काय चाललयं अवतीभवती

शब्दगंध च्या राज्यस्तरीय प्रेम काव्यलेखन स्पर्धेचा निकाल जाहीर

शब्दगंध च्या राज्यस्तरीय प्रेम काव्यलेखन स्पर्धेचा निकाल जाहीर

अहिल्यानगर : “ नवोदितांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळण्यासाठी “ शब्दगंध च्या वतीने आयोजित राज्यस्तरीय प्रेम काव्यलेखन स्पर्धेमध्ये पाथर्डी येथील सचिन चव्हाण प्रथम,गुहा येथील क्रांती करंजगीकर द्वितीय तर चांदूरबाजार येथील विशाल मोहोळ यांना तृतीय क्रमांका पटकावला आहे,” अशी माहिती शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी व अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी दिली.

कवयित्री शर्मिला गोसावी, स्वाती ठुबे, राजेंद्र फंड यांनी काव्यलेखन स्पर्धा परीक्षक म्हणून काम पाहिले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल असा..
प्रथम – सचिन चव्हाण,पाथर्डी
द्वितीय – क्रांती करंजगीकर, गुहा ता. राहुरी
तृतीय – विशाल मोहोळ, चंदुरबाजार जि. अमरावती
उत्तेजनार्थ – डॉ. राजेंद्र गवळी, कुकाणा, ता.नेवासा
उत्तेजनार्थ – सुजाता रासकर, देवदैठण, ता.श्रीगोंदा
उत्तेजनार्थ – रितेश सरोदे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वहाली ता. आष्टी

स्पर्धेतील प्रथम क्रमांकास १,००० रुपये, द्वितीय क्रमांकास ७५१ रुपये, तृतीय क्रमांकास ५५१ रुपये तर उत्तेजनार्थ दोघाना २५१ रुपये रोख स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, पुस्तक भेट असे पारितोषिकांचे स्वरूप आहे. पारितोषिक प्राप्त साहित्यिकांचे मार्गदर्शक ज्ञानदेव पांडूळे, प्राचार्य जी. पी. ढाकणे, अध्यक्ष राजेंद्र उदागे,कार्याध्यक्ष डॉ. अशोक कानडे, कार्यवाह सुभाष सोनवणे, खजिनदार भगवान राऊत, अजयकुमार पवार,शाहिर भारत गाडेकर, प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे, सुनील धस, डॉ. तुकाराम गोंदकर, बबनराव गिरी, राजेंद्र पवार, रामकिसन माने, किशोर डोंगरे, बंडूशेठ दानापुरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र चोभे, डॉ. प्रवीण गायकवाड व डॉ. प्रियांका गायकवाड यांनी अभिनंदन केले आहे.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

अशांत जगाचं काहूर शांत करण्याची ताकद कवितेत – कृष्णात खोत

कवयित्री मनीषा पाटील यांच्या 'काहूर' काव्यसंग्रहाचे प्रकाशनप्रकाशन सोहळ्याला अनेक मान्यवर साहित्यिकांची उपस्थिती कणकवलीः'काहूर ' म्हणजे…

9 hours ago

ज्वालामुखीच्या धगधगत्या पोटात… हवाईची अद्भुत सफर

एका भटक्याची डायरी प्रशांत महासागराच्या अथांग निळाईत वसलेली हवाईची बेटे म्हणजे निसर्गाच्या अद्भुत प्रयोगशाळाच! कुठे…

17 hours ago

वर्षा ऋतूत आरोग्याची कोणती काळजी घ्यावी ? Dr Radha Khadakkar Advice

पावसाळ्यात वातावरणातील गारवा, सततचा ओलावा आणि बदलते हवामान यामुळे पचनशक्ती मंदावते आणि शरीराची प्रतिकारक्षमताही प्रभावित…

1 day ago

नोकरीच्या शोधात शहराकडे जाण्याऐवजी गावातच उद्योग कसा उभारता येईल ?

धान्यापासून उद्योगाकडे : एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योजकतेला नवी दिशा बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि तांदूळ…

2 days ago

रानफुलास

महाराष्ट्रातील अग्रगण्य कवयित्री, बहिणाबाई चौधरी यांचा तिथीप्रमाणे आज १४७ वा जन्मदिवस.( जन्म श्रावण शु" पंचमी,…

2 days ago

‘युगानुयुगे तूच’चा आता पंजाबी अनुवाद

सत्यपाल भिकी यांनी केले भाषांतर; हिंदी अनुवादानंतर पंजाबी आवृत्ती मुंबई ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

2 days ago