काय चाललयं अवतीभवती

दुर्लक्षित लेखक कवींना मंच उपलब्ध करण्याचा अजय कांडर यांचा प्रयत्न

प्रभा प्रकाशनाचे एकाच वेळी सहा ग्रंथ प्रकाशित
कणकवली सारख्या ग्रामीण भागातून लेखक कवींना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न
प्रभा प्रकाशनाचे संचालक कवी अजय कांडर यांची माहिती

कणकवली – मराठीतील प्रसिद्ध कवी अजय कांडर यानी नव्या आणि गुणवत्ता असणाऱ्या दुर्लक्षित लेखक कवींच लेखन सर्व दूर चांगल्या वाचकांपर्यंत पोहोचावं म्हणून प्रभा प्रकाशनाच्या कामाला पाच वर्षांपूर्वी प्रारंभ केला. या अल्प कालावधी मध्ये प्रभा प्रकाशनाने कविता, ललित, वैचारिक, संगीतआणि सामाजिक विषयावरील विविध ग्रंथ प्रकाशित करून अनेक दुर्लक्षित लेखक कवींना मंच उपलब्ध करून दिला. आता प्रभा प्रकाशनातर्फे एकाच वेळी सहा ग्रंथ प्रकाशित करण्यात येत असल्याची माहिती प्रभा प्रकाशानाचे संचालक अजय कांडर यांनी दिली.

या सहा नव्या ग्रंथांमध्ये छत्रपती संभाजीनगर येथील संगीताचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा.डॉ. तुकाराम वांढरे यांच्या पंडित विष्णू नारायण भातखंडे संगीतिकार्य आणि कर्तृत्व, सेवानिवृत्त वृद्धांच्या समस्या, संभाजीनगर येथीलच दुसरे लेखक डॉ. आरगडे अंबादास यांच्या भारतीय संविधान आणि प्रशासन, मुंबई येथील प्रसिद्ध नाटककार, कवी उदय जाधव यांच्या पांढऱ्याशुभ्र स्क्रीनवर, सातारा येथील मनीषा शिरटावले यांच्या विसावादाशी संवाद आणि सातारा येथीलच अश्विनी कोठावळे यांच्या अनुभूती आदी ग्रंथांचा समावेश आहे.

आजच्या सोशल मीडियाच्या काळात साहित्य लेखन करणे सोपे पण ते लेखन प्रकाशित करणे कठीण असते. कारण ग्रंथ प्रकाशित केला तर त्याला वाचक उपलब्ध होईलच याची शाश्वती नाही. सोशल मीडियामुळे वाचनाची जिज्ञासा कमी होऊ लागली आणि त्याचा परिणाम ग्रंथ प्रकाशित होण्यावरही झाला. अशा परिस्थितीत अजय कांडर यांनी प्रभा प्रकाशनतर्फे आयएसबीएन नबरसह वेगवेगळे ग्रंथ उत्तम निर्मितीने प्रकाशित करून ते महाराष्ट्रातल्या जाणकार वाचकांपर्यंत पोहोचविले. ग्रंथाची विक्री फार होत नसेल तर अशावेळी चांगल्या लेखक कवीचे प्रभा प्रकाशनातर्फे प्रकाशित केलेले ग्रंथ मराठीतल्या चांगल्या लेखक समीक्षकांपर्यंत स्वतःहून पाठविण्याची कल्पना प्रभा प्रकाशनातर्फे अमलात आणली गेली आणि प्रभा प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या लेखक कवीचं नाव सर्व दूर पोहोचलं.

प्रभा प्रकाशनच्या प्रकाशित करण्यात आलेल्या बहुसंख्य ग्रंथांना महत्त्वाची पारितोषिकेही प्राप्त झालेली आहेत. ग्रंथ प्रकाशित करणे आणि ते ग्रंथ पुरस्कार योजनेसाठी पाठविण्याची कल्पना अमलात आणणे, विविध नियतकालिकांमध्ये किंवा पोर्टल मध्ये त्या ग्रंथांवर समीक्षा लेखन करून प्रसिद्ध करणे, प्रसंगी त्या समीक्षा लेखनाचा ग्रंथ प्रकाशित करणे आणि प्रकाशित ग्रंथाचा प्रकाशन समारंभ करण्यासाठी लेखक कवीला पाठबळ देणे असं नियोजन प्रभा प्रकाशनतर्फे केल जात. या पार्श्वभूमीवर कोकण बरोबर महाराष्ट्रातील अनेक लेखकांनी प्रभा प्रकाशनातर्फे आपले ग्रंथ प्रकाशित केले आहेत.

