हा विष्णू अवतार असूनही चतुर्भुज नाही. त्याच्या हातात शस्त्र नाही. त्याला या अवतारात शस्त्राची आवश्यकता वाटत नाही. कारण त्याने सगळ्या शत्रूंचा निःपात केला आहे. आणि केवळ भक्तांना भेटण्यासाठी, त्यांच्याशी हितगूज करण्यासाठीच हा अवतार धारण केला आहे.

मीरा उत्पात-ताशी. 9403554167.

विठ्ठलाच्या पावलांवर ध्वजांकुशवज्रादि चिन्हे आहेत. तळपायावरचा ध्वज म्हणजे भक्तांना भवसागरातून पार नेणाऱ्या जहाजावरचे शीड आहे. मत्त हत्ती प्रमाणे बलाढ्य असणाऱ्या मनाचा निग्रह करणारा अंकुश आहे. पापांचे पर्वत छेदून टाकणारे वज्र आहे.

विठ्ठलाच्या पायात तोडे आहेत. संकल्प आणि विकल्प गेल्यावर हरिचरणाची उपासना करणाऱ्या भक्तांना जन्ममरणाचा फेरा नाही असे पायातले तोडे सांगतात. दोन्ही पायांच्या मध्ये पितांबराचा सोगा आहे. कमरेला मेखला आहे. त्याने दोन्ही हात कमरेवर ठेवले आहेत. कारण
प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां।
नितंबः कराभ्यां धृतो येन तस्मात्।
विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशः।

आपल्या प्रिय भक्तांना जीवनरूपी भवसागर कमरेइतकाच उंच असल्याने सहज पार करता येईल हे समजावून सांगण्या साठी त्याने कमरेवर हात ठेवले आहेत.

हा विष्णू अवतार असूनही चतुर्भुज नाही. त्याच्या हातात शस्त्र नाही. त्याला या अवतारात शस्त्राची आवश्यकता वाटत नाही. कारण त्याने सगळ्या शत्रूंचा निःपात केला आहे. आणि केवळ भक्तांना भेटण्यासाठी, त्यांच्याशी हितगूज करण्यासाठीच हा अवतार धारण केला आहे. त्यामुळे त्याच्या हातात कोणतेही शस्त्र नाही. तो द्विभूज आहे.

डाव्या हातात शंख आहे. शंख हे ज्ञानाचे प्रतिक आहे. उजव्या हातात कमळपुष्प आहे. ते पावित्र्य आणि मांगल्याचे प्रतिक आहे. आपल्याला भेटायला येणाऱ्या भक्तांचे स्वागत करण्यासाठी त्याने ते हातात घेतले आहे. कमरेच्या डाव्या बाजूला अर्धांगी रुक्मिणीला बसायची जागा आहे.
पोटावर त्रिवळी आहे.

ब्रह्मदेवाचे उत्पत्ती स्थान असलेले नाभिस्थान आहे. मनगटात मणिबंध आहेत. दंडांमध्ये बाजूबंद आहेत. गळ्यात कौस्तुभ मण्यांचा हार आहे. यातील मणी म्हणजे त्याच्या पदी लीन झालेले हृदयातील संत आहेत. हृदयावर श्रीवत्सलांछन (भृगुऋषींनी मारलेल्या चरणाची खूण ) आणि श्रीनिकेतन (लक्ष्मीचे निवासस्थान)आहे.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

12 hours ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

17 hours ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

1 day ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

1 day ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

1 day ago

Weather Forecast : १७ ऑगस्टपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर…

1 day ago