर्णी स्मरणार्थ काव्यसंग्रह (कवितेच्या सर्व प्रकारांचा समावेश) या साहित्यप्रकारातील एका उत्कृष्ट साहित्यकृतीची निवड केली जाईल. तर गद्य विभागात शिक्षणमहर्षी गुरुवर्य रा. गे. शिंदे गुरुजी स्मरणार्थ कादंबरी, कथासंग्रह, ललित लेखन आदी गद्य साहित्यप्रकारांतील एका साहित्यकृतीचा गौरव करण्यात येणार आहे.
पुरस्कारासाठी १ जुलै २०२५ ते ३० जून २०२६ या कालावधीत प्रकाशित झालेल्या साहित्यकृती पात्र राहतील. इच्छुक लेखक, कवी आणि प्रकाशकांनी संबंधित साहित्यकृतीच्या दोन प्रती, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि अल्पपरिचय यांसह अर्ज १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत मराठवाडा साहित्य परिषद, शाखा तुळजापूर यांच्याकडे पाठवावेत.
या पुरस्कारामुळे मराठी साहित्याला प्रोत्साहन मिळण्यासह नवोदित व गुणवंत साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठवण्याचा पत्ता :
विजय प्रकाशराव देशमुख,
कार्यवाह, मराठवाडा साहित्य परिषद,
जुन्या कन्या शाळेसमोर, साळुंके गल्ली,
तुळजापूर, जि. धाराशिव ४१३६०१
संपर्क क्र. 9518944846
स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी भाग - ६ एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या प्रवासातील तेंगबोचेकडे जाणारा टप्पा म्हणजे हिमालयाच्या…
सहारा म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते अंतहीन वाळूचं साम्राज्य. पण याच वाळवंटाच्या मध्यभागी हिरवाईने…
"योग्य वेळ" येण्याची वाट पाहत आयुष्य पुढे ढकलणाऱ्या प्रत्येक माणसासाठी ज्ञानेश्वर माऊलींची ही ओवी जागृतीचा…
तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…
स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…
आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…