State Level Mahamrutyunjay Literary Award 2026 Announced in Gadchiroli
गडचिरोली – येथील नाट्यश्री साहित्य कला मंच या संस्थेतर्फे राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय स्पर्धा -२०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. नाट्यश्री तर्फे साहित्यिकांच्या साहित्यकृतींना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आलेला असून गेल्या दोन वर्षात अनुक्रमे ३६ व ३३ साहित्यिकांना तसेच १९ साहित्यिकांना उत्तेजनार्थ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
या “राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय पुरस्कार- २०२६” साठी १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रकाशित झालेले मराठी भाषेतील साहित्य स्विकारले जाईल. तरी कादंबरी, कथासंग्रह, कवितासंग्रह/ गझलसंग्रह, समीक्षा किंवा संपादन, नाटक/एकांकिका, किंवा नाट्यविषयक ग्रंथ, आत्मकथन किंवा चरित्रग्रंथ, ललीत/ वैचारिक लेखसंग्रह/ प्रवासवर्णन, व बाल /कुमार साहित्य व संकिर्ण या वाङ्मय प्रकारातील प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
रोख रक्कम, आकर्षक सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून इच्छुक साहित्यिकांनी आपल्या साहित्यकृतीच्या २ प्रती व अल्पपरिचय, केवळ पोस्टानेच चुडाराम बल्हारपुरे (नाटककार), महामृत्युंजय निवास, वार्ड क्रं. १७, राधे बिल्डिंगच्या मागे,चामोर्शी रोड, गडचिरोली पिन- ४४२६०५ (म.रा.), भ्रमणध्वनी क्र . ९६२३६६३४३५, या पत्त्यावर ३० जून २०२६ पर्यंत पाठवावे असे आवाहन संस्थेचे संचालक/संस्थापक चुडाराम बल्हारपुरे यांनी केले आहे.
"योग्य वेळ" येण्याची वाट पाहत आयुष्य पुढे ढकलणाऱ्या प्रत्येक माणसासाठी ज्ञानेश्वर माऊलींची ही ओवी जागृतीचा…
तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…
स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…
आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…
अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…
मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…