आपण समजतो अभिनेत्यांना फारसे काही काम नसते. पण काही अभिनेते इतके व्यस्त असतात की त्यांना त्यांच्या कामातून वेळ काढणेही जमत नाही. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत काम करत असलेला अभिनेता आनंद काळे याचेही सध्या असेच झाले आहे. त्याला बाईक राईडचा छंद आहे हे तर सर्वांनाच माहीत आहे. या छंदासाठी त्याला वेळ देता येत नाहीये. पण यातूनही वेळ काढून त्याने काश्मीर- लेह – लडाख या २२ दिवसांच्या ७००० किलोमीटरच्या बाईक राईडमध्ये सहभागी घेतला. पण काम काही त्याची पाठ सोडत नाही. एकीकडे छंद आणि दुसरीकडे काम हे दोन्हीही सांभाळताना त्याला मोठी कसरत करावी लागत आहे.

त्याचे झाले असे वेबसीरिजच्या चित्रिकरणाच्या तारख्या पुढे गेल्या म्हणून आनंदने बाईक राईडचा प्लॅन केला. २ जुलैला राईड सुरू झाली. पण चित्रिकरणाच्या तारखांचा मेळ घालताना त्याची मोठी कसरत झाली. ३० जून रात्रीपर्यंत त्याचे चित्रिकरण सुरु होते. तरीही त्याने रात्री ड्राईव्ह करून पहाटे ४.३० पर्यंत कोल्हापूर गाठले. सर्वकाही आवरण्यासाठी त्याला फक्त एक दिवसाचा कालावधी मिळाला. सर्व पॅकिंग करून, नींजाच सर्व्हिसिंग, टायर बदलणे, तसेच कोल्हापूरमधील त्याच्या बिझनेसची काम हे सर्व उरकून २ जुलैला पहाटे ३.३० ला त्याने राईड स्टार्ट केली. ९५० किलोमीटरवरील गुजरातमधील हलोल या ठिकाणी आनंदने “DETOUR” ग्रुप ला गाठलं…

कोल्हापूर, मुंबई, चंदिगढ, श्रीनगर, सोनामार्ग असा प्रवास करून तो तूर्तुकला पोहोचला. तिकडे मोबाईलला नेटवर्क नसल्याने त्याचा कोणीशीही संपर्क होत नव्हता. अशातच “माझी तुझी रेशीमगाठ” मध्ये काही सिन आल्यामुळे प्रोडक्शन हाऊसने आनंदला संपर्क करण्याचा प्रयत्न केला.. शेवटी ११ तारखेला संध्याकाळी प्रोडक्शन हाऊस आनंदशी संपर्क करण्यात यशस्वी झाले आणि १३ तारखेला चित्रिकरण असल्याचं आनंदला सांगण्यात आले. त्यावेळी आनंद पाकिस्तान बॉर्डरवरील थांग नावाच्या गावात होता. १३ ला सकाळी मुंबईत चित्रिकरण होते. तेथून आनंदने थांग, तुर्तुक, हुंडर, परत एकदा खरदुंगलापास करून लेह असा ११ तासाचा प्रवास करून विमान पकडले. लेह ते दिल्ली आणि दिल्ली ते मुंबई असा विमानप्रवास करून तो १३ तारखेला सेट वर पोहोचला.

अति उंच (High altitude)तसेच कमी ऑक्सिजनच्या ठिकाणावरून मुंबई आणि चित्रिकरण संपवून पुन्हा लगेच परत लेह एकदम ओकेमध्ये. लेहमध्ये आनंदने निंजा १००० पार्क केली होती. ती घेऊन तो परत राईडच्या ग्रुपमध्ये सहभागी झाला. बऱ्याच जणांकडून आनंदला विचारणा होत होती की २२ दिवस कसे सीरियल सोडून जाऊ शकतोस. त्या सगळ्यांसाठी आनंदने SHOW MUST GO ON…असे म्हणत धक्का दिला आहे.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

तुळजापूर येथील जागर साहित्य पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन Call for Jagar Literary Award In Tuljapur

तुळजापूर : मराठवाडा साहित्य परिषद, शाखा तुळजापूर यांच्या वतीने 'जागर साहित्य पुरस्कार' जाहीर करण्यात आला…

21 hours ago

तेंगबोचेची खडतर अन् रम्य वाट.. The difficult and beautiful path to Tengboche

स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी भाग - ६ एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या प्रवासातील तेंगबोचेकडे जाणारा टप्पा म्हणजे हिमालयाच्या…

1 day ago

ओअँसिसचा हिरवा श्वास अन् सहाराच्या वादळाचा काळा कहर The green breath of the oasis

सहारा म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते अंतहीन वाळूचं साम्राज्य. पण याच वाळवंटाच्या मध्यभागी हिरवाईने…

2 days ago

क्षणाचाही विलंब नको : ज्ञानेश्वरीतील संन्यासयुक्तीचा सहज, सोपा आणि जीवनाला दिशा देणारा संदेश A message that gives direction to life

"योग्य वेळ" येण्याची वाट पाहत आयुष्य पुढे ढकलणाऱ्या प्रत्येक माणसासाठी ज्ञानेश्वर माऊलींची ही ओवी जागृतीचा…

2 days ago

माझं भारतीयत्व : तिरंग्याचे रंग My Indiannessः Urmila Chakurkar

तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…

4 days ago

अयोध्येतील दानपेटी प्रकरण : श्रद्धा, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची कसोटी Ram Mandir Donation Box Case

स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…

4 days ago