📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 6, 2026
काय चाललयं अवतीभवती

गोपाल सहर २४ व्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे उद्घाटक

24th Chhatrapati Sambhaji Raje Literature Conference to be held in Kolhapur on May 11 with Gopal Sahar as chief guest

कोल्हापूरः येथील पसायदान प्रतिष्ठान आणि कवी सरकार इंगळी वाचनालय यांच्यावतीने ११ मे रोजी २४ वे छत्रपती संभाजी राजे समाजप्रबोधन ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित केले आहे. याचे उद्घाटक म्हणून राजस्थानचे ज्येष्ठ हिंदी साहित्यिक गोपाळ सहर यांची निवड करण्यात आलेली आहे.

शब्दों का सौदागर, भोर उगे सांझ ढले (कहानी), तिनका-तिनका सपने (डायरी), अंधेरे में चुपके से चाँद (डायरी), कुछ यूं बुनते हुये (डायरी), हवा में ठहरा सवाल (कहानी), लोहा हैं ये शब्द (डायरी), संस्कृत लोककथा में लोकजीवन (शोध), अंबाशंकर नागर शब्द, कर्म और मर्म। ही गोपाळ सहर यांची प्रकाशित पुस्तके आहेत. विकल्प (हिन्दी पाक्षिक) स्पेक्ट्रेम (शोध-पत्रिका) यांचे संपादन त्यांनी केलेले आहे.

दैनिक दिव्य भास्करचे पत्रकार म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे. ‘भोर उगे सांझ ढले’ (कहानी संग्रह), अँधेरे में चुपके से चाँद, कुछ यूँ बुनते हुए (डायरी) या पुस्तकांचा मराठीमध्ये अनुवाद तसेच काही कथा डायरी यांचे गुजराती व ओडिया भाषेत त्यांनी अनुवाद केला आहे.

राजस्थान साहित्य अकादमी द्वारा चंद्रदेव शर्मा (द्वितीय) पुरस्कार, गुजरात साहित्य संगम द्वारा ‘रांगेय राघव पुरस्कार, ‘सम्बोधन’ द्वारा कथा शिरोमणि सम्मान, आचार्य निरंजननाथ सम्मान’ (2018) त्यांना मिळालेले आहेत. खुला लिफाफा हे त्यांचे पुस्तक विशेष गाजलेले आहे. सध्या ते गुजरात येथे कपडवंज या ठिकाणी प्राचार्य म्हणून सेवेत कार्यरत आहेत.

पसायदान प्रतिष्ठान आणि कवी सरकार इंगळी वाचनालय यांच्यावतीने भारत को क्रेडीट सोसायटी हॉल गांधी मैदान, मेन गेट जवळ, खरी कॉर्नर, कोल्हापूर येथे ११ मे २०२५रोजी ग्रामीण साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनात सहर यांच्या हस्ते पसायदान राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्राप्त साहित्यिकांना सन्मानित करण्यात येणार आहे.

Related posts

अनिल धाकू कांबळी, ऐश्वर्य पाटेकर यांना रत्नाकर काव्य पुरस्कार

गुगलची एआय केंद्र गुंतवणूक ही एका नवीन आंतरराष्ट्रीय जालान्तर्गत गेटवेच्या विकासाचा भाग – नरेंद्र मोदी

तिळगंगा साहित्य प्रेरणा पुरस्कार अन् प्रतिभा पुरस्कार जाहीर

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406