Pleasant Summer This year Manikrao Khule article
यंदा उन्हाळा कसा असेल यावर हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केलेले मत…
१. कोकण, सह्याद्री घाटमाथा व पूर्व विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्राच्या ८० टक्के भुभागावर ह्यावर्षीचा (एप्रिल, मे, जून) तीन महिन्यातील उन्हाळा म्हणजे दुपारचे कमाल तापमान हे सरासरी तापमाना इतकेच असण्याची शक्यता सर्वाधिक म्हणजे ५५ टक्के जाणवते. म्हणजेच महाराष्ट्राच्या ८० टक्के ह्या भुभागावर ह्या वर्षी उन्हाळा आल्हाददायकच असण्याची शक्यता जाणवते.
मात्र यात वगळलेला भाग म्हणजे कोकण (मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हे ) व सह्याद्रीचा घाटमाथा (पेठ सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, मावळ, मुळशी, पोलादपूर, महाबळेश्वर, पाटण, शाहूवाडी, गगनबावडा ते चंदगड पर्यन्त) तसेच पूर्व विदर्भातील ( भंडारा, गोंदिया, गडचिरोली ) जिल्ह्यात दुपारचे कमाल तापमान हे सरासरीपेक्षा अधिक असण्याची सर्वाधिक शक्यताही तितकीच म्हणजे ५५ टक्के जाणवते. म्हणजेच केवळ फक्त ह्या २० टक्के महाराष्ट्रातील भुभागावर उन्हाळा कडक असण्याची शक्यता जाणवते.
२. काहीसा कोकण व दक्षिणेकडील महाराष्ट्र वगळता उर्वरित महाराष्ट्रातील ६५ टक्के भुभागावर ह्यावर्षीचा (एप्रिल, मे, जून) तीन महिन्यातील पहाटेचे किमान तापमान हे सरासरी तापमाना इतकेच असण्याची शक्यता सर्वाधिक म्हणजे ५५ टक्के जाणवते. म्हणजेच महाराष्ट्रातील ह्या ६५ टक्के भुभागावर पहाटेचा गारवा जाणवेल, असे वाटते. मात्र यात वगळलेला भाग म्हणजे कोकण व दक्षिणेकडील महाराष्ट्रातील मुंबईसहित ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, नगर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, लातूर ह्या जिल्ह्यातील पहाटेचे किमान तापमान हे सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता सर्वाधिक म्हणजे ४५ टक्के जाणवते. म्हणजेच महाराष्ट्रातील केवळ फक्त ह्या ३५ टक्के भुभागावर म्हणजेच वरील जिल्ह्यात पहाटेचा गारवा हा कमीच जाणवेल, असे दिसते.
एकंदरीत संपूर्ण उन्हाळ्यात मुंबई, ठाणे, रायगड, खान्देश, नाशिक, नगर व विदर्भातील जिल्ह्यात १ ते २ दिवस आली तर उष्णता सदृश लाट येऊ शकते, अन्यथा नाही.
३. महाराष्ट्रातील उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व पूर्व विदर्भातील तीन ( गोंदिया, भंडारा, गडचिरोली ) जिल्ह्यात दुपारचे कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक असण्याची सर्वाधिक शक्यता ४५ टक्के आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात जरी दिवसा ऊबदारपणा जाणवण्याची शक्यता असली तरी विदर्भ, मराठवाड्यातसहित महाराष्ट्राच्या उर्वरित भागात पहाटेचे किमान तापमान मात्र हे सरासरीपेक्षा कमी असण्याची सर्वाधिक शक्यताही ४५ टक्के जाणवते. त्यामुळे एकंदरीत संपूर्ण एप्रिल महिना सुसह्य जाणवून उष्णतेच्या लाटेविना जाऊ शकतो असे वाटते.
मुंबई, ठाणे, रायगड, खान्देश, नाशिक, नगर, पुणे, औरंगाबाद जिल्ह्यात संपूर्ण एप्रिल महिन्यात केवळ २ ते ४ दिवस आली तर उष्णता सदृश स्थिती जाणवू शकते अन्यथा नाही. एकंदरीत येणारा उन्हाळा सुसह्य जाणवू शकतो. असेच वाटते.
४. महाराष्ट्रात संपूर्ण एप्रिल महिन्यात पावसाची सरासरी संपूर्ण राज्य व पूर्ण महिन्यासाठी ही साधारणच असते. ह्यावर्षी एप्रिल महिन्यातील पावसाची शक्यता ही केवळ सरासरी किंवा त्यापेक्षा कमी अशा समिश्र शक्यतेची जाणवते. त्यामुळे उन्हाळी पिकांना एकंदरीत वातावरण अनुकूलच समजावे. असे वाटते.
तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…
स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…
आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…
अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…
मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…
वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…