शेती पर्यावरण ग्रामीण विकास

अंजिराच्या ज्यूसची पहिली खेप पोलंडला रवाना

कृषी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने (APEDA) अंजिराच्या ज्यूसची पहिली खेप पोलंडला केली रवाना

कृषी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने (अपेडा) भारतातील पहिलेच रेडी टू ड्रिंक अर्थात तयार पेय असलेल्या अंजिराच्या ज्यूसची पहिली खेप पोलंडला रवाना केली आहे. हे ज्यूस जीआय मानांकित पुरंदरच्या अंजिरांपासून तयार करण्यात आले आहे. अपेडाचे अध्यक्ष अजिंक्य देव यांनी 1 ऑगस्ट 2024 रोजी जर्मनी मधील हॉलंड मार्गे जाणाऱ्या या ज्यूसच्या पहिल्या ऐतिहासिक शिपमेंटला सर्व भागधारकांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवला. या शिपमेंटमुळे जागतिक स्तरावर भारताच्या अद्वितीय कृषी उत्पादनांना चालना देण्यात एक महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे.

नवी दिल्लीमधील ग्रेटर नोएडा येथील अपेडाच्या दालनात आयोजित करण्यात आलेल्या SIAL 2023 या काय्रक्रमात अतिशय नाविन्यपूर्ण अशा अंजीर ज्यूसच्या निर्मितीचा प्रवास सुरु झाला. यावेळी उपलब्ध आंतरराष्ट्रीय व्यापार संधींमुळे या उत्पादनाला जागतिक बाजारपेठेत प्राथमिक प्रवेश करण्याचा मार्ग मिळाला. पुरंदर हायलँड्स फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने तयार केलेल्या अंजिराच्या ज्यूसने या समारंभात सर्वांचे लक्ष तर वेधून घेतलेच शिवाय पुरस्कार देखील मिळवला आणि आंतरराष्ट्रीय बाजारात देखील तयारीनिशी उतरण्याची क्षमता सिद्ध केली.

या उत्पादनाचा विकास आणि निर्यातीसाठी अपेडाचा सातत्यपूर्ण पाठिंबा आणि सहाय्य महत्त्वपूर्ण ठरले आहे. 2022 मध्ये हॅम्बर्गला केलेल्या पुरंदरच्या जी आय मानांकित ताज्या अंजिराच्या पहिल्या निर्यातीनंतर अपेडाने या अल्पभूधारक शेतकऱ्यांसोबत कायम संपर्क ठेवून काम केले आहे. या उत्पादनाला तात्पुरते पेटंट मिळाले असून यातून कृषी क्षेत्रातील नवोन्मेष दिसून येतो.

इटलीतील रिमिनी येथे मॅकफ्रूट 2024 मध्ये अपेडाच्या सहाय्याने अंजीराचा रस ठेवण्यात आला होता आणि त्याचा जागतिक स्तरावर आणखी विस्तार केला गेला. या उपक्रमाला खरेदीदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. पोलंडमधील व्रोक्लॉ येथील एमजी सेल्स एसपीने याबाबत चौकशी केली ज्यामुळे ही महत्त्वपूर्ण निर्यात शक्य झाली.

या उल्लेखनीय कामगिरीमुळे भारतीय कृषी उत्पादनातील क्षमतेचे दर्शन घडतेच शिवाय कृषी निर्यातीच्या मूल्यवर्धनामध्ये संशोधन आणि विकास यांचे महत्व अधोरेखित होते. या कामगिरीमुळे भारतीय कृषी उत्पादनांची क्षमता दिसून येते आणि शाश्वत कृषी पद्धती आणि निर्यातीला चालना देण्यात कृषी उत्पादन संस्थांची महत्वपूर्ण भूमिका देखील अधोरेखित होते.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

श्रीगुरूंचा महिमा जाणण्याचे साधन कोणते ? Guru Mahima: The Power of Surrender in Dnyaneshwari

गुरूंचा महिमा शब्दांत कितीही सांगितला, तरी तो पूर्णपणे व्यक्त होऊ शकत नाही. कारण गुरू हे…

10 hours ago

नबीन यांच्या ‘ड्रीम टीम’मध्ये धक्के अन् संकेत; तावडेंची महाराष्ट्रावर नजर, मालविय बाहेर

स्टेटलाइन भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तब्बल २०९ दिवसांनी नितीन नबीन यांनी पक्षाची नवी…

1 day ago

अशांत जगाचं काहूर शांत करण्याची ताकद कवितेत – कृष्णात खोत

कवयित्री मनीषा पाटील यांच्या 'काहूर' काव्यसंग्रहाचे प्रकाशनप्रकाशन सोहळ्याला अनेक मान्यवर साहित्यिकांची उपस्थिती कणकवलीः'काहूर ' म्हणजे…

2 days ago

ज्वालामुखीच्या धगधगत्या पोटात… हवाईची अद्भुत सफर

एका भटक्याची डायरी प्रशांत महासागराच्या अथांग निळाईत वसलेली हवाईची बेटे म्हणजे निसर्गाच्या अद्भुत प्रयोगशाळाच! कुठे…

2 days ago

वर्षा ऋतूत आरोग्याची कोणती काळजी घ्यावी ? Dr Radha Khadakkar Advice

पावसाळ्यात वातावरणातील गारवा, सततचा ओलावा आणि बदलते हवामान यामुळे पचनशक्ती मंदावते आणि शरीराची प्रतिकