विश्वाचे आर्त

समाधिपाद – योग साधनेतील विघ्ने कोणती ?

समाधिपाद सूत्र – २९.तत:प्रत्यक्चेतनाधिगमोअपिअंतरायाभावश्च.

ईश्वरप्रणिधानामुळे जीवात्म्याचा साक्षात्कार होतो आणि अनेक विघ्ने नाहीशी होतात. प्रणवाच्या उपासनेमुळे जीवात्म्याचा, अंत:सामर्थ्याचा साक्षात्कार तर होतोच; पण त्याबरोबर जी विघ्ने योगाभ्यासात संकटे निर्माण करू शकतात, ती विघ्ने ही आपोआप नाहीशी होऊ लागतात. 

सूत्र – ३० व्याधिस्त्यानसंशयप्रमादालस्याविरतिभ्रांतिदर्शनालब्धभूमिकानवस्थितत्वानि चित्त विक्षेपास्ते अंतराया:|

या आधीच्या सूत्रात विघ्ने नाहीशी होतात हे सांगितले. पण ती विघ्ने कोणती ?

व्याधी – शारीरिक त्रास.

स्त्यान – काहीच करू नये असे वाटणे. (अंगचोरपणा)

संशय – मी योगाभ्यास करू शकेन की नाही, केला तर योगप्राप्ती होईल की नाही ? असा संशय येणे.

(इथे संशयात्मा विनश्यति हे लक्ष्यात ठेवावे.)

प्रमाद – समाधीच्या साधनांचे अनुष्ठान करण्यात कंटाळा करणे. आलस्य – शरीराला व मनाला जाड्य आल्यामुळे ध्यानात मन रमत नाही.

अविरती – विषयांबद्दल आसक्ती वाढलेली असते, विकारांच्या प्रभावाखाली असल्याने आसक्तीत वाढ होऊन योगाबद्दल कंटाळा येऊ लागतो.

भ्रांतिदर्शन – योगाभ्यास आणि त्याचे फायदे हे सारे खोटे आहे असे वाटणे.

अलब्धभूमिकत्व – समाधी अवस्थेपर्यंत पोचता न येणे.

अनवस्थित्व – समाधीपर्यंत पोचून सुद्धा तिथे चित्तस्थैर्य न झाल्याने ध्येयपूर्तीच्या आधीच समाधीतून बाहेर येणे.

व्यावहारिक दृष्ट्या सुद्धा आपल्या कार्यसिद्धीत शारीरिक, मानसिक आणि वैचारिक अडथळे येतच असतात. त्या सर्वांवर मात केल्याशिवाय ध्येयप्राप्ती, संकल्पपूर्ती होत नाही.

लेखन अ. रा. यार्दी, धारवाड

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

1 hour ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

14 hours ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

19 hours ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

1 day ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

1 day ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

2 days ago