स्पर्धा परीक्षा, शिक्षण

श्रीराम पचिंद्रे यांच्या कादंबरीतील पाठ मध्य प्रदेशच्या शालेय अभ्यासक्रमात

कोल्हापूर: श्रीराम पचिंद्रे यांच्या ‘शाहू’ ह्या कादंबरीतील एका प्रकरणाचा मध्य प्रदेश सरकारच्या शालेय अभ्यासक्रमात समावेश केला आहे. मध्य प्रदेशच्या शालेय अभ्यासक्रमांची पुनर्रचना केली आहे. मराठी माध्यमाच्या ‘प्रथम भारती’ ह्या मराठीच्या इयत्ता सातवीच्या पुस्तकासाठी ह्या पाठाची निवड केलेली आहे.

पचिंद्रे यांच्या ‘शाहू’ कादंबरीच्या मराठी आणि इंग्रजी अनुवादाच्या नऊ -नऊ आवृत्त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. याच कादंबरीतील पाठ बालभारतीच्या शालेय अभ्यासक्रमात इयत्ता पाचवीच्या पुस्तकात यापूर्वीच समावेश करण्यात आलेला आहे.

‘शाहू’ ही श्रीराम ग. पचिंद्रे यांनी राजर्षी शाहू महाराजांवर लिहिलेली पहिली आणि एकमेव कादंबरी आहे. ती प्रथम २००४ मध्ये विदर्भ सत्यशोधक मंडळातर्फे प्रकाशित झाली. त्यानंतर पुण्यातील प्रकाशकांकडून पुढील काही आवृत्त्या प्रकाशित झाल्या. सातवी आणि आठवी आवृत्ती कोल्हापूरच्या अक्षरदालन या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केली. दरम्यान माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांनी या कादंबरीचा इंग्रजीत अनुवाद केला. इंग्लिश अनुवादाच्या देखील आठ आवृत्त्या प्रकाशित झाल्या. गोव्याच्या बुक वे या प्रकाशन संस्थेने इंग्लिश अनुवादाची पहिली आवृत्ती प्रकाशित केली आणि त्यानंतरच्या इंग्लिश अनुवादाच्या सर्व आवृत्त्या कोल्हापूरच्या वृषाली प्रकाशनाने प्रकाशित केल्या.

शाहू कादंबरीवर चार विद्यार्थ्यांनी एम. फील. केलेली आहे. महाराष्ट्र पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या अभ्यासक्रमात बालभारती ह्या मराठीच्या पुस्तकात पाचव्या इयत्तेमध्ये शाहू कादंबरीतील पाठ समाविष्ट करण्यात आला. गेल्या काही वर्षात लाखो विद्यार्थ्यांनी या पाठाचा अभ्यास केला. आता हा पाठ मध्य प्रदेश सरकारच्या ‘प्रथम भारती’च्या इयत्ता सातवीच्या पुस्तकात समाविष्ट होत आहे.

‘शाहू’ या कादंबरी विषयी प्रख्यात साहित्यिक गंगाधर गाडगीळ म्हणतात, “शाहू कादंबरीत राजर्षी शाहू महाराजांचं प्रभावी बहुरंगी व्यक्तिमत्त्व परिणामकारकपणे व्यक्त झालेलं आहे. एक राजा म्हणून त्यांनी केलेल्या बहुविध कार्याचचं दर्शन श्रीराम पचिंद्रे यांनी घडवलं आहे. हा राजा किती साधा होता, अगदी कुष्ठरोग्यांपासून आपल्या सर्व प्रजाजनांची कशी काळजी घेत असे, त्याची हृद्य नोंद पचिंद्रे यांनी केलेली आहे. शाहू महाराज हा कादंबरीला अगदी योग्य विषय आहे आणि श्री. पचिंद्रे यांनी त्याला न्याय दिलेला आहे. ही कादंबरी लिहून मराठी साहित्यातील एक त्रुटी त्यांनी समर्थपणे भरून काढली आहे.”

महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ नेते आणि सुजाण वाचक, माजी केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणतात, “अतिशय सुरेख अशी ही कादंबरी आहे शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा वारसा चालवणारे शाहू महाराज समताग्रणी होते. ही कादंबरी वाचताना पुढे काय अशी उत्सुकता वाटत राहाते. पचिंद्रे यांची ओघवती भाषा, शब्दांची मांडणी वाचनीय आहे. साध्या, सरळ आणि सोप्या शैलीतील ही कादंबरी मनाला तर सुखावतेच, पण विचार करायला लावते. राजा कसा असावा ? प्रजेबद्दलची त्याची कर्तव्य काय ? त्याचे रोजचे व्यवहार कसे चालतात इत्यादी अनेक प्रश्न मनात उद्भवतात. ‘शाहू’ या कादंबरीमध्ये त्याची उत्तरे मिळतात.”

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी
Tags: academic curriculumacademic newsBalbharatibiography novelbook editionsClass 7 Marathicurriculum changeeducation newseducation reformEnglish translationhistory educationIndian education systemIndian historyIndian literatureIndian schoolsIndian writersIye Marathichiye Nagariknowledgelanguage learningliterary recognitionliterature importanceliterature in syllabusMadhya Pradesh syllabusMaharashtra educationMarathi authorMarathi BooksMarathi textbooknovel inclusionPratham BhartiRajarshi Shahu MaharajRegional Literatureschool curriculum Indiaschool educationShahu novelshriram pachindreSocial Reformerstudent learningstudent study materialtextbook boardtextbook updatetranslation workअकादमिक बातमीअभ्यासक्रमअभ्यासक्रम बदलइंग्रजी अनुवादइतिहास शिक्षणइयत्ता सातवीइये मराठीचिये नगरीकादंबरी समावेशज्ञानपुस्तक अभ्यासपुस्तक आवृत्तीप्रथम भारतीप्रादेशिक साहित्यबालभारतीभारतीय इतिहासभारतीय साहित्यभाषा शिक्षणमध्य प्रदेश अभ्यासक्रममराठी पाठ्यपुस्तकमराठी पुस्तकेमराठी लेखकमहाराष्ट्र शिक्षणराजर्षी शाहू महाराजवाचन संस्कृतीविद्यार्थी अभ्यासविद्यार्थी सामग्रीशालेय अभ्यासक्रमशालेय शिक्षणशाहू कादंबरीशिक्षण क्षेत्रशिक्षण बातमीशिक्षण सुधारणाशैक्षणिक विकासश्रीराम पचिंद्रेसामाजिक सुधारकसाहित्य महत्त्वसाहित्यिक योगदान

Recent Posts

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

2 hours ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

3 hours ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

12 hours ago

Weather Forecast : १७ ऑगस्टपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर…

12 hours ago

फिदेलसोबत १०० वर्षे : अमेरिकन दादागिरीसमोर न झुकलेल्या क्रांतिकारकाची कहाणी

फिदेल कास्त्रो यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अखिल भारतीय किसान सभेकडून अभिवादन नवी दिल्ली :क्यूबाच्या क्रांतीचे कमांडर-इन-चीफ, जननेते…

1 day ago

कोल्हापूरच्या युवा दिग्दर्शकाच्या ‘अनघा’ला जम्मू फिल्म फेस्टिव्हलची पसंती

https://youtu.be/xcTeVoV7ItY कोल्हापूर येथील युवा चित्रकार व दिग्दर्शक स्वप्निल बळवंत पाटील यांनी दिग्दर्शित केलेल्या “अनघा” या…

1 day ago