Rainy Season Poem by Shital Potdar Satara
मेघराजा का रे तू
इतका का चिडलास
काय गुन्हा त्या साऱ्यांचा
त्यांचा संसारच सारा
तू बुडव्हलास
इतके दिवस सारे तुझी
करत होते प्रतिक्षा
इतका कसा निर्दयी
झालास तू करू लागले
सारी तुझी उपेक्षा
तुझा रौद्ररूपाने घातला
महापुराचा तांडव
घरे झाली सारी बेघर
कुठे घालू आश्रयसाठी मांडव
नाही बघितले लहान सहान
नाही बघितली पाखरे,जनावरे
क्षणार्धातच कसे तू
गिळंकृत केले सारे
अक्राळ विक्राळ रुपापुढे तूझ्या
जनता सारी खंगली
मनी नव्या आशेची पहाट
अन् स्वप्न सारी भंगली
नदी, नाले, अन् धरणे
झाले सगळीकडे वहाते पाणी
डोळ्यातील आसवांना
वाट पूसतय का कोणी?
आला धरतीला पूर
झाली जलमय सारी सृष्टी
धीर धर ना थोडा आता
नको करु अतिवृष्टी
काय मिळवलेस तू
असे रूप धारण करून
मंदीरांनिही घेतलाय स्वतःला
जलाभिषेक करुन
✍️ शितल पोतदार
वडूज,सातारा
स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…
आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर…
फिदेल कास्त्रो यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अखिल भारतीय किसान सभेकडून अभिवादन नवी दिल्ली :क्यूबाच्या क्रांतीचे कमांडर-इन-चीफ, जननेते…
https://youtu.be/xcTeVoV7ItY कोल्हापूर येथील युवा चित्रकार व दिग्दर्शक स्वप्निल बळवंत पाटील यांनी दिग्दर्शित केलेल्या “अनघा” या…
शेतकऱ्याच्या कष्टाला निसर्गाची साथ मिळत नाही, कर्जाच्या विळख्यातून त्याची सुटका होत नाही आणि अखेर आत्महत्येचा…
राष्ट्र सेवा दल महाराष्ट्र आणि समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे आयोजनस्पर्धेसाठी कविता पाठविण्याची अंतिम तारीख :…