काय चाललयं अवतीभवती

संस्कृती प्रतिष्ठानचे साहित्य पुरस्कार जाहीर

२१ डिसेंबरला पाचव्या संस्कृती साहित्य संमेलनात इचलकरंजी येथे वितरण

इचलकरंजी : येथील संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने दिले जाणारे २०२५ सालचे संस्कृती साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. साहित्याच्या विविध प्रांतांत मोलाचे योगदान देणाऱ्या साहित्यिकांची या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे.

यंदाचे लक्ष्मण कांबळे (जिंदा) स्मृती संस्कृती कादंबरी पुरस्कार कोल्हापूर येथील प्रा. डॉ. रमेश साळुंखे यांना त्यांच्या ‘भिंगुळावाणे दिवस’ या कादंबरीसाठी जाहीर झाला आहे. तर दगडूलाल मर्दा स्मृती संस्कृती समीक्षा पुरस्कार समीक्षक जिजा शिंदे यांना ‘श्याम मनोहर : साहित्य आणि समीक्षा’ या समीक्षा ग्रंथासाठी प्रदान करण्यात येणार आहे. तर वसंत-कमल स्मृती संस्कृती काव्य पुरस्कार कवी उदय जाधव यांना ‘पांढऱ्याशुभ्र स्क्रीनवर’ या कवितासंग्रहासाठी जाहीर करण्यात आला आहे.

या तिन्ही पुरस्कारांचे स्वरूप प्रत्येकी ५,००० रुपये रोख, शाल, स्मृतिचिन्ह व ग्रंथ असे आहे. या पुरस्कारांची निवड निवड समितीचे अध्यक्ष प्रा. रणधीर शिंदे (समीक्षक व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर मराठी विभाग प्रमुख) तसेच अंजली कुलकर्णी (समीक्षक व कवयित्री, पुणे) यांनी केली आहे.

हे पुरस्कार २१ डिसेंबर रोजी इचलकरंजी येथे होणाऱ्या ५ व्या संस्कृती साहित्य संमेलनात प्रदान करण्यात येणार आहेत. या संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी व समताधिष्ठित विचारांचे लेखक सायमन मार्टिन (मुंबई) आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून अमरसिंह माने, तर उद्घाटक म्हणून उद्योगपती शामसुंदर मर्दा लाभणार आहेत.

संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात होणारे कविसंमेलन कवी चंद्रकांत पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तसेच महावीर कांबळे यांच्या ‘खुरपं’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मदन कारंडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या साहित्य संमेलनास व पुरस्कार वितरण सोहळ्यास साहित्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्कृती प्रतिष्ठानच्या सचिव अनुराधा काळे यांनी केले आहे.

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

50 minutes ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

9 hours ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

10 hours ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

19 hours ago

Weather Forecast : १७ ऑगस्टपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर…

20 hours ago

फिदेलसोबत १०० वर्षे : अमेरिकन दादागिरीसमोर न झुकलेल्या क्रांतिकारकाची कहाणी

फिदेल कास्त्रो यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अखिल भारतीय किसान सभेकडून अभिवादन नवी दिल्ली :क्यूबाच्या क्रांतीचे कमांडर-इन-चीफ, जननेते…

1 day ago