काय चाललयं अवतीभवती

गोपाल सहर २४ व्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे उद्घाटक

कोल्हापूरः येथील पसायदान प्रतिष्ठान आणि कवी सरकार इंगळी वाचनालय यांच्यावतीने ११ मे रोजी २४ वे छत्रपती संभाजी राजे समाजप्रबोधन ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित केले आहे. याचे उद्घाटक म्हणून राजस्थानचे ज्येष्ठ हिंदी साहित्यिक गोपाळ सहर यांची निवड करण्यात आलेली आहे.

शब्दों का सौदागर, भोर उगे सांझ ढले (कहानी), तिनका-तिनका सपने (डायरी), अंधेरे में चुपके से चाँद (डायरी), कुछ यूं बुनते हुये (डायरी), हवा में ठहरा सवाल (कहानी), लोहा हैं ये शब्द (डायरी), संस्कृत लोककथा में लोकजीवन (शोध), अंबाशंकर नागर शब्द, कर्म और मर्म। ही गोपाळ सहर यांची प्रकाशित पुस्तके आहेत. विकल्प (हिन्दी पाक्षिक) स्पेक्ट्रेम (शोध-पत्रिका) यांचे संपादन त्यांनी केलेले आहे.

दैनिक दिव्य भास्करचे पत्रकार म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे. ‘भोर उगे सांझ ढले’ (कहानी संग्रह), अँधेरे में चुपके से चाँद, कुछ यूँ बुनते हुए (डायरी) या पुस्तकांचा मराठीमध्ये अनुवाद तसेच काही कथा डायरी यांचे गुजराती व ओडिया भाषेत त्यांनी अनुवाद केला आहे.

राजस्थान साहित्य अकादमी द्वारा चंद्रदेव शर्मा (द्वितीय) पुरस्कार, गुजरात साहित्य संगम द्वारा ‘रांगेय राघव पुरस्कार, ‘सम्बोधन’ द्वारा कथा शिरोमणि सम्मान, आचार्य निरंजननाथ सम्मान’ (2018) त्यांना मिळालेले आहेत. खुला लिफाफा हे त्यांचे पुस्तक विशेष गाजलेले आहे. सध्या ते गुजरात येथे कपडवंज या ठिकाणी प्राचार्य म्हणून सेवेत कार्यरत आहेत.

पसायदान प्रतिष्ठान आणि कवी सरकार इंगळी वाचनालय यांच्यावतीने भारत को क्रेडीट सोसायटी हॉल गांधी मैदान, मेन गेट जवळ, खरी कॉर्नर, कोल्हापूर येथे ११ मे २०२५रोजी ग्रामीण साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनात सहर यांच्या हस्ते पसायदान राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्राप्त साहित्यिकांना सन्मानित करण्यात येणार आहे.

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी
Tags: ११ मेChhatrapati Sambhaji RajeCultural ProgramsGopal SaharHindi LiteratureHindi WriterIndian authorsIndian literatureKavisarakar Inglik LibraryKolhapur EventKolhapur NewsLiterary GatheringLiterary GuestLiterature ConferenceMaharashtra Literary EventsMarathi EventsMay 11 EventPasaydan PratishthanRegional LiteratureRural CreativityRural LiteratureRural WritersSahitya SammelanSambhaji Maharajsocial awarenesssocial reformकविसरकार इंगळी वाचनालयकोल्हापूरगोपाळ सहरग्रामीण लेखकग्रामीण संमेलनग्रामीण साहित्यछत्रपतीछत्रपती संभाजी राजेपसायदान प्रतिष्ठानभारत को क्रेडीट सोसायटी हॉल गांधी मैदान मेन गेट जवळ खरी कॉर्नर कोल्हापूरमराठी कार्यक्रममराठी साहित्यमहाराष्ट्रलेखकसमाज सुधारणासमाजप्रबोधनसंमेलनसर्जनशीलतासाहित्य चळवळसाहित्य संमेलनसाहित्य संस्कृतीसाहित्यिक उपस्थितीसाहित्यिक कार्यक्रमहिंदी लेखकहिंदी साहित्यिक

Recent Posts

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

1 hour ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

14 hours ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

19 hours ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

1 day ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

1 day ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

2 days ago