या लेखक कवींमध्ये प्रा. डॉ . जिजा शिंदे, डॉ योगिता राजकर, प्राचार्य राजेंद्र शेंडगे, सफरअली इसफ, शंकर जाधव, आनंद हरी, मनीषा शिरटावले, विजय सावंत, डॉ शिवप्रिया, प्रमिता तांबे, हरिचंद्र भिसे, संजय तांबे, डॉ प्रफुल आंबेरकर, डॉ अमुल पावसकर, कल्पना बांदेकर, किशोर कदम अशा अनेक लेखक कवींच्या ग्रंथांचा समावेश आहे. कवी लेखकांची गुणवत्ता विकसित करणे आणि त्यांचं चांगलं साहित्य चांगल्या वाचकांपर्यंत पोहोचविणे हीच प्रभा प्रकाशनाने बांधिलकी कायम जपली असल्याचीही माहिती अजय कांडर यांनी दिली.

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी
Tags: Ajay KandarAmbadas AargadeAshwini kothawalebook awardsbook publishingbook reviewscultural literatureIndian literatureISBN booksKonkan literatureliterary eventsliterary promotionMaharashtra authorsManisha ShirtavaleMarathi authorsMarathi essaysMarathi LiteratureMarathi novelsMarathi poetryMarathi publishing housepoetry publishingPrabha PrakashanRural WritersSahityasix books releasesocial literaturetheatre literatureTukaram WandhareUday JadhavVishnu Bhatkhandeअजय कांडरअंबादास आरगडेअश्विनी कोठावळेआयएसबीएन ग्रंथउदय जाधवकविता प्रकाशनकोकण साहित्यग्रंथ प्रकाशनग्रामीण लेखकतुकाराम वांढरेनाट्य साहित्यपुस्तक पुरस्कारपुस्तक समीक्षाप्रभा प्रकाशनभारतीय साहित्यमनीषा शिरटावलेमराठी कवितामराठी कादंबरीमराठी प्रकाशनमराठी लेखकमराठी साहित्यमहाराष्ट्र लेखकललित लेखनविष्णू भातखंडेसहा ग्रंथसामाजिक साहित्यसाहित्यसाहित्य प्रसारसाहित्यिक कार्यक्रम

Recent Posts

शेतमालास उत्पादनखर्चावर आधारित बाजारभाव यासंदर्भात हवा कायदा Need of Law For Agricultural Products

अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…

5 hours ago

विरोधकांचा आवाज क्षीण झालायं… की सरकार अधिक बळकट झालंय ? Monsoon session of the legislature

मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…

18 hours ago

इतिहास वाचनातूनच संस्कार अन् सुराज्याची जडणघडण : संयोगिताराजे छत्रपती Good State Formed Through Reading History

वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…

1 day ago

अर्पणामागचा भाव : शुद्ध भक्तितत्त्वाचा ज्ञानेश्वरीतील अमृतसंदेश Pure Bhakti from Dnyaneshwari |

हजारो रुपयांचा नैवेद्य अर्पण करणारा भक्त आणि प्रेमाने एक तुळशीपत्र वाहणारा भक्त—भगवंताच्या दृष्टीने यांपैकी मोठा…

1 day ago

आकाशातील ढग व युद्धाच्या धगीत अडकलेली अर्थव्यवस्था ! an economy caught in the grip of war

विशेष आर्थिक लेख रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने नुकताच देशातील आर्थिक सद्यस्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला.…

2 days ago

स्त्रीवादी साहित्याची नवी दिशा : डॉ. ऊर्मिला चाकूरकर यांचे अभ्यासपूर्ण अध्यक्षीय भाषण New direction of feminist literature

स्नेहलता मारुती पाटील सन्मानार्थ पुरोगामी सामाजिक, सांस्कृतिक फाऊंडेशन द्वारा आयोजित २रे स्त्रीवादी साहित्य संमेलन यामध्ये…

2 days ago