काय चाललयं अवतीभवती

गावगाडा साहित्य पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन

सोलापूर – जिल्ह्यातील वडशिवणे, ( ता – करमाळा ) येथील विश्वकर्मा तरुण मंडळाच्यावतीने ग्रामीण लोकमानस आणि लोक संस्कृतीचे प्रतिबिंब असलेल्या मराठीतील दर्जेदार साहित्यकृतींना गावगाडा साहित्य पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. यंदा या पुरस्काराचे 16 वे वर्ष आहे.

यावर्षी 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत प्रकाशित झालेले कथासंग्रह, तसेच साहित्यकृतीच्या दोन प्रती, अल्पपरिचय आणि फोटो या पुरस्कारासाठी पाठवाव्यात. या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे असून साहित्यिकांनी 10 मार्च 2026 पर्यंत आपले साहित्य पाठवून द्यावे.

यापूर्वी हा पुरस्कार भागवत बावळे (2011), प्रा. डॅा. अर्जुन होटकर (2012), कल्पना दुधाळ 2013, पार्थ पोळके (2014), सतीश दराडे (2015), ऐश्वर्य पाटेकर (2016), रावसाहेब कुंवर (2017), तुकाराम पाटील (2018), दिनकर कुटे (2019), जयदीप विघ्ने (2020), हरिश्चंद्र पाटील (2021), डॉ. कालिदास शिंदे/बाबुराव इंगळे (२०२२), तान्हाजी बोऱ्हाडे (2023), प्रकाश सोनाळकर (2024), मारोती मानेमोड (2025) या मान्यवर साहित्यिकांना देण्यात आलेला आहे. तरी साहित्यिकांनी आपले साहित्य सोमनाथ मधुकर टकले, मु. पो – वडशिवणे, ता – करमाळा, जि – सोलापूर पिन – 413223 मोबाईल – 9699760802 या पत्त्यावर पाठवून द्यावे अशी माहिती विश्वकर्मा तरुण मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ मधुकर टकले यांनी दिली. यावेळी दिनेश आदलिंगे, डॉ. जनार्दन भोसले, दत्तात्रय पिसाळ, बाबुराव इंगळे हे उपस्थित होते.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

नोकरीच्या शोधात शहराकडे जाण्याऐवजी गावातच उद्योग कसा उभारता येईल ?

धान्यापासून उद्योगाकडे : एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योजकतेला नवी दिशा बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि तांदूळ…

4 hours ago

रानफुलास

महाराष्ट्रातील अग्रगण्य कवयित्री, बहिणाबाई चौधरी यांचा तिथीप्रमाणे आज १४७ वा जन्मदिवस.( जन्म श्रावण शु" पंचमी,…

17 hours ago

‘युगानुयुगे तूच’चा आता पंजाबी अनुवाद

सत्यपाल भिकी यांनी केले भाषांतर; हिंदी अनुवादानंतर पंजाबी आवृत्ती मुंबई ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

19 hours ago

जागतिक अर्थकारणाच्या नव्या समीकरणांचा वेध घेणारे ‘ब्रिक्स अँड इंडिया’ ‘BRICS & INDIA: PROSPECTS & CHALLENGES

जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहात बदलत जाणारे आर्थिक आणि भू-राजकीय समीकरण, पारंपरिक जागतिक वित्तीय संस्थांच्या वर्चस्वाला उभे…

1 day ago

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

2 days ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

2 days ago