काय चाललयं अवतीभवती

सुधारित नागरिकत्व कायद्याबाबतच्या शंकाचे निरसर करणारे पुस्तक

लेखिका वकील असल्याने पुरावे देण्याची काळजी घेतली आहे. त्याचप्रमाणे पारशी, चकमा, हाजोंग, तिबेटी, नेपाळी, भूतानी या स्थलांतरितांचा प्रश्न कसा वेगळा आहे याचे विवेचन लेखिकेने केले आहे.

डॉ. सच्चिदानंद शेवडे

निर्वासित आणि घुसखोर यातील नेमका फरक आपल्याला माहिती नसती. तो या पुस्तकाने सहज भाषेत आणि उत्तम रीतीने समजावून सांगितलेला आहे. अत्यंत महत्त्वाच्या वेळेला प्रकाशित झालेले व सर्वसामान्य माणसाच्या मनातल्या शंका दूर करणारे, म्हणून या पुस्तकाचे वर्णन करता येईल.

केवळ यूपीएससी आणि एमपीएससी चे विद्यार्थी यांच्यापासून ते सर्वसामान्य वाचकाला सुद्धा निर्वासितांच्या समस्या आणि सुधारित नागरिकत्व कायदा हा नेमका काय आहे हे समजवण्याचा या पुस्तकांनी मोठाच प्रयत्न केलेला आहे. देशाच्या विविध प्रांतांमध्ये घुसखोरी कशी चालू आहे, हे लेखिकेने आकडेवारी व तपशीलानिशी मांडले आहे. प्रत्येक प्रकरणाला भक्कम संदर्भ ग्रंथांचा आधार आहे.

लेखिका वकील असल्याने पुरावे देण्याची काळजी घेतली आहे. त्याचप्रमाणे पारशी, चकमा, हाजोंग, तिबेटी, नेपाळी, भूतानी या स्थलांतरितांचा प्रश्न कसा वेगळा आहे याचे विवेचन लेखिकेने केले आहे. या पुस्तकाला ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांची अत्यंत समर्पक प्रस्तावना आहे. आपल्याकडे ज्या वेळेला हा कायदा लोकशाही मार्गाने मंजूर झाला, त्यावेळी विविध संघटनांनी या कायद्याविरुद्ध निदर्शनं, आंदोलन केली. यामुळे लोकांच्या मनात कुठेतरी काहीतरी शंका निर्माण झाली. या शंका निरसनाचा उत्तम प्रयत्न या पुस्तकाने निश्चितच होईल.

अतिशय सोप्या भाषेत सतरा प्रकरणे, यापैकी काही प्रकरणांच्या पोटात उपप्रकरणे अशी मांडणी आहे. यात विषय प्रवेश, पार्श्वभूमी, राष्ट्र उभारणी आणि त्यामागील विचारधारा, आंतरराष्ट्रीय निर्वासित कायदे/ संकेत आणि नागरिकत्व सुधारणा, भारतीय कायदे, बांगलादेशी निर्वासित आणि अवैध घुसखोर, अफगाणिस्तान – इतिहास आणि सद्य:स्थिती, भारतातील इतर स्थलांतरित, विरोध आणि निदर्शने, विरोध आणि तथ्य, ईशान्येकडील विरोध आणि तथ्य, विरोधाची कारणे आणि संविधानिकता, जागतिक दबाव – रवानगी की नागरिकत्व, काही प्रभावशाली व्यक्तिमत्त्वाच्या मते…, सर्वसामान्य स्थलांतरण की विशिष्ट स्थिती, थिओक्रटिक स्टेट विरुद्ध धर्मनिरपेक्ष भारत, उपसंहार आणि भारतीय राष्ट्रविचार अशा १७ प्रकरणांमध्ये मोठ्या कुशलतेने प्रवाही भाषेत लेखिकेने हा पट विणला आहे. त्यामुळे मोठा विषय खूप सोपा करून त्यांनी सांगितला आहे.

पुस्तकाचे नाव – निर्वासितांच्या समस्या आणि सुधारित नागरिकत्व कायदा – मिथ्य आणि सत्य

लेखक विभावरी बिडवे

प्रकाशक कृष्णा पब्लिकेशन्स

पृष्ठे – २२१ मूल्य – २९९

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

1 hour ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

14 hours ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

19 hours ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

1 day ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

1 day ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

2 days ago