कविता

कुणी, तिकीट देता का रे तिकीट ?

थोर कवी कुसुमाग्रज यांच्या “कुणी, घर देता का रे घर ?” या काव्याचे विडंबन पुढे सादर करीत आहे. अर्थातच कवी कुसुमाग्रज यांची क्षमा मागून.

एक उमेदवार भिंती वाचून
छपरावाचून
माणसाच्या मायेवाचून
देवाच्या दयेपासून
गल्लोगल्ली फिरत आहे
जिथून कुणी उठवणार नाही
अशी जागा धुंडत आहे
कुणी, तिकीट देता का रे तिकीट ?

काय रे बाळा
खरंच सांगतो बाबांनो
उमेदवार आता थकून गेलाय
इकडे तिकडे जमेल तसे
नोकरी,धंदे करून
अर्ध अधिक तुटून गेलाय
मिनतवार्‍या करून
हातापाया पडून
घरच्यांची बोलणी खाऊन
मित्रांची मस्करी सहन करून
झुंज देऊन देऊन
उमेदवार आता थकून गेलाय
उमेदवाराला आता
झटपट श्रीमंत व्हायचं आहे
म्हणुन
कुणी, तिकीट देता का रे तिकीट ?

खुरडत खुरडत चालत आहे
खरं सांगतो बाबांनो
उमेदवाराला न मिळणारी
उमेदवारीच नडतेय
हे बाबा ,कुणी तिकीट देता का रे तिकीट ?

उमेदवाराला महाल हवा
राजवाड्याचा सेट हवा
पदवी हवी,हार हवा
थैली मधली भेट हवी
हवा एक मोठा व्हिला
पंख मिटून पडण्यासाठी
हवी एक
सोन्याची आरामखुर्ची
उमेदवाराला बसण्यासाठी
एक मर्सिडीज हवी
पुढच्या दारात
सरकारांना फिरण्यासाठी

कुणी तिकीट देता का रे तिकीट ?

रचना: देवेंद्र भुजबळ, 9869484800

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

शिवाजी विद्यापीठात मोडी लिपी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू Shivaji University Modi Script Certificate Course Admission Process Begins

कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्र आणि इतिहास अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर…

10 hours ago

आत्मज्ञान म्हणजे स्वतःचा झालेला नवा जन्म Self-Knowledge Means a New Birth of the Self | Dnyaneshwari

माणसाचा जन्म एकदा देहाचा होतो; पण स्वतःची खरी ओळख पटते, तो त्याचा खरा जन्म असतो.…

22 hours ago

जीडीपीचे सत्य: आकड्यांचा खेळ आणि वास्तव GDP growth in India

GDPच्या वाढीचे आकडे समोर आले की राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण येते. कुणाच्या मते भारतीय अर्थव्यवस्था १०…

1 day ago

सगळे कुठे आहेत? आकाशातील या प्रश्नातून सुरू होते एका अनंत अंतराळयात्रेची कहाणी!

रात्रीच्या आकाशात चमकणारा प्रत्येक तारा आपल्याला एक नवा प्रश्न विचारतो. या अथांग विश्वात असंख्य तारे,…

1 day ago

आवाज त्यांचा, कला त्यांची; मग इतिहासानं त्यांना विसरलं का?

ज्यांनी ठुमरी, दादरा, गझल, चैती, होरी-कजरीसारख्या कलांना आपल्या स्वरांनी समृद्ध केलं, ज्यांच्या कोठ्यांवर संगीताची साधना…

1 day ago

AI चा वर्षाव, भावनांचा दुष्काळ; मन पुन्हा हिरवं होईल का?

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वर्षाव होत असताना मानवी भावनांचा दुष्काळ का जाणवतो आहे? तंत्रज्ञानाने आयुष्य अधिक सोयीचे…

2 days ago