गप्पा-टप्पा

सध्या जाणवणारा उकाडा कशामुळे ?

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणीशेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

विशाल शिर्के – भयंकर उकाडा कशामुळे ?

माणिकराव खुळे – पावसाळी हंगामात अरबी समुद्रावरून वाहणारे वारे पश्चिमी वाऱ्यांची दिशा बदलून वाऱ्यांचा वहन पॅटर्न ३ किमी. उंचीपर्यंत पूर्णपणे ९० अंशांत बदलून महाराष्ट्रावर वारे सध्या ते उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत आहे. शिवाय हंगामाप्रमाणे भाग बदलत प्रत्येक काही अंतरावर अपेक्षित असलेला हवेच्या दाबातील फरक सध्या नामशेष झाला आहे  होवून केवळ एकसमान जाणवत असलेला १००६ मिलिबार ( हेक्टपासकल) इतका हवेचा दाब जाणवत आहे. वाऱ्याचा वेग मंदावला आहे. हवेला वहन नाही. हवेचे पार्सल एकजिनसी बंधित होवून उष्णतेचे संचयन त्यात घडून येत आहे. ह्याचाच अर्थ महाराष्ट्रावर प्रेशर ग्रेडीएन्ट -हवेच्या दाबाची चढ-उताराची क्रमिकता,  किंवा – हवेच्या दाबाचा ढाळ किंवा चढ पूर्णपणे नामशेष झाली आहे. शिवाय ढगाळ वातावरणामुळे रात्रीची जमिनीतून बाहेर पडणाऱ्या उष्णतेला अटकाव होत आहे. ह्या परिणामातून सध्या भयंकर उष्णतेतुन महाराष्ट्रात उकाडा जाणवत आहे.

प्रश्न – जोरदार पावसाची शक्यता कोठे कोठे आहे ?

माणिकराव खुळे – विदर्भ वगळता, मुंबई कोकणसहित संपूर्ण महाराष्ट्रात रविवार ( दि. २५ ऑगस्ट ) पर्यन्त मध्यम पावसाचीच शक्यता जाणवते. मराठवाड्यात मात्र पुढील पाच दिवस म्हणजे गुरुवार २२ ऑगस्ट पर्यंतच मध्यम पावसाची शक्यता जाणवते. त्यानंतर तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. विदर्भातील ११ जिल्ह्यात मात्र आजपासूनच संपूर्ण आठवडा. म्हणजे रविवार (दि. २५ ऑगस्ट) पर्यन्त जोरदार पावसाची शक्यता जाणवते.

प्रश्न – वाढलेले उन्हाचे तापमान कोठे कसे राहील ?

माणिकराव खुळे –  संपूर्ण महाराष्ट्रात पुढील ३ दिवस म्हणजे मंगळवार ( दि. १९ ऑगस्ट) पर्यन्त दुपारचे ३ चे कमाल तापमान हे  ३२ डिग्री से.ग्रेड च्या आसपास म्हणजे  सरासरी कमाल तापमानापेक्षा ३ ते ६ डिग्री से.ग्रेड ने अधिक जाणवू शकते. विशेषतः संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव अश्या २१ जिल्ह्यात तर हे तापमान सरासरीपेक्षा ५ ते ६ डिग्रीने अधिक जाणवेल. उर्वरित मराठवाडा व संपूर्ण विदर्भातील १५ जिल्ह्यात हे तापमान २ ते ३ डिग्रीने अधिक जाणवेल. मुंबई, रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी, नगर, पुणे, सातारा ह्या ८ जिल्ह्यात उन्हाची काहिली अधिक जाणवणार.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

विचारांची मशाल घेऊन अंधाराशी लढलेला लोकशिक्षक : डॉ. नरेंद्र दाभोळकर

चमत्कारांच्या नावाखाली होणारी फसवणूक, अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेला समाज, जात-धर्माच्या भिंती आणि प्रश्न विचारण्यालाच लागलेली भीती—या…

41 minutes ago

श्रीगुरूंचा महिमा जाणण्याचे साधन कोणते ? Guru Mahima: The Power of Surrender in Dnyaneshwari

गुरूंचा महिमा शब्दांत कितीही सांगितला, तरी तो पूर्णपणे व्यक्त होऊ शकत नाही. कारण गुरू हे…

11 hours ago

नबीन यांच्या ‘ड्रीम टीम’मध्ये धक्के अन् संकेत; तावडेंची महाराष्ट्रावर नजर, मालविय बाहेर

स्टेटलाइन भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तब्बल २०९ दिवसांनी नितीन नबीन यांनी पक्षाची नवी…

1 day ago

अशांत जगाचं काहूर शांत करण्याची ताकद कवितेत – कृष्णात खोत

कवयित्री मनीषा पाटील यांच्या 'काहूर' काव्यसंग्रहाचे प्रकाशनप्रकाशन सोहळ्याला अनेक मान्यवर साहित्यिकांची उपस्थिती कणकवलीः'काहूर ' म्हणजे…

2 days ago

ज्वालामुखीच्या धगधगत्या पोटात… हवाईची अद्भुत सफर

एका भटक्याची डायरी प्रशांत महासागराच्या अथांग निळाईत वसलेली हवाईची बेटे म्हणजे निसर्गाच्या अद्भुत प्रयोगशाळाच! कुठे…

2 days ago

वर्षा ऋतूत आरोग्याची कोणती काळजी घ्यावी ? Dr Radha Khadakkar Advice

पावसाळ्यात वातावरणातील गारवा, सततचा ओलावा आणि बदलते हवामान यामुळे पचनशक्ती मंदावते आणि शरीराची प्रतिकारक्षमताही प्रभावित…

3 days ago