July 27, 2024
Rauvolfia serpentina Snake Root Plant
Home » सर्पगंधा ( ओळख औषधी वनस्पती )
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सर्पगंधा ( ओळख औषधी वनस्पती )

ओळख औषधी वनस्पतींची यामध्ये सर्पगंधा या वनस्पतीबद्दल माहिती…

– सतिश कानवडे

संस्थापक,
औषधी वनस्पती व आरोग्य पर्यटन केंद्र,
सावरचोळ, ता. संगमनेर, जि. नगर
मोबाईल 9850139011, 9834884804

वनस्पतीचे नाव- सर्पगंधा

वनस्पतीचे वर्णन

 अपोसायनाशी या वनस्पती कुळातील सर्पगंधा ही झुडूपवर्गीय वनस्पती कोकणात सर्वत्र आढळते. पानाची बाजू हिरवीगार तर खालची बाजू पिवळसर असते. झुपक्याने लालसर फुले येतात. ही वनस्पती ८० ते ९० सेंटीमीटर उंच वाढते. पाने साधे असून गोल आकाराने व पुढे भात्यासारखे टोक असते. फळे कठीण कवच असलेली, मुले मऊ कंदाच्या स्वरूपाचे व सोट मूळ असतात. सालीत ४० ते ५० टक्के अल्काईडस असतात. ताज्या मुळांना उग्र वास येतो. ही औषधी वनस्पती आहे.

औषधी उपयोग

या वनस्पतींच्या मुळाचा उपयोग औषधीमध्ये केला जातो. मुळामध्ये मोठ्या प्रमाणात निरनिराळ्या ३० अल्काईडस शोधून काढण्यास यश मिळाले आहे. त्यामुळे मुळांच्या औषधी उपयोगात वाढ झाली आहे. यांच्या मुळाचा सापासारखा वास येतो. याचा उपयोग सापांना दूर घालवण्यासाठी होतो. पोटदुखी, बाळंतपणातील वेदना, पोटाचे विकार, सर्पदंश यावर गुकर. मुळांमध्ये 1.७ ते ३ टक्के रसरपाइन असते. त्याचा उपयोग रक्तस्राव योग्य ठेवण्यास होतो.

हवामान व जमीन

दमट हवामान सर्पगंधाला मानवते. त्याच्या वाढीसाठी निचरा होणारी जमीन असावी. यासाठी अगदीच हलकी व रेताड जमीन सोडून कोणतीही जमीन चालते. उष्ण व समशीतोष्ण हवामानात याची वाढ चांगली होते. वाळू मिश्रित गाळांची जमीन चांगली.

लागवड

खोडापासून किंवा मुळापासून याची लागवड केली जाते. लागवडीपूर्वी १० ते १५ टन कुजलेले शेणखत हेक्टरी वापरावे. म्हणजे मुळांची वाढ चांगली होण्यास मदत होते.

वरखते व पाणी

लागवडीचे वेळी ३० किलो स्पुरद, ३० किलो पालाश, ३० किलो नत्र लागवडीनंतर एक महिन्याने द्यावे व दोन महिन्यांनी दुसरा नत्राचा हफ्ता द्यावा. म्हणजे पिकाची वाढ चांगली होते. आवश्यकतेनुसार पहिले वर्षी पाणी द्यावे.

मशागत

पिकातील तण काढून द्यावे. जमीन भुसभुशीत ठेवावी. आवश्यकतेनुसार  कोणतेही प्रवाही कीटकनाशक वापरावे. डायथेन झेड ७८ पावसाळ्यापूर्वी ०.२ टक्के  फवारावे.

काढणी

साधारणपणे १८ महिन्यांनी काढणी करावी. मुळे पाण्याने स्वच्छ धुवून घेवून त्याचे १० ते १५ एवढे तुकडे करून पिशव्यांमध्ये भरून ठेवावे.

उत्पन्न

६० ते ७० रुपये किलो दराने विक्री होते. चूर्ण करून विकल्यास १५० ते ४०० रुपये प्रतिकिलो प्रमाणे दर मिळतो.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

घोषणा आणि वल्गना…

‘वचन’ दाता गेला…

कागदी फुल…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading