Rauvolfia serpentina Snake Root Plant
ओळख औषधी वनस्पतींची यामध्ये सर्पगंधा या वनस्पतीबद्दल माहिती…
– सतिश कानवडे
संस्थापक,
औषधी वनस्पती व आरोग्य पर्यटन केंद्र,
सावरचोळ, ता. संगमनेर, जि. नगर
मोबाईल 9850139011, 9834884804
अपोसायनाशी या वनस्पती कुळातील सर्पगंधा ही झुडूपवर्गीय वनस्पती कोकणात सर्वत्र आढळते. पानाची बाजू हिरवीगार तर खालची बाजू पिवळसर असते. झुपक्याने लालसर फुले येतात. ही वनस्पती ८० ते ९० सेंटीमीटर उंच वाढते. पाने साधे असून गोल आकाराने व पुढे भात्यासारखे टोक असते. फळे कठीण कवच असलेली, मुले मऊ कंदाच्या स्वरूपाचे व सोट मूळ असतात. सालीत ४० ते ५० टक्के अल्काईडस असतात. ताज्या मुळांना उग्र वास येतो. ही औषधी वनस्पती आहे.
या वनस्पतींच्या मुळाचा उपयोग औषधीमध्ये केला जातो. मुळामध्ये मोठ्या प्रमाणात निरनिराळ्या ३० अल्काईडस शोधून काढण्यास यश मिळाले आहे. त्यामुळे मुळांच्या औषधी उपयोगात वाढ झाली आहे. यांच्या मुळाचा सापासारखा वास येतो. याचा उपयोग सापांना दूर घालवण्यासाठी होतो. पोटदुखी, बाळंतपणातील वेदना, पोटाचे विकार, सर्पदंश यावर गुकर. मुळांमध्ये 1.७ ते ३ टक्के रसरपाइन असते. त्याचा उपयोग रक्तस्राव योग्य ठेवण्यास होतो.
दमट हवामान सर्पगंधाला मानवते. त्याच्या वाढीसाठी निचरा होणारी जमीन असावी. यासाठी अगदीच हलकी व रेताड जमीन सोडून कोणतीही जमीन चालते. उष्ण व समशीतोष्ण हवामानात याची वाढ चांगली होते. वाळू मिश्रित गाळांची जमीन चांगली.
खोडापासून किंवा मुळापासून याची लागवड केली जाते. लागवडीपूर्वी १० ते १५ टन कुजलेले शेणखत हेक्टरी वापरावे. म्हणजे मुळांची वाढ चांगली होण्यास मदत होते.
लागवडीचे वेळी ३० किलो स्पुरद, ३० किलो पालाश, ३० किलो नत्र लागवडीनंतर एक महिन्याने द्यावे व दोन महिन्यांनी दुसरा नत्राचा हफ्ता द्यावा. म्हणजे पिकाची वाढ चांगली होते. आवश्यकतेनुसार पहिले वर्षी पाणी द्यावे.
पिकातील तण काढून द्यावे. जमीन भुसभुशीत ठेवावी. आवश्यकतेनुसार कोणतेही प्रवाही कीटकनाशक वापरावे. डायथेन झेड ७८ पावसाळ्यापूर्वी ०.२ टक्के फवारावे.
साधारणपणे १८ महिन्यांनी काढणी करावी. मुळे पाण्याने स्वच्छ धुवून घेवून त्याचे १० ते १५ एवढे तुकडे करून पिशव्यांमध्ये भरून ठेवावे.
६० ते ७० रुपये किलो दराने विक्री होते. चूर्ण करून विकल्यास १५० ते ४०० रुपये प्रतिकिलो प्रमाणे दर मिळतो.
तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…
स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…
आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…
अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…
मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…
वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…