काय चाललयं अवतीभवती

दिवाळी अंक स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

दिवाळी अंक स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

जयसिंगपूर – संग्रहालय, अभिलेखागार, अभिलेख और पुस्तकालय सेवा संस्थान आणि आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना यांच्यावतीने आयोजित केलेल्या ‘दिवाळी अंक स्पर्धा २०२४’ साठी १५ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वीच्या निवेदनानुसार स्पर्धकांना दिवाळी अंक स्पर्धेत सहभाग नोंदवण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत मुदत देण्यात आली होती, मात्र स्पर्धकांच्या मागणीनुसार मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्यांना या स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी दिवाळी अंकाच्या तीन प्रती स्पीड पोस्टाने पाठवाव्यात, असे आवाहन स्पर्धा व मूल्यमापन मंडळाचे संयोजक डॉ. सुनील दादा पाटील यांनी केले आहे.

मराठी दिवाळी अंकाना ११६ वर्षाची गौरवशाली परंपरा आहे. दिवाळी अंक आणि मराठी माणूस यांचे अतूट नाते आहे. मराठी भाषेची ही वैभवशाली परंपरा जपण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटने तर्फे गेली ३१ वर्षे सातत्याने सभासदांसाठी दिवाळी अंक स्पर्धा घेतली जाते. दर्जेदार दिवाळी अंकांना उत्तेजन मिळावे, नव्या दमाच्या आणि कसदार लेखन करणार्‍या लेखकांना प्रोत्साहन मिळावे, या भूमिकेतून ही स्पर्धा आयोजित केली जाते.

त्याचबरोबर दिवाळी अंकांच्या संपादक व प्रकाशकांचे एक दिवशीय अधिवेशनाचे आयोजन केले जाते. दिवाळी अंक स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणार्‍या संपादक / प्रकाशक (अधिकृत सभासद) यांनी आपल्या ख्रिसमस (नाताळ) विशेषांक / दिवाळी अंकाच्या ३ प्रती, कव्हरिंग लेटरसह १५ डिसेंबर २०२४ पूर्वी पाठवाव्या.

जागतिक पुस्तक दिन हा २३ एप्रिल रोजी जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो; त्याचदिवशी साहित्यिकांमध्ये मानाचे स्थान असणार्‍या कवितासागर साहित्य अकादमीच्या पुरस्काराचे समारंभपूर्वक वितरण साहित्य आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असणार्‍या मान्यवरांच्या उपस्थित जयसिंगपूर येथे होईल.

दिवाळी अंक पाठविण्याचा पत्ता –
International Diwali Ank Association आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना
द्वारा, कार्यकारी संचालक – डॉ. सुनील दादा पाटील, कवितासागर, पोस्ट बॉक्स ६९, नांदणी नाक्याजवळ, बायपास रोड, जयसिंगपूर – ४१६१०१, तालुका – शिरोळ, जिल्हा – कोल्हापूर, संपर्क: ९९७५८७३५६९, ८४८४९८६०६४

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

अशांत जगाचं काहूर शांत करण्याची ताकद कवितेत – कृष्णात खोत

कवयित्री मनीषा पाटील यांच्या 'काहूर' काव्यसंग्रहाचे प्रकाशनप्रकाशन सोहळ्याला अनेक मान्यवर साहित्यिकांची उपस्थिती कणकवलीः'काहूर ' म्हणजे…

19 hours ago

ज्वालामुखीच्या धगधगत्या पोटात… हवाईची अद्भुत सफर

एका भटक्याची डायरी प्रशांत महासागराच्या अथांग निळाईत वसलेली हवाईची बेटे म्हणजे निसर्गाच्या अद्भुत प्रयोगशाळाच! कुठे…

1 day ago

वर्षा ऋतूत आरोग्याची कोणती काळजी घ्यावी ? Dr Radha Khadakkar Advice

पावसाळ्यात वातावरणातील गारवा, सततचा ओलावा आणि बदलते हवामान यामुळे पचनशक्ती मंदावते आणि शरीराची प्रतिकारक्षमताही प्रभावित…

2 days ago

नोकरीच्या शोधात शहराकडे जाण्याऐवजी गावातच उद्योग कसा उभारता येईल ?

धान्यापासून उद्योगाकडे : एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योजकतेला नवी दिशा बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि तांदूळ…

2 days ago

रानफुलास

महाराष्ट्रातील अग्रगण्य कवयित्री, बहिणाबाई चौधरी यांचा तिथीप्रमाणे आज १४७ वा जन्मदिवस.( जन्म श्रावण शु" पंचमी,…

3 days ago

‘युगानुयुगे तूच’चा आता पंजाबी अनुवाद

सत्यपाल भिकी यांनी केले भाषांतर; हिंदी अनुवादानंतर पंजाबी आवृत्ती मुंबई ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

3 days ago