काय चाललयं अवतीभवती

झाडीबोली साहित्य मंडळांचे राज्य स्तरीय साहित्य पुरस्कार घोषित

झाडीबोली साहित्य मंडळांचे राज्य स्तरीय साहित्य पुरस्कार घोषित

भारत सातपुते (लातुर), संदीप धावडे (वर्धा ) यांचा गौरव

झाडीबोली साहित्य मंडळ शाखा जुनासुर्ला (ता. मुल ) द्वारा देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी निवड झालेल्या साहित्यकृतीची यादी घोषित करण्यात आलेली आहे. डॉ. हरिश्चंद्र बोरकर साहित्य सेवा पुरस्कार भारत सातपुते (लातुर) यांना ; झाडीपट्टीची बहिणाबाई अंजनाबाई खूणे काव्य पुरस्कार संदीप धावडे (वर्धा) यांच्या परिवलन – परिभ्रमण या ग्रंथास जाहीर करण्यात आला आहे.

डॉ. राजन जयस्वाल समीक्षण पुरस्कार डॉ. राजेंद्र राऊत (अमरावती) यांच्या लिळाचरित्रातील कथारूपे या ग्रंथास ; अॅड.लखनसिंह कटरे भाषा संशोधन पुरस्कार डॉ. सुरेश देशमुख (अमरावती) यांच्या भोयरी मराठी शब्द कोष आणि भाषा विज्ञान या ग्रंथास; डॉ. हेमकृष्ण कापगते वैचारिक लेखन पुरस्कार मधुकर कोटनाके (राजुरा) यांच्या कोलामगुड्याची शिक्षण यात्रा या ग्रंथास; हिरामण लांजे बालकथा पुरस्कार कु. तनिष्का डांगे ( पुसद ) यांच्या जादूची झप्पी या पुस्तकास, द. सा. बोरकर स्मृति कथा पुरस्कार डॉ. अनंता सूर (मुकूटबन) यांच्या भोगवाटा या ग्रंथास ; डॉ. घनश्याम डोंगरे स्मृति कादंबरी पुरस्कार रसुल सोलापूरे (कोल्हापूर) यांच्या फाटलेलं आभाळ या ग्रंथास; विठ्ठल लांजेवार स्मृति बालकाव्य पुरस्कार एकनाथ आव्हाड (मुंबई) यांच्या शब्दांची नवलाई या ग्रंथास; वा.चं. ठाकरे स्मृति संकीर्ण ग्रंथ पुरस्कार सुरेंद्र बुराडे ( नागपूर )यांच्या केल्याने देशाटन या ग्रंथास; बापुराव टोंगे स्मृती आत्मकथन पुरस्कार यवनाश्व गेडकर ( चंद्रपूर ) यांच्या आणि असा मी घडत गेलो या ग्रंथास जाहीर करण्यात आले आहे.

या साहित्य पुरस्काराचे वितरण झाडीबोली साहित्य संमेलन जुनासुर्ला (ता. मुल ) येथे १२ मार्च (शनिवार) रोजी मान्यवरांचा हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. विशेष पुरस्कार म्हणून झाडीपट्टी कलायात्री पुरस्कार हिरालाल पेंटर यांना, झाडीपट्टी गुणवंत विद्यार्थी पुरस्कार गौरव मर्लेवार यांना, झाडीबोली ज्येष्ठ कार्यकर्ता पुरस्कार सुधाकर मारगोनवार (आष्टी) यांना, झाडी बोली उत्कृष्ट ग्राफिक्सकार पुरस्कार रामकृष्ण चनकापुरे ( घाटकुळ ) यांना, झाडीबोली युवा कार्यकर्ता पुरस्कार कुंजीराम गोंधळे ( मुर्झा ) यांना प्रदान करण्यात येणार आहे.

पुरस्कारासाठी राज्यभरातून १४७ गंथ आले होते. त्यातून उत्तम साहित्यकृतीची निवड करण्यात आली आहे. निवड समितीचे अध्यक्ष ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, झाडीबोली साहित्य मंडळांचे जिल्हा प्रमुख कवी अरुण झगडकर, जुनासुर्ला शाखेचे अध्यक्ष लक्ष्मण खोब्रागडे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष रंजीत समर्थ, कार्याध्यक्ष गणेश खोब्रागडे ,सहकार्याध्यक्ष खुशाल टेकाम आदींनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

2 hours ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

15 hours ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

20 hours ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

1 day ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

1 day ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

2 days ago