May 19, 2026
Home » राज्यस्तरीय “महामृत्युंजय वाङ्मय स्पर्धा २०२६” साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
काय चाललयं अवतीभवती

राज्यस्तरीय “महामृत्युंजय वाङ्मय स्पर्धा २०२६” साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

Announcement of State Level Mahamrutyunjay Literary Award 2026 by Natyashri Sahitya Kala Manch, Gadchiroli

गडचिरोली – येथील नाट्यश्री साहित्य कला मंच या संस्थेतर्फे राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय स्पर्धा -२०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. नाट्यश्री तर्फे साहित्यिकांच्या साहित्यकृतींना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आलेला असून गेल्या दोन वर्षात अनुक्रमे ३६ व ३३ साहित्यिकांना तसेच १९ साहित्यिकांना उत्तेजनार्थ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

या “राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय पुरस्कार- २०२६” साठी १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रकाशित झालेले मराठी भाषेतील साहित्य स्विकारले जाईल. तरी कादंबरी, कथासंग्रह, कवितासंग्रह/ गझलसंग्रह, समीक्षा किंवा संपादन, नाटक/एकांकिका, किंवा नाट्यविषयक ग्रंथ, आत्मकथन किंवा चरित्रग्रंथ, ललीत/ वैचारिक लेखसंग्रह/ प्रवासवर्णन, व बाल /कुमार साहित्य व संकिर्ण या वाङ्मय प्रकारातील प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

रोख रक्कम, आकर्षक सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून इच्छुक साहित्यिकांनी आपल्या साहित्यकृतीच्या २ प्रती व अल्पपरिचय, केवळ पोस्टानेच चुडाराम बल्हारपुरे (नाटककार), महामृत्युंजय निवास, वार्ड क्रं. १७, राधे बिल्डिंगच्या मागे,चामोर्शी रोड, गडचिरोली पिन- ४४२६०५ (म.रा.), भ्रमणध्वनी क्र . ९६२३६६३४३५, या पत्त्यावर ३० जून २०२६ पर्यंत पाठवावे असे आवाहन संस्थेचे संचालक/संस्थापक चुडाराम बल्हारपुरे यांनी केले आहे.

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

मराठी भाषा पंधरवड्याचा सातारा पॅटर्न

अल्पसंख्याक भेद शोधणाऱ्या कवीचा गौरव

सांगलीतील दुर्ग प्रतिष्ठानचा यशवंत गडावर दीपोत्सव

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406