📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 1, 2026
काय चाललयं अवतीभवती

नागपूर श्रीगुरुदेव सेवाश्रमाचे ग्रामजयंती पुरस्काराने विविध संस्था व व्यक्तींचा गौरव

Gramjayanti Awards ceremony at Gurudev Sevashram Nagpur honouring social workers and institutions

नागपूर : श्रीगुरुदेव सेवा मंडळ नागपूरच्या वतीने श्री गुरुदेव सेवाश्रमाच्या सभागृहात ग्रामजयंती पुरस्काराचे वितरण करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे यंदाही ग्रामजयंती निमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांच्या कार्याचा गौरव पुरस्कार देऊन आ. प्रवीण दटके, विधानपरिषद सदस्य आ.अभिजीत वंजारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

अध्यक्षस्थानी सेवाश्रमाचे अध्यक्ष एड. अशोक यावले होते तर प्रसिद्ध पुरोगामी विचारवंत देविदास घोडेस्वार, नगरसेवक कांचन चव्हाण , सेवाश्रमाचे सचिव श्री. विठ्ठल पुनसे, सियाराम चावके, राष्ट्रसंत अभ्यास मंडळाचे दिलीप सुरकार, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, सौ.जावळे, आदींची उपस्थिती होती. चंद्रपूर येथील राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समितीला राष्ट्रसंत साहित्य प्रचार प्रसार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

१९९३ पासून ही समिती ग्रामगीता प्रणित ग्रामसुधारणावादी, विवेकवादी, सेवा कार्याचा प्रचार प्रसार करीत आहे. आजवर या समितीने २० राज्यस्तरीय राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनाचे यशस्वी आयोजन महाराष्ट्रात केले तर त्यापैकी तीन आंतरराज्य संमेलने तेलंगण स्टेट मध्ये घेतलेली आहे.समितीचे उपाध्यक्ष इंजि. विलासराव उगे, कोषाध्यक्ष विलास चौधरी, संघटक संजय वैद्य, सदस्य प्रा. नामदेव मोरे यांनी सदर पुरस्कार संस्थेच्या वतीने स्विकारला.

आ. दटके आणि आ. वंजारी यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्याची प्रासंगिकता यावर प्रकाश टाकून राष्ट्रसंताच्या कार्याचा प्रचार प्रसार करणा-या संस्थेचे कौतुक केले.ग्राम.ंनी बंडोपंत बोढेकर यांनी चंद्रपूर व गडचिरोली येथील राष्ट्रसंतांच्या विचारानुरूप कार्य करणाऱ्या संस्थांची माहिती दिली. देविदास घोडेस्वार यांनी भारतीय संविधान आणि ग्रामगीता या ग्रंथातील मौलिकता व साम्यता यावर प्रकाश टाकला.

यावेळी राष्ट्रसंत विचार प्रसार सेवा पुरस्कार (शहर विभाग) श्री . आकाश निस्ताने, नागपूर यांना, तर ग्रामीण विभागासाठी श्री पुरषोत्तम बैसकार, यवतमाळ यांना प्रदान करण्यात आला, तर
राष्ट्रसंत साहित्य विचार प्रसार सेवा पुरस्कार (संस्था – शहर विभाग) राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद, चंद्रपूर यांना, तसेच संस्था – दुर्गम भाग विभागासाठी श्रीगुरुदेव व्यायाम शिक्षण व सेवा मंडळ, गडचिरोली यांना प्रदान करण्यात आला आहे.

पत्रकारिता क्षेत्रात देशभक्त वामनराव गावंडे स्मृती पत्रकार पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार संध्या राजूरकर (दैनिक बहुजन सौरभ – निवासी संपादक) यांना, तर पत्रकार श्याम लोहबरे स्मृती पुरस्कार श्री अनिल शोभा फेकरीकर (तरुण भारत – शहर संपादक) यांना प्रदान करण्यात आला.

संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल संगीतरत्न अन्नाजी माहुलकर स्मृती पुरस्कार श्री . प्रमोद पोकळे, बडनेरा (प्रयोगशील संगीतकार) यांना प्रदान करण्यात आला . तसेच आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार-आदर्श ग्रामपंचायत कवठा (म्हसाळा) यांना देण्यात आला आहे. सूत्रसंचालन राजेश कुंभलकर यांनी केले तर आभार प्रदर्शन राष्ट्रसंत साहित्य अभ्यास मंडळाचे दिलीप सुरकार गुरुजी नागपूर यांनी केले.

Related posts

स्वांत सुखाय वृत्तीमुळे भाषेचे नुकसान

डॉ. चंद्रकांत पोतदार यांच्या परिघाच्या रेषेवर या समीक्षा ग्रंथाला पुरस्कार

महात्मा फुले मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रशांत देशमुख यांची निवड

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406