Neelkanchan, a Marathi essay collection by US-based writer Pallavi Shinde Mane, will be launched in Kalyan under Prabha Prakashan with eminent guests and literary presence.
आठवणींचा भुंगा कधी पाठ सोडत नाही; तर कधी विचाराचं काहूर सतत डोक्यात चालू असतं. अशावेळी शब्द जवळ येतात आणि त्या शब्दातून आपल्या भावनांची कोंडी मोकळी करण्याचं काम लेखनातून होत असतं अशा सामर्थ्याने हे लेखन केले आहे.
पल्लवी शिंदे माने, लेखिका
कणकवली / कल्याण : प्रभा प्रकाशन, कणकवली यांच्या वतीने अमेरिकास्थित मराठी लेखिका पल्लवी शिंदे माने लिखित ‘नीलकांचन’ या ललित लेखसंग्रहाचे प्रकाशन रविवारी (१९ एप्रिल) सायंकाळी ४ वाजता कल्याण येथील बालक मंदिर संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.
कवी अजय कांडर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात मराठी साहित्य अभ्यासक डॉ. निर्मोही फडके यांच्या हस्ते ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते पांडुरंग निरंजन भारती आणि चित्रपट दिग्दर्शक विजय शिंदे उपस्थित राहणार आहेत.
प्रभा प्रकाशन, कणकवली ही कोकणातील प्रकाशन क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असून ‘नीलकांचन’ हे संस्थेचे ४२वे पुस्तक आहे. या ग्रंथाच्या लेखिका पल्लवी शिंदे माने या मूळच्या कल्याण येथील असून सध्या त्या अमेरिकेत स्थायिक आहेत. परदेशात वास्तव्यास असतानाही त्या सातत्याने विविध साहित्यप्रकारांमध्ये लेखन करत असून त्यांच्या पूर्वीच्या साहित्यकृतींना राज्यस्तरीय पुरस्कारही मिळाले आहेत.
‘नीलकांचन’ हा ललित लेखसंग्रह आठवणींच्या विविध पैलूंना स्पर्श करणारा आहे. छोट्या-छोट्या प्रसंगांना हृदयस्पर्शी शब्दांत मांडत मानवी नात्यांची उब आणि संवेदना जपण्याचा प्रयत्न या लेखनातून दिसून येतो. विचारांच्या गर्दीतून आणि आठवणींच्या ओघातून उमटणाऱ्या भावनांना शब्दरूप देत लेखिकेने हा संग्रह साकारला आहे.
आठवणींचा भुंगा कधी पाठ सोडत नाही; तर कधी विचाराचं काहूर सतत डोक्यात चालू असतं. अशावेळी शब्द जवळ येतात आणि त्या शब्दातून आपल्या भावनांची कोंडी मोकळी करण्याचं काम लेखनातून होत असतं अशा सामर्थ्याने हे लेखन लेखिका पल्लवी शिंदे माने यांनी केल्यामुळे हे लेखन नक्कीच वाचकांच्या पसंतीला पडेल असा विश्वास लेखिकेला वाटतो आहे.
तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…
स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…
आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…
अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…
मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…
वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…