विश्वाचे आर्त

दैव अनुकूल झाले, तर….

मीपणाचा गर्व नाही. हा अहंकार आता नाही. कारण आता मला समजले आहे, हे मी जरी लिहीले असले तरी मी या ठिकाणी निमित्तमात्र आहे. प्रत्यक्ष हे विचार उमटवणारा दुसरा आहे. मनात येणारे विचारही त्याच्यामुळेच प्रकट होत आहेत. त्याला आता मला पकडायचे आहे. मी कोण आहे याची अनुभूती तो देतो. तो सोहमची अनुभूती देतो.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

होय अदृष्ट आपैतें । तैं वाळुची रत्ने परते ।
उजू आयुष्य तै मारितें । लोभु करी ।। २२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा

ओवीचा अर्थ – दैव जर अनुकूल झाले, तर वाळूची रत्ने होतात, अथवा जर आयुष्य अनुकूल असेल, तर जीव घ्यावयास आलेलाही प्रेम करतो.

दैव जर अनुकूल झाले, तर वाळूची रत्ने होतात. अथवा जर आयुष्य अनुकूल असेल, तर जीव घ्यावयास आलेलाही प्रेम करतो इतके सामर्थ या दैवात आहे; पण दैवाचा हा खेळ कोणाला कळला ? आत्मज्ञानाने दैवाचा खेळ समजतो; पण आयुष्यात घडणार आहे, ते कोणी टाळू शकत नाही. नशिबात एखादी घटना घडणार असेल, तर ती घडतेच. दैवात जे लिहून ठेवले आहे तेच घडते. विधिलिखित कोणालाही टाळता आले नाही आणि कोणालाही बदलता आले नाही. भविष्य समजले म्हणून त्यात बदल करतो म्हटले तर ते बदलता येत नाही. घडायचे तेच घडणार.

अनेक नवे शोध लागले. नवनव्या तंत्रज्ञानाने मोठी प्रगती केली, पण त्सुनामीसारखी एखादी लाट क्षणात सारे उद्ध्वस्त करते. हा दैवाचा भाग आहे. दैवाची कृपा झाली, तर नराचा नारायण होतो. जीर्णावस्थेत काबाडकष्ट करणारा महान राजाही होऊ शकतो. यासाठी दैवाची कृपा व्हायला हवी. मरा मरा म्हणून जप करणारा, वाल्ह्याचा महान वाल्मीकी ऋषी झाला. कारण मरा मरा म्हणता तो केंव्हा राम राम म्हणू लागला हे त्यालाच कळले नाही. अन् त्याच्यावर कृपा झाली. कृपा कशी होईल, हे सांगता येत नाही.

चोवीस तास जप करणाऱ्या व्यक्तीलाही कधी काहीच भेटत नाही, असेही घडते. नुसती जपायची माळ ओढून चालत नाही. तो भाव मनात प्रकट व्हायला लागतो. यासाठी सद्गुरूंची कृपा व्हायला हवी. मग माळा जपायची गरज भासत नाही. आपोआप साधना होते नाही, तर ती करवून घेतली जाते. दैवाच्या कृपेनेच हे विचार मनात प्रकटतात. दैवाच्या कृपेनेच, सद्गुरूंच्या आशीर्वादानेच तर हे लिखाण माझ्याकडून करवून घेतले जात आहे. प्रत्यक्षात लिहीत मी आहे, पण हे लिहून घेणारा, हे विचार सुचविणारा, हे विचार मनात प्रकट करणारा कोणी तरी दुसरा आहे. हे काम तो माझ्याकडून करवून घेत आहे. ते विचार तो माझ्या मनात भरत आहे. तेच इथे उमटत आहेत. त्याचे अस्तित्व माझ्यात कोठे तरी आहे. यामुळेच हे लिखाण माझ्याकडून होत आहे. यामुळे मी केले, मी लिहिले, हा अहंकार आता माझ्यामध्ये उरलेला नाही.

