विश्वाचे आर्त

स्वरुपाची ओळख होण्यासाठीच समर्पण

तया अहं वाचा चित्त आंग । देऊनियां शरण रिग ।
महोदधी कां गांग । रिगालें जैसें ।। १३१९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा

ओवीचा अर्थ – गंगेचे पाणी जसें महासागराला सर्वांगानी मिळते, त्याप्रमाणें अहंकार, वाचा, चित्त व शरीर ही त्या ईश्वराला अर्पण करून शरण जा.

महासागराच्या पाण्याची वाफ होते. या वाफेला थंड हवा लागल्यानंतर त्याचे ढग तयार होतात. हे ढग भूभागावर बरसतात. ते पाणी खारट नसून शुद्ध असते. या पाण्यावरच मानवी जीवन समृद्ध होत आहे. अनेक जीवांनाही या पाण्यामुळे जीवन मिळते. पाण्याशिवाय सजिव सृष्टीच अस्तित्वात येत नाही. यासाठी पावसाच्या पाण्याचे महत्त्व विचारात घ्यायला हवे. कृत्रिम पद्धतीने शुद्ध पाणी आपण तयार करू शकू पण पावसाचे नैसर्गिक शुद्ध पाणी आपणास समृद्धी मिळवून देते. यातील काही पाणी नदीवाटे समुद्राला मिळते. म्हणजेच जेथून आले त्यातच पुन्हा जाऊन ते मिळते. निसर्गाचा हा नियम विचारात घ्यायला हवा.

सूर्यापासूनच हे विश्व अस्तित्वात आले. त्याच्याच भोवती हे सर्व ग्रह-तारे फिरत आहेत. पण विचार केला तर आपण किती लहान आहोत. या विश्वात आपण किड्या-मुंग्या प्रमाणे एक साधे जीव आहोत. विश्वाला अंत नसणारी ही पोकळी, आकाश, पाताळ हे आहे तरी काय याचा विचार आपण कधी केला आहे का ? हा विचार जेंव्हा आपण करू लागतो तेंव्हा आपण किती लहान आहोत याची जाणीव होते. या विश्वातील एक छोटेसे पात्र आपण आहोत. हे माझे, हे माझे म्हणून आपण इतके का अस्वस्थ होत आहोत. कारण जे आपले नाही त्याला आपण आपले आपले करून त्रास करून का घेत आहोत. यासाठीच जीवनाचा अभ्यास हा करायला हवा.

आपला जन्म कशासाठी झाला आहे याचा विचार करायला हवा. एक मानव म्हणून आपण या पृथ्वीतलावर आलो. आपल्या आई-वडीलांना आपली ओळख निर्माण व्हावी यासाठी आपणास एक नाव दिले. वारसा समजावा यासाठी आडनाव दिले. ही आपली खरी ओळख आहे का ? जीवनाचा खरा अर्थ समजून घेऊन जीवन जगायला हवे. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये हे शक्य वाटत नाही. कारण जगण्यासाठी आवश्यक असणारा अन्न, वस्त्र, निवारा मिळवण्यासाठी मोठी धडपड करावी लागत आहे. बदलत्या काळानुसार आपणास बदलत राहावे लागते तरच आपण तग धरू शकतो अन्यथा आपला विनाश हा ठरलेला आहे. यासाठीच येणाऱ्या परिस्थितीचा सामना करत, स्विकार करत आपण आपले ध्येय गाठणे आवश्यक आहे.

मी कोण आहे याचा विचार जेंव्हा करायला लागू तेंव्हा त्याची खरी ओळख पटल्यानंतर आपल्यातील अहंकार हा निश्चितच नष्ट होतो. हा अहंकार गेला तरच आपणास आपली खरी ओळख होईल. मी आत्मा आहे हे जेंव्हा समजेल तेंव्हाच सर्व गोष्टींचा उलघडा होईल. तो शरीरात आल्यानेच तो जन्म, मरणाच्या फेऱ्यात गुंतल्याचा भास होतो. यासाठीच हा अहंकार ईश्वराला अर्पण करून आत्मज्ञानी व्हायला हवे. श्वास अर्थात सोहम ची वाचेने साधना करायला हवी. चित्त यामध्ये गुंतवायला हवे. शरीर आणि आत्मा हा वेगळा आहे याची जाणीव करून घेऊन तन, मनाने सोहमची साधना करायला हवी. हे सर्व ईश्वराला अर्पण करायला हवे. जे आपले नाही ते आपले आहे असे समजून जो आपण त्रास करून घेत आहोत तो सोडायला हवा अर्थात तो ईश्वराला अर्पण करायला हवा. म्हणजेच आपल्या खऱ्या स्वरुपाची ओळख आपणास होईल अन् त्यात रममान होता येईल. स्वरुपात रममान होऊन आत्मज्ञानी होण्यासाठीच ईश्वरापुढे शरण जायला हवे.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

श्रीगुरूंचा महिमा जाणण्याचे साधन कोणते ? Guru Mahima: The Power of Surrender in Dnyaneshwari

गुरूंचा महिमा शब्दांत कितीही सांगितला, तरी तो पूर्णपणे व्यक्त होऊ शकत नाही. कारण गुरू हे…

2 hours ago

नबीन यांच्या ‘ड्रीम टीम’मध्ये धक्के अन् संकेत; तावडेंची महाराष्ट्रावर नजर, मालविय बाहेर

स्टेटलाइन भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तब्बल २०९ दिवसांनी नितीन नबीन यांनी पक्षाची नवी…

17 hours ago

अशांत जगाचं काहूर शांत करण्याची ताकद कवितेत – कृष्णात खोत

कवयित्री मनीषा पाटील यांच्या 'काहूर' काव्यसंग्रहाचे प्रकाशनप्रकाशन सोहळ्याला अनेक मान्यवर साहित्यिकांची उपस्थिती कणकवलीः'काहूर ' म्हणजे…

2 days ago

ज्वालामुखीच्या धगधगत्या पोटात… हवाईची अद्भुत सफर

एका भटक्याची डायरी प्रशांत महासागराच्या अथांग निळाईत वसलेली हवाईची बेटे म्हणजे निसर्गाच्या अद्भुत प्रयोगशाळाच! कुठे…

2 days ago

वर्षा ऋतूत आरोग्याची कोणती काळजी घ्यावी ? Dr Radha Khadakkar Advice

पावसाळ्यात वातावरणातील गारवा, सततचा ओलावा आणि बदलते हवामान यामुळे पचनशक्ती मंदावते आणि शरीराची प्रतिकारक्षमताही प्रभावित…

3 days ago

नोकरीच्या शोधात शहराकडे जाण्याऐवजी गावातच उद्योग कसा उभारता येईल ?

धान्यापासून उद्योगाकडे : एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योजकतेला नवी दिशा बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि तांदूळ…

3 days ago