📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
September 19, 2026
काय चाललयं अवतीभवती

गावगाडा साहित्य पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन

वडशिवणे करमाळा येथील गावगाडा साहित्य पुरस्कारासाठी आवाहन पोस्टर

सोलापूर – जिल्ह्यातील वडशिवणे, ( ता – करमाळा ) येथील विश्वकर्मा तरुण मंडळाच्यावतीने ग्रामीण लोकमानस आणि लोक संस्कृतीचे प्रतिबिंब असलेल्या मराठीतील दर्जेदार साहित्यकृतींना गावगाडा साहित्य पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. यंदा या पुरस्काराचे 16 वे वर्ष आहे.

यावर्षी 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत प्रकाशित झालेले कथासंग्रह, तसेच साहित्यकृतीच्या दोन प्रती, अल्पपरिचय आणि फोटो या पुरस्कारासाठी पाठवाव्यात. या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे असून साहित्यिकांनी 10 मार्च 2026 पर्यंत आपले साहित्य पाठवून द्यावे.

यापूर्वी हा पुरस्कार भागवत बावळे (2011), प्रा. डॅा. अर्जुन होटकर (2012), कल्पना दुधाळ 2013, पार्थ पोळके (2014), सतीश दराडे (2015), ऐश्वर्य पाटेकर (2016), रावसाहेब कुंवर (2017), तुकाराम पाटील (2018), दिनकर कुटे (2019), जयदीप विघ्ने (2020), हरिश्चंद्र पाटील (2021), डॉ. कालिदास शिंदे/बाबुराव इंगळे (२०२२), तान्हाजी बोऱ्हाडे (2023), प्रकाश सोनाळकर (2024), मारोती मानेमोड (2025) या मान्यवर साहित्यिकांना देण्यात आलेला आहे. तरी साहित्यिकांनी आपले साहित्य सोमनाथ मधुकर टकले, मु. पो – वडशिवणे, ता – करमाळा, जि – सोलापूर पिन – 413223 मोबाईल – 9699760802 या पत्त्यावर पाठवून द्यावे अशी माहिती विश्वकर्मा तरुण मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ मधुकर टकले यांनी दिली. यावेळी दिनेश आदलिंगे, डॉ. जनार्दन भोसले, दत्तात्रय पिसाळ, बाबुराव इंगळे हे उपस्थित होते.

Related posts

प्रसार माध्यमांनी स्वातंत्र्यलढ्यातील अज्ञात योद्ध्यांच्या शौर्यगाथा पुढे आणाव्यात – नरेंद्र मोदी

पक्षी संवर्धनाचा मुद्दा हा मानवी अस्तित्वाशी निगडित – प्रवीण परदेशी

देशा बाहेर जाणारा पैसा रोखण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406