मीपणाचा गर्व नाही. हा अहंकार आता नाही. कारण आता मला समजले आहे, हे मी जरी लिहीले असले तरी मी या ठिकाणी निमित्तमात्र आहे. प्रत्यक्ष हे विचार उमटवणारा दुसरा आहे. मनात येणारे विचारही त्याच्यामुळेच प्रकट होत आहेत. त्याला आता मला पकडायचे आहे. मी कोण आहे याची अनुभूती तो देतो. तो सोहमची अनुभूती देतो. तो सोहमचा नाद मला पकडायचा आहे. ती लय मला धरायची आहे. त्याच्यातच आता मला माझे मन रमवायचे आहे. कारण तोच ह्या सर्व विचारलहरींचा निर्माता आहे. त्याच्यातूनच हे सर्व प्रकट होत आहे. त्याच्या विचारलहरीतूनच हे विचार प्रकट होत आहेत. ते दैव मला पकडायचे आहे. दैवाला मला अनुकूल करून घ्यायचे आहे. हे माझे ध्येय आहे. इतकेच नव्हेतर हे पृथ्वीवरील सर्व मानवजातीचे हे ध्येय आहे. यासाठीच हे आयुष्य आपल्याला मिळालेले आहे.

दगडामध्येच ग्रॅनाईट सापडते. विविध रत्ने सुद्धा मिळतात. पण शेवटी तो दगड आहे. पण दैवीशक्तीने त्याच्यात रत्न आले आहे. आयुष्याचा हा अर्थ जर समजला तर आत्महत्या होणार नाहीत. आत्महत्येचा विचार करणारेही आत्महत्या न करता जीवनातील या खऱ्या आयुष्यासाठी आपला जीव ओवाळून टाकतील. हे विश्वच ब्रह्माने भरून टाकतील. दुष्ट विचारही चांगल्या विचारात कसे बदलले इतके सामर्थ्य हा विचारात आहे. यासाठीच आयुष्याचा खरा अर्थ समजून घेऊन जगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा. असे केल्यास सर्वचजण सुखी होतील.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

स्वतःच्या डोळ्यांनी ‘अजत्व’ कसे पाहता येते? ज्ञानेश्वरीतील गूढ संदेश काय?

ज्ञानेश्वरीतील ही ओवी साधकाला बाह्य जगाच्या धावपळीपासून अंतर्मुख शांततेकडे घेऊन जाते. ‘तैसे राहोनि ठायठिके’ म्हणताना…

31 minutes ago

पुण्याच्या भूमीतून डिजिटल विश्वाला नवी दिशा ! BRICS ICT Track 2026 In Pune

पुण्याचे डिजिटल शिखर १७ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत पुण्यात पार पडलेली 'ब्रिक्स आयसीटी…

9 hours ago

विचारांची मशाल घेऊन अंधाराशी लढलेला लोकशिक्षक : डॉ. नरेंद्र दाभोळकर

चमत्कारांच्या नावाखाली होणारी फसवणूक, अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेला समाज, जात-धर्माच्या भिंती आणि प्रश्न विचारण्यालाच लागलेली भीती—या…

23 hours ago

श्रीगुरूंचा महिमा जाणण्याचे साधन कोणते ? Guru Mahima: The Power of Surrender in Dnyaneshwari

गुरूंचा महिमा शब्दांत कितीही सांगितला, तरी तो पूर्णपणे व्यक्त होऊ शकत नाही. कारण गुरू हे…

1 day ago

नबीन यांच्या ‘ड्रीम टीम’मध्ये धक्के अन् संकेत; तावडेंची महाराष्ट्रावर नजर, मालविय बाहेर

स्टेटलाइन भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तब्बल २०९ दिवसांनी नितीन नबीन यांनी पक्षाची नवी…

2 days ago

अशांत जगाचं काहूर शांत करण्याची ताकद कवितेत – कृष्णात खोत

कवयित्री मनीषा पाटील यांच्या 'काहूर' काव्यसंग्रहाचे प्रकाशनप्रकाशन सोहळ्याला अनेक मान्यवर साहित्यिकांची उपस्थिती कणकवलीः'काहूर ' म्हणजे…

3 days ago