यंदापासून सगळ्या बायकांना हळदीकुंकू नव्हे तर तिळगूळ समारंभाला बोलवा. छान आनंदात साजरे करा. कुणाच्या तरी चेहर्‍यावर आनंद बघून बघा तुम्हाला किती छान वाटते ते.

सौ सुनेत्रा विजय जोशी

आता संक्रांतीच्या हळदीकुंकवाचे दिवस सुरू झाले. बायका नवीन काळ्या साड्यांवर दागदागिने घालून जिकडेतिकडे मिरवत आहेत. कुणी काय लुटले कुणी काय यावर टोमणेवजा चर्चा करत आहेत. हळदीकुंकू हा सवाष्णीचा सण हे समीकरण कधी आणि कुठून आले तेच कळत नाही. कारण कुंकू तर अगदी पाळण्यात असल्यापासून आपण लावतो. तेव्हा ती तीट असते इतकेच.

मंगळसुत्र आपण लग्न झाल्यावर घालतो हे खरे. सौभाग्यवती म्हणजे सौभाग्य.. व.. ती असे असेल का? ती आणि तीचा नवरा म्हणजे भाग्य का? मनात विचारचक्र सुरू झाले. पुर्वी बायका घरातच राहायच्या त्यामुळे हे प्रश्न त्यांना पडले नसतील का? पडले असतीलच पण उघड बोलण्याचे स्वातंत्र्य मात्र त्यांना नव्हते म्हणण्यापेक्षा हिंमत नव्हती. कारण पोटापाण्यासाठी त्या कुणावर तरी अवलंबून होत्या.

तिळगूळ समारंभ असे म्हणा

आता स्त्रिया शिकल्या. बाहेर वावरताहेत. तेव्हा हे सगळे सुचलेले उघडपणे बोलण्याचे धाडस करू शकतात. खरे तर हा तिळगूळ समारंभ असतो. यात सवाष्ण किंवा विधवा असा प्रश्न नाहीच. आणि अजून एक प्रश्न मनात आला. पती निधनानंतरही ती लग्न झालेलीच असते ना.. असो. पण हळदीकुंकू न म्हणता आमच्याकडे आज तिळगूळ समारंभाला या असे म्हणायला काय हरकत आहे? अगदी पुरुष मित्रमंडळी पण येऊ देत ना. आणि हळदीकुंकू सगळ्याच बायकांना लावायला काय हरकत आहे. नाहीतरी बाकी घालून दिलेले पुर्वापार नियम सगळे कोणी पाळतात का? मग या वेळेस बरे हे सुचते? पुरुषांना बायको गेल्यावर कुठे जायचे नाही असा कुठला नियम वाचलेला मला तरी आठवत नाही. तसाच तो बायकांनाही नाही. आपण बायकाच असे फरक करतो आणि पुन्हा आपणच ओरड करतो. कोणतीही सुरवात आधी स्वतःपासून करावी. मी ती केलेली आहे अगदी वर्षानुवर्षांपासून… आता नव्हे. त्यामुळे हक्काने सांगू शकते.

स्त्रियांच्या या अशा अनिष्ट प्रथा आपण स्त्रियाच खूप कर्मठपणे पाळतो. मात्र त्यातून बाहेर स्वतःपासून पडण्याचा विचार न करता नुसती ओरड करत राहतो. नोकरी करणाऱ्या स्त्रिया वाईट नजरांपासून वाचण्यासाठी मंगळसुत्र घालतात ना? शास्त्रात सांगितलेली प्रत्येक गोष्ट तुम्ही पाळता का? नाही ना… मग इथेच कुंकू लावताना नियम कशाला? आणि हे कुणी पुरुष सांगत नाही तर आपण महिलाच महिलांना असे वागवतो.

यंदापासून सगळ्या बायकांना हळदीकुंकू नव्हे तर तिळगूळ समारंभाला बोलवा. छान आनंदात साजरे करा. कुणाच्या तरी चेहर्‍यावर आनंद बघून बघा तुम्हाला किती छान वाटते ते.

कुणी आधी जावे हे कुणाच्याच हातात नसते. तेव्हा…. उगाच मनात बागुलबुवा ठेवू नका. मोकळं कपाळ छान चिमुटभर कुंकवाने भरा.. नाहीतरी आता मोकळ कपाळ असतेच कुठे? चिमुटभर कुंकू कुणीच लावत नाहीत. सगळ्यांच्या कपाळी टिकल्याच असतात.तर मग… . मैत्रीणींनो तिळगुळ घ्या नि गोड गोड बोला.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

शेतमालास उत्पादनखर्चावर आधारित बाजारभाव यासंदर्भात हवा कायदा Need of Law For Agricultural Products

अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…

11 hours ago

विरोधकांचा आवाज क्षीण झालायं… की सरकार अधिक बळकट झालंय ? Monsoon session of the legislature

मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…

23 hours ago

इतिहास वाचनातूनच संस्कार अन् सुराज्याची जडणघडण : संयोगिताराजे छत्रपती Good State Formed Through Reading History

वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…

1 day ago

अर्पणामागचा भाव : शुद्ध भक्तितत्त्वाचा ज्ञानेश्वरीतील अमृतसंदेश Pure Bhakti from Dnyaneshwari |

हजारो रुपयांचा नैवेद्य अर्पण करणारा भक्त आणि प्रेमाने एक तुळशीपत्र वाहणारा भक्त—भगवंताच्या दृष्टीने यांपैकी मोठा…

1 day ago

आकाशातील ढग व युद्धाच्या धगीत अडकलेली अर्थव्यवस्था ! an economy caught in the grip of war

विशेष आर्थिक लेख रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने नुकताच देशातील आर्थिक सद्यस्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला.…

2 days ago

स्त्रीवादी साहित्याची नवी दिशा : डॉ. ऊर्मिला चाकूरकर यांचे अभ्यासपूर्ण अध्यक्षीय भाषण New direction of feminist literature

स्नेहलता मारुती पाटील सन्मानार्थ पुरोगामी सामाजिक, सांस्कृतिक फाऊंडेशन द्वारा आयोजित २रे स्त्रीवादी साहित्य संमेलन यामध्ये…

2 days ago