काय चाललयं अवतीभवती

कविवर्य ए. पां. रेंदाळकर वाचनालयाचे सन 2024 चे साहित्य पुरस्कार जाहीर

रेंदाळ ( जि. कोल्हापूर ) – येथील कविवर्य ए. पां. रेंदाळकर वाचनालयाच्या वतीने 2024 चे विविध साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले.

वाचनालयाच्या वतीने कोल्हापूर परिसरातील ज्येष्ठ आणि उल्लेखनीय अशा दोन लेखकांचा त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल सन्मान करण्यात येतो. यावर्षी ज्येष्ठ लेखक वसंत खोत ( कोल्हापूर ) आणि नव्या पिढीतील आश्वासक लेखक मारुती मांगोरे ( करंजफेन, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर ) या दोघांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय स्थानिक कवी महंमद नाईकवाडे ( रेंदाळ ) यांनाही त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.

वसंत खोत ( जन्मः1959 ) यांनी कथा, कादंबरी आणि अनुवाद अशा प्रकारांत संख्येने मोजकेच पण लक्षणीय असे लेखन केलेले आहे. त्यांचे आतापर्यंत सात ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. खोत यांचे ‘कृष्णछाया’ (2006) हा कथासंग्रह, ‘दाह’ (1992) ही कादंबरी तर , ‘भुईभिंगरी’ (2021) हे स्वकथन विशेष प्रसिद्ध आहे. याबरोबरच ‘खरे सुख व इतर कथा’ (2014) हा लियो टॉलस्टायच्या कथांचा अनुवाद, ‘महाकवी कालिदासांची नाटके’ (2010), ‘मानवतेचे उपासक’ (2007) इ. इतर ग्रंथ प्रकाशित आहेत.

मारुती मांगोरे ( जन्मः 1969 ) हे नव्वदीनंतरच्या कालखंडातील कथा व कादंबरी या प्रकारांतील महत्त्वाचे आणि एक आश्वासक नाव. ‘वंदोस’ (2011) कथासंग्रह आणि ‘मांजरखिंड’ (2024) कादंबरी, ही त्यांची विशेष चर्चित दोन पुस्तके. याबरोबरच ‘व्याकुळ धरणी’ (1999) आणि ‘गणगोत ‘ (2014) हे त्यांचे कवितासंग्रहही प्रकाशित आहेत.

महंमद नाईकवाडे (1958) यांचे शिक्षण इयत्ता सहावीपर्यंत झाले असून ते यंत्रमागावर मजूरीकाम करतात. त्यांनी विपुल प्रमाणात काव्यलेखन केले असून आतापर्यंत ‘आमराई’, ‘जाच’, ‘गावरान’, ‘वेदना’ आणि ‘माझा गाव माझी गाणी’ हे त्यांचे पाच कवितासंग्रह प्रकाशित आहेत. त्यांचे ‘चांगभलं रे जोतिर्लिंगा’, ‘गजर जोतिबाचा’ या ध्वनिमुद्रिकांबरोबरच लावण्या, पोवाडे असे विविधांगी लेखनही प्रकाशित आहे.



सन 2024 च्या ग्रंथ पुरस्कारांसाठी कविता या प्रकारातील पुरस्कार विलास माळी ( गडहिंग्लज, जि. कोल्हापूर ) यांच्या ‘झांझरझाप’ ( कॉपर कॉईन प्रकाशन, दिल्ली ) या कवितासंग्रहास जाहीर झाला आहे. ‘कादंबरी’ या प्रकारासाठीचा पुरस्कार स्मिता पाटील ( मोहोळ, जि. सोलापूर ) यांच्या ‘मातीला पंख फुटताना’ ( दिलीपराज प्रकाशन, पुणे ) या कादंबरीस, तर कथासंग्रहासाठीचा पुरस्कार द. तु. पाटील ( बेळगाव ) यांच्या ‘शेतसरी’ ( मौज प्रकाशन, मुंबई ) या ग्रंथाला जाहीर करण्यात आला आहे. रोख रक्कम रुपये पाच हजार आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारांसाठी महाराष्ट्रातील सुमारे सत्तरहून अधिक लेखक- कवींनी आपली पुस्तके पाठविली होती.

या पुरस्कार निवड समितीत डॉ. रफीक सूरज, डॉ. गिरीश मोरे आणि डॉ. गोपाळ महामुनी यांनी काम पाहिले, अशी माहिती वाचनालयाचे विद्यमान अध्यक्ष आर. जी. पाटील यांनी दिली आहे.

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

Dnyneshwari Tips On Karma : कर्म सोडू नका तर त्यातला अहंकार सोडा अन् चमत्कार पाहा

आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…

11 hours ago

शेतमालास उत्पादनखर्चावर आधारित बाजारभाव यासंदर्भात हवा कायदा Need of Law For Agricultural Products

अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…

1 day ago

विरोधकांचा आवाज क्षीण झालायं… की सरकार अधिक बळकट झालंय ? Monsoon session of the legislature

मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…

2 days ago

इतिहास वाचनातूनच संस्कार अन् सुराज्याची जडणघडण : संयोगिताराजे छत्रपती Good State Formed Through Reading History

वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…

2 days ago

अर्पणामागचा भाव : शुद्ध भक्तितत्त्वाचा ज्ञानेश्वरीतील अमृतसंदेश Pure Bhakti from Dnyaneshwari |

हजारो रुपयांचा नैवेद्य अर्पण करणारा भक्त आणि प्रेमाने एक तुळशीपत्र वाहणारा भक्त—भगवंताच्या दृष्टीने यांपैकी मोठा…

2 days ago

आकाशातील ढग व युद्धाच्या धगीत अडकलेली अर्थव्यवस्था ! an economy caught in the grip of war

विशेष आर्थिक लेख रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने नुकताच देशातील आर्थिक सद्यस्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला.…

3 days ago