काय चाललयं अवतीभवती

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सोलापूर शाखेकडून विविध पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

सोलापूरमहाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या सोलापूर शाखेच्या वतीने मराठी साहित्यातील उत्कृष्ट साहित्यकृतींना दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. कविता, कथा, कादंबरी, ललितगद्य, अनुवादित साहित्य तसेच चरित्र/आत्मचरित्र या साहित्य प्रकारांतील उत्कृष्ट पुस्तकांचा पुरस्कारासाठी विचार केला जाणार आहे.

यंदाच्या पुरस्कारांमध्ये प्रसिद्ध लेखिका विजयाताई जहागीरदार स्मृती साहित्य पुरस्कार उत्कृष्ट कवितासंग्रहासाठी, कै. सौ. निर्मलाताई उत्तरेश्वर मठपती स्मृती साहित्य पुरस्कार उत्कृष्ट कथासंग्रहासाठी, प्राचार्य कै. डॉ. मधुकर कृष्णाजी झांबरे स्मृती साहित्य पुरस्कार ललितगद्य साहित्यकृतीसाठी, हॉटेल सूर्या एक्झिक्यूटिव्ह उत्कृष्ट साहित्य पुरस्कार अनुवादित साहित्यकृतीसाठी, श्रीमती कमला श्रीवल्लभ चंडक स्मृती साहित्य पुरस्कार उत्कृष्ट कादंबरीसाठी तर कै. ज्ञानोबा काळे व कै. सौ. हौसाबाई ज्ञानोबा काळे स्मृती साहित्य पुरस्कार चरित्र किंवा आत्मचरित्र या साहित्यप्रकारासाठी दिला जाणार आहे.

प्रत्येक पुरस्काराचे स्वरूप रोख रुपये पाच हजार, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे असणार आहे. पुरस्कारासाठी पाठवण्यात येणारी पुस्तके १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रकाशित झालेली असावीत. लेखकांनी कोणत्याही एका साहित्य प्रकारातील पुस्तकाच्या दोन प्रती ३० जून २०२६ पूर्वी पाठवाव्यात. पुस्तकाच्या मुखपृष्ठ, मलपृष्ठ किंवा पहिल्या पानावर कोणतीही नोंद अथवा मजकूर लिहिलेला नसावा, अन्यथा पुस्तक अपात्र ठरविण्यात येईल. पुरस्कारासाठी पुस्तकांच्या दोन प्रती किशोर चंडक, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, सोलापूर शाखा, मंत्रीचंडक कार्यालय, जवाहरलाल नेहरू वसतिगृह, पार्क चौक, सोलापूर – ४१३००१ या पत्त्यावर पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी अध्यक्ष प्रा. डॉ. श्रुती वडगबाळकर (९३२५०४६४१५) तसेच प्रमुख कार्यवाह डॉ. नरेंद्र काटीकर (९४२२६४४२४६) यांच्याशी संपर्क साधावा.

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

फिदेलसोबत १०० वर्षे : अमेरिकन दादागिरीसमोर न झुकलेल्या क्रांतिकारकाची कहाणी

फिदेल कास्त्रो यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अखिल भारतीय किसान सभेकडून अभिवादन नवी दिल्ली :क्यूबाच्या क्रांतीचे कमांडर-इन-चीफ, जननेते…

8 hours ago

कोल्हापूरच्या युवा दिग्दर्शकाच्या ‘अनघा’ला जम्मू फिल्म फेस्टिव्हलची पसंती

https://youtu.be/xcTeVoV7ItY कोल्हापूर येथील युवा चित्रकार व दिग्दर्शक स्वप्निल बळवंत पाटील यांनी दिग्दर्शित केलेल्या “अनघा” या…

17 hours ago

शेतकऱ्याचं जगणं, मरणं आणि मरणानंतरची परवड सांगणारं नाटक : ‘कर्जबळी’

शेतकऱ्याच्या कष्टाला निसर्गाची साथ मिळत नाही, कर्जाच्या विळख्यातून त्याची सुटका होत नाही आणि अखेर आत्महत्येचा…

18 hours ago

महात्मा फुले विचार आणि कार्य या विषयावर दीर्घ काव्य स्पर्धा Mahatma Phule Thoughts and Work Poem Competition

राष्ट्र सेवा दल महाराष्ट्र आणि समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे आयोजनस्पर्धेसाठी कविता पाठविण्याची अंतिम तारीख :…

2 days ago

जीडीपी वाढतोय, मग आनंद कुठे हरवतोय ? Happiness GDP And Human-Development

आनंदाची 'जीडीपी' आणि आपण ! दरवर्षी मार्च महिन्यात 'जागतिक आनंद अहवाल' जाहीर होतो,काही देश अव्वल…

2 days ago