ओळख औषधी वनस्पतींची यामध्ये सर्पगंधा या वनस्पतीबद्दल माहिती…

– सतिश कानवडे

संस्थापक,
औषधी वनस्पतीआरोग्य पर्यटन केंद्र,
सावरचोळ, ता. संगमनेर, जि. नगर
मोबाईल 9850139011, 9834884804

वनस्पतीचे नाव- सर्पगंधा

वनस्पतीचे वर्णन

 अपोसायनाशी या वनस्पती कुळातील सर्पगंधा ही झुडूपवर्गीय वनस्पती कोकणात सर्वत्र आढळते. पानाची बाजू हिरवीगार तर खालची बाजू पिवळसर असते. झुपक्याने लालसर फुले येतात. ही वनस्पती ८० ते ९० सेंटीमीटर उंच वाढते. पाने साधे असून गोल आकाराने व पुढे भात्यासारखे टोक असते. फळे कठीण कवच असलेली, मुले मऊ कंदाच्या स्वरूपाचे व सोट मूळ असतात. सालीत ४० ते ५० टक्के अल्काईडस असतात. ताज्या मुळांना उग्र वास येतो. ही औषधी वनस्पती आहे.

औषधी उपयोग

या वनस्पतींच्या मुळाचा उपयोग औषधीमध्ये केला जातो. मुळामध्ये मोठ्या प्रमाणात निरनिराळ्या ३० अल्काईडस शोधून काढण्यास यश मिळाले आहे. त्यामुळे मुळांच्या औषधी उपयोगात वाढ झाली आहे. यांच्या मुळाचा सापासारखा वास येतो. याचा उपयोग सापांना दूर घालवण्यासाठी होतो. पोटदुखी, बाळंतपणातील वेदना, पोटाचे विकार, सर्पदंश यावर गुकर. मुळांमध्ये 1.७ ते ३ टक्के रसरपाइन असते. त्याचा उपयोग रक्तस्राव योग्य ठेवण्यास होतो.

हवामान व जमीन

दमट हवामान सर्पगंधाला मानवते. त्याच्या वाढीसाठी निचरा होणारी जमीन असावी. यासाठी अगदीच हलकी व रेताड जमीन सोडून कोणतीही जमीन चालते. उष्ण व समशीतोष्ण हवामानात याची वाढ चांगली होते. वाळू मिश्रित गाळांची जमीन चांगली.

लागवड

खोडापासून किंवा मुळापासून याची लागवड केली जाते. लागवडीपूर्वी १० ते १५ टन कुजलेले शेणखत हेक्टरी वापरावे. म्हणजे मुळांची वाढ चांगली होण्यास मदत होते.

वरखते व पाणी

लागवडीचे वेळी ३० किलो स्पुरद, ३० किलो पालाश, ३० किलो नत्र लागवडीनंतर एक महिन्याने द्यावे व दोन महिन्यांनी दुसरा नत्राचा हफ्ता द्यावा. म्हणजे पिकाची वाढ चांगली होते. आवश्यकतेनुसार पहिले वर्षी पाणी द्यावे.

मशागत

पिकातील तण काढून द्यावे. जमीन भुसभुशीत ठेवावी. आवश्यकतेनुसार  कोणतेही प्रवाही कीटकनाशक वापरावे. डायथेन झेड ७८ पावसाळ्यापूर्वी ०.२ टक्के  फवारावे.

काढणी

साधारणपणे १८ महिन्यांनी काढणी करावी. मुळे पाण्याने स्वच्छ धुवून घेवून त्याचे १० ते १५ एवढे तुकडे करून पिशव्यांमध्ये भरून ठेवावे.

उत्पन्न

६० ते ७० रुपये किलो दराने विक्री होते. चूर्ण करून विकल्यास १५० ते ४०० रुपये प्रतिकिलो प्रमाणे दर मिळतो.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

3 hours ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

16 hours ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

21 hours ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

1 day ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

1 day ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

2 days ago