दोन मन असतात एक बहिर्मन व दुसरे अंतर्मन; पण हे कधीच खोटे बोलू शकत नाही ते आपल्याला चांगल्या मार्गावर नेण्याचा वारंवार सूचना देत असतात.

सौ पुष्पा सुनीलराव वरखेडकर,
पीडी कन्या शाळा, वरुड

मन हा मोगरा !
मन हा मोगरा ! अर्पुनी ईश्वरा !
पुनरुपी संसारा येणे नाही !

मनाचे माहात्म्य एवढे थोर आहे. मन हे अतिशय चंचल आहे. अर्जुनाने श्रीकृष्णाला प्रश्न केला की ईश्वराची उपासना करण्याकरता एकाग्रचित्त आवश्यक आहे, परंतु ते अतिशय चंचल असल्यामुळे त्याला वश करता येत नाही.

श्रीकृष्णाने त्याला सततच्या अभ्यासाने ताब्यात घेता येते असा विचार सांगितला. मनावर बुद्धीचे नियंत्रण हवे, म्हणजेच इंद्रिय संयमीत केली की मनावर ताबा मिळवता येतो. मन हे फुलपाखरासारखे आहे. त्याला भटकू देऊ नये empty mind is devil’s workshop त्याला कुठल्याही प्रकारचा छंद जोपासावा लागतो.

ज्याप्रमाणे पाणी जिकडे नेईल तिकडे जाते त्याप्रमाणे त्याला योग्य ठिकाणी वळवता येते; मनरूपी रथावर बसून श्रवणाद्वारे बाहेर निघून शब्दरूपी रानात संचार करते, तो प्रकृतीचा लगाम हातात धरून त्वचेच्याद्वारे स्पर्श रुपी घोर वनात जातो. एखाद्या वेळेस नेत्राच्या द्वारे बाहेर पडून रूप विषयाच्या डोंगरावर स्वच्छंदाने हिंडतो किंवा जिभेच्या द्वाराने बाहेर पडून रसाच्या गुहेत किंवा जीवनाच्या द्वाराने बाहेर पडून सुगंधाच्या करण्यात फिरतो. याप्रमाणे देह व इंद्रिय यांचा नायक जे मन ते धरून पंचेंद्रियाचे विषय जे शब्दादिक यांचा उपभोग घेतो असा मनाचा व इंद्रियाचा निकटचा संबंध आहे, असे माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात.

गीतेमध्ये कृष्णाच्या सारथी रूपात मनाला उपमा दिली आहे आणि त्याला जोडलेले दहा घोडे म्हणजे इंद्रिय आणि या दहा इंद्रियावर निग्रह ठेवणे आवश्यक आहे मन हे आपल्या शरीराचा अमृत कलश आहे जीवनात मनाशी कधीही हारू नये.

मन के हारे हार है ! नक्की जीते जीत ! आपल्याजवळ मानसिक शक्ती असेल तर असफलतेवर आपण मात करू शकतो. वैज्ञानिकांनी हृदयाला शोधून काढलं पण मन शोधता आलं नाही; मानव मनुष्य व मानवता हे सर्व मनामुळेच आहे आपल्याला मनाचे महत्त्व मानवी जीवनात अतिशय महत्त्वाचे आहे, म्हणून मनाला खतपाणी घालण्याकरता वारंवार सत ग्रंथाचे वाचन, चरित्राचे वाचन, श्रवण मनन हे करणे आवश्यक आहे.

मनाची शक्ती एवढी भरभक्कम आहे की मन हे जर परमेश्वराला समर्पित केले तर या संसार चक्रातून माणसाची सुटका होते व मनुष्य ईश्वर सुद्धा बनू शकतो. एवढी शक्ती मनाची आहे, पण या सर्व गोष्टीला सततचा अभ्यास आवश्यक आहे.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

रानफुलास

महाराष्ट्रातील अग्रगण्य कवयित्री, बहिणाबाई चौधरी यांचा तिथीप्रमाणे आज १४७ वा जन्मदिवस.( जन्म श्रावण शु" पंचमी,…

6 hours ago

‘युगानुयुगे तूच’चा आता पंजाबी अनुवाद

सत्यपाल भिकी यांनी केले भाषांतर; हिंदी अनुवादानंतर पंजाबी आवृत्ती मुंबई ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

7 hours ago

जागतिक अर्थकारणाच्या नव्या समीकरणांचा वेध घेणारे ‘ब्रिक्स अँड इंडिया’ ‘BRICS & INDIA: PROSPECTS & CHALLENGES

जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहात बदलत जाणारे आर्थिक आणि भू-राजकीय समीकरण, पारंपरिक जागतिक वित्तीय संस्थांच्या वर्चस्वाला उभे…

17 hours ago

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

1 day ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

2 days ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

2 days ago