📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 7, 2026
कविता

मेघराजा का रे तू…

Rainy Season Poem by Shital Potdar Satara

मेघराजा का रे तू
इतका का चिडलास
काय गुन्हा त्या साऱ्यांचा
त्यांचा संसारच सारा
तू बुडव्हलास

इतके दिवस सारे तुझी
करत होते प्रतिक्षा
इतका कसा निर्दयी
झालास तू करू लागले
सारी तुझी उपेक्षा

तुझा रौद्ररूपाने घातला
महापुराचा तांडव
घरे झाली सारी बेघर
कुठे घालू आश्रयसाठी मांडव

नाही बघितले लहान सहान
नाही बघितली पाखरे,जनावरे
क्षणार्धातच कसे तू
गिळंकृत केले सारे

अक्राळ विक्राळ रुपापुढे तूझ्या
जनता सारी खंगली
मनी नव्या आशेची पहाट
अन् स्वप्न सारी भंगली

नदी, नाले, अन् धरणे
झाले सगळीकडे वहाते पाणी
डोळ्यातील आसवांना
वाट पूसतय का कोणी?

आला धरतीला पूर
झाली जलमय सारी सृष्टी
धीर धर ना थोडा आता
नको करु अतिवृष्टी

काय मिळवलेस तू
असे रूप धारण करून
मंदीरांनिही घेतलाय स्वतःला
जलाभिषेक करुन

✍️ शितल पोतदार
वडूज,सातारा

Related posts

‘स्पर्श’ चारोळी संग्रहातून संवेदनशील मनाचे दर्शन

शब्द ही विलीन झाले….!

कुणी, तिकीट देता का रे तिकीट ?

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406