काय चाललयं अवतीभवती

अमरवेल पुस्तकास शब्दांगण पुरस्कार

अमर मुसळे यांच्या ‘अमरवेल’ या ललितलेख संग्रहास “शब्दांगण- उल्लेखनीय ललित साहित्यकृती” राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

अमर मुसळे यांच्या ‘अमरवेल’ या ललितलेख संग्रहास चंद्रपूर जिल्ह्यातील शब्दांगण बहुउद्देशिय ज्ञानप्रबोधिनी संस्थेतर्फे देण्यात येणारा शब्दांगण पुरस्कार जाहीर झाला आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ अनंता सूर यांनी दिली आहे. अमरवेल या ललितलेख संग्रहास मिळालेला हा दुसरा राज्यस्तरीय पुरस्कार असून यापूर्वी गारगोटी (कोल्हापूर) येथील अक्षरसागर साहित्य पुरस्कार – २०२० ने देखील गौरविण्यात आले आहे.

कोल्हापूर येथील विनय पब्लिकेशन्स या संस्थेने प्रकाशित केलेल्या ‘अमरवेल’ या पुस्तकात ३१ ललित लेख समाविष्ट केले आहेत. जेष्ठ सिने पत्रकार राजन कुलकर्णी, पुणे यांनी भारदस्त लेखनशैलीत प्रस्तावना लिहिली आहे. लेखकांनी आपल्या ग्रामीण भागातील लहानपणीच्या अनेक सुंदर आठवणी पासून ते नोकरीपर्यंतच्या अनेक अनुभवांचे वर्णन आपल्या ओघवत्या शैलीमध्ये केलेले आहे. बालपणीचे निरागस आयुष्य, ग्रामीण संस्कृती, निसर्ग, गड-किल्ले भ्रमंती, ग्रामीण सण-उत्सव, ऋतू, व्यक्तिविशेष या सर्वांची मानवी भाव-भावनांशी घातलेली सांगड खूप भाव खाऊन जाते. शाळा, कॉलेज नोकरी निमित्ताने घर व गावापासून दूर राहिल्यानंतर आलेले अनुभव वाचताना वाचक ते स्वतःच अनुभवत असल्याची भावनाच या पुस्तकाचे यश आहे.

कॉलेज व नोकरी निमित्य काही वर्षे कारवार व गोवा याठिकाणी वास्तव्यास असल्याने येथील कोकण, समुद्र, निसर्ग, संस्कृती, स्वभाव यावर देखील काही ललितलेख समाविष्ट केले आहेत.

अमर मुसळे हे मूळचे आकुर्डे, ता. भुदरगड (कोल्हापूर) या गावचे रहिवासी असून सध्या ते रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या ठिकाणी वरीष्ठ संशोधक या पदावर कार्यरत आहेत.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

2 hours ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

15 hours ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

20 hours ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

1 day ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

1 day ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

2 days ago