fliif Reader app download

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
June 20, 2026
Home » अनंता सूर यांच्या खांदेमळणी कथासंग्रहाला बडोद्याच्या मराठी वाङ् मय परिषदेचा पुरस्कार जाहीर
काय चाललयं अवतीभवती

अनंता सूर यांच्या खांदेमळणी कथासंग्रहाला बडोद्याच्या मराठी वाङ् मय परिषदेचा पुरस्कार जाहीर

डॉ. अनंता सूर यांच्या ‘खांदेमळणी’ कथासंग्रहाला बडोदा मराठी वाङ्मय परिषदेचा २०२५ चा साहित्य पुरस्कार

जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू होऊन आता तीन-चार दशके होत आली आहेत. राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे जागतिकीकरणाची अपरिहार्यता आपण टाळू शकलेलो नाही हे कटू असले तरी खरे वास्तव आहे. जागतिकीकरणाचे इष्ट-अनिष्ट दूरगामी परिणाम आपल्या अर्थकारणावर, समाजकारणावर, भाषेवर, संस्कृतीवर विशेष म्हणजे ग्रामीण जीवनावर झालेला आहे. त्यामुळे कधी नव्हे ती ग्रामीण संस्कृती वेगवेगळ्या अंगाने प्रभावित झाली आहे. हा झालेला बदल कलेतून आणि साहित्यातून मांडण्याचा प्रभावी प्रयत्न दोन दशकांपासून सुरू झालेला आपणास दिसतो.

‘खांदेमळणी’ हा कथासंग्रह त्याचे प्रातिनिधिक उदाहरण होय. ग्रामीण जीवनात झालेल्या सामाजिक, राजकीय, सांकृतिक किंवा भाषिक बदलाची सूक्ष्म दखल हा कथासंग्रह घेताना आपणास दिसतो. ‘खांदेमळणी’ या कथासंग्रहात लेखक कोणतेही भडक भाष्य किंवा विधान करीत नाही किंवा ग्रामजीवनाचे फार तपशील मांडत नाही तर ग्रामीण जीवनातील सर्व पातळ्यांवरील सूक्ष्म वस्तुनिष्ठता टिपते. व्यक्तिरेखेतील विविधता, नात्यातील ताणतणाव, सामाजिक-राजकीय जीवनातील पेच, त्यातील अंतर्गत संघर्ष, जीवनाचे विविधांगी बदलते स्वरूप अस्सल भाषेतून मांडणे हे अनंता सूर यांना लिलया जमले आहे. ग्रामीण कथेचा जो एकूणच परीघ आहे तो या कथासंग्रहामुळे नक्कीच विस्तारल्या जाणार आहे. अनंता सूर यांच्या भविष्यातील कथा अधिक प्रगल्भ आणि परिणत होऊन येईल याची आश्वासक खात्री ‘खांदेमळणी’ हा कथासंग्रह आजच आपणास देतो.

प्रमोदकुमार अणेराव
ज्येष्ठ साहित्यिक आणि चित्रकार

बडोदा – मराठी वाङमय परिषद बडोदाचा वतीने देण्यात येणाऱ्या वाङ्मयीन पुरस्कारासाठी यावर्षी डॉ. अनंता सूर यांच्या ‘खांदेमळणी’ कथासंग्रहाची २०२५ च्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे कार्यवाह संजय बच्छाव यांनी कळविले आहे. या कथासंग्रहाला मिळालेला हा पहिलाच पुरस्कार असून या पुरस्काराचे वितरण २२ मार्च २०२६ रोजी श्री नारायण गुरु तालीम, दांडिया बाजार, बडोदा येथे एबीपी माझा नियोजन विभागच्या संपादक भारती सहस्रबुद्धे यांच्या हस्ते होणार आहे.

हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्द्ल डॉ. काशिनाथ बऱ्हाटे, डॉ. मोना चिमोटे, डॉ. पवन मांडवकर, डॉ. गजानन मुंदे, डॉ. अण्णा वैद्य, ‘बिराड’कार अशोक पवार, कवी इंद्रजीत भालेराव, डॉ. सुधा मालधुरे, डॉ. संतोष देठे, डॉ. संजय लाटेलवार, डॉ. गजानन घोंगटे, डॉ. पद्माकर तामगाडगे, डॉ. भास्कर बंगाळे, डॉ. अनिल दडमल, डॉ.अशोक इंगळे, डॉ. रुपेश कऱ्हाडे, डॉ. भास्कर पाटील, डॉ. इसादास भडके, डॉ. विद्याधर बनसोड, डॉ. सुहासकुमार बोबडे, नाटककार चुडाराम बल्लारपुरे, डॉ. सतेज दणाणे, संतोष रामगिरवार, सुरेश पेंढरवार, नागोराव कोंम्पलवार, गणेश बुटे, लक्ष्मण काकरवर यांनी अभिनंदन केले आहे.

Related posts

सांगली परिसरात आढळले हे पक्षी…

मराठेशाहीचा वारसा लाभलेला पुरंधरचा लोकशाहीतला वीर!

विडंबन काव्यातून समाजाच्या जाणिवा जागृत करण्याचा प्रयत्न : डॉ. विठ्ठल वाघ

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!