काय चाललयं अवतीभवती

राज्यस्तरीय “महामृत्युंजय वाङ्मय स्पर्धा २०२६” साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

गडचिरोली – येथील नाट्यश्री साहित्य कला मंच या संस्थेतर्फे राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय स्पर्धा -२०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. नाट्यश्री तर्फे साहित्यिकांच्या साहित्यकृतींना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आलेला असून गेल्या दोन वर्षात अनुक्रमे ३६ व ३३ साहित्यिकांना तसेच १९ साहित्यिकांना उत्तेजनार्थ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

या “राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय पुरस्कार- २०२६” साठी १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रकाशित झालेले मराठी भाषेतील साहित्य स्विकारले जाईल. तरी कादंबरी, कथासंग्रह, कवितासंग्रह/ गझलसंग्रह, समीक्षा किंवा संपादन, नाटक/एकांकिका, किंवा नाट्यविषयक ग्रंथ, आत्मकथन किंवा चरित्रग्रंथ, ललीत/ वैचारिक लेखसंग्रह/ प्रवासवर्णन, व बाल /कुमार साहित्य व संकिर्ण या वाङ्मय प्रकारातील प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

रोख रक्कम, आकर्षक सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून इच्छुक साहित्यिकांनी आपल्या साहित्यकृतीच्या २ प्रती व अल्पपरिचय, केवळ पोस्टानेच चुडाराम बल्हारपुरे (नाटककार), महामृत्युंजय निवास, वार्ड क्रं. १७, राधे बिल्डिंगच्या मागे,चामोर्शी रोड, गडचिरोली पिन- ४४२६०५ (म.रा.), भ्रमणध्वनी क्र . ९६२३६६३४३५, या पत्त्यावर ३० जून २०२६ पर्यंत पाठवावे असे आवाहन संस्थेचे संचालक/संस्थापक चुडाराम बल्हारपुरे यांनी केले आहे.

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

क्षणाचाही विलंब नको : ज्ञानेश्वरीतील संन्यासयुक्तीचा सहज, सोपा आणि जीवनाला दिशा देणारा संदेश A message that gives direction to life

"योग्य वेळ" येण्याची वाट पाहत आयुष्य पुढे ढकलणाऱ्या प्रत्येक माणसासाठी ज्ञानेश्वर माऊलींची ही ओवी जागृतीचा…

1 hour ago

माझं भारतीयत्व : तिरंग्याचे रंग My Indiannessः Urmila Chakurkar

तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…

2 days ago

अयोध्येतील दानपेटी प्रकरण : श्रद्धा, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची कसोटी Ram Mandir Donation Box Case

स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…

2 days ago

Dnyneshwari Tips On Karma : कर्म सोडू नका तर त्यातला अहंकार सोडा अन् चमत्कार पाहा

आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…

2 days ago

शेतमालास उत्पादनखर्चावर आधारित बाजारभाव यासंदर्भात हवा कायदा Need of Law For Agricultural Products

अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…

3 days ago

विरोधकांचा आवाज क्षीण झालायं… की सरकार अधिक बळकट झालंय ? Monsoon session of the legislature

मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…

4 days ago