Yashawant Hirabai trambak Pagare Poem Swapna Gulabi
मन अंथरले डोळ्यांमधे
वाट पहात आहे राणी
हळूहळू भरते घागर
पापणीतले गुलाब पाणी
जीवनाचा हिरवा शालू
कटकीची चोळी अंगी
जागेपणी का बघते आहे
स्वप्न उद्याचे सप्तरंगी
हाती मेहंदी अंतरातली
शब्द थांबले रंगीत ओठी
महापूर का येईल त्यांचा
होतील जेंव्हा भेटी गाठी
कमान जशी धनुष्याची
भिवयांना तू काय शिकविले
इष्काच्या मधात बुडवून
नजरेचे का बाण सजविले
केसांचे ते म्हणणे मजला
कळले सखे कळले राणी
घेऊन येतो ताजी गुलाबी
एकांताची अवखळ गाणी
कवी – यशवंत हिराबाई त्र्यंबक पगारे
बदलापूर
आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…
कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…
बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…
कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…
स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…
आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर…