अध्यात्मात साक्षात्कारास अनन्य साधारण महत्त्व आहे. पण साक्षात्कार कशामुळे होतो. साधनेत कसा साक्षात्कार होतो. जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर….
लेखन – प्रा. अ. रा. यार्दी, धारवाड
विषयवती गंध, रस, रूप, स्पर्श आणि शब्द या विषयांवरची प्रवृत्ती मनाच्या चंचलतेला बांधून टाकते.
नाकाच्या टोकावर केलेल्या संयमाने दिव्य गंधाचा साक्षात्कार होतो.
जिभेच्या टोकावर केलेल्या संयमाने दिव्य रसाचा साक्षात्कार होतो.
टाळूच्या भागावर केलेल्या संयमाने दिव्य रूपाचा साक्षात्कार होतो.
जिभेच्या मध्यभागी केलेल्या संयमाने दिव्य स्पर्शाचा साक्षात्कार होतो.
जिभेच्यावर केलेल्या संयमाने दिव्य शब्दाचा साक्षात्कार होतो.
अशाप्रकारे पंचज्ञानेंद्रियांच्या अनुभूति पूर्ण साधनेने मन-चित्त त्या ठिकाणी स्थिर होऊ लागते आणि पुढचा मार्ग निर्विघ्न होतो.
सूत्र-४४ एतयैव सविचारा निर्विचारा च सूक्ष्मविषया व्याख्याता
जेव्हा एखादे ध्येय सूक्ष्म असते आणि चित्त त्याच्या देश, काल आणि निमित्ताच्या (Time, Space and cause) विचाराने एकरूप झालेले असते, तेव्हा सविचार समापत्ती होते. (इथे कार्यकारणभाव लक्षात घेतला जातो.) जेव्हा एकाग्रता वाढलेली असते, तेव्हा चित्त हे देश, काल आणि निमित्त यांच्यापासून वेगळे होऊन त्या सूक्ष्म विषयांशी तदाकार होऊन ज्ञान करून घेते, तेव्हा निर्विचार समापत्ती होते.
सवितर्क आणि निर्वितर्क समापत्ती व सविचार आणि निर्विचार समापत्ती या चारही प्रकारांना सबीज समाधी असे म्हणतात. कारण, त्यात ज्ञानाच्या प्रक्रियेत कोणत्या ना कोणत्या वस्तूचा, विषयाचा आधार घ्यावाच लागतो.
निर्विचार समाधीत प्रावीण्य मिळाले की, अध्यात्मामधली खरी आनंदप्राप्ती होते. बुद्धीमध्ये जी निर्मलता तयार होते, त्याला अध्यात्म – प्रसाद म्हणतात. त्या वेळी केवळ प्रकाशस्वरूपाचा अनुभव येत असतो.
लेखन – प्रा. अ. रा. यार्दी, धारवाड
तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…
स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…
आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…
अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…
मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…
वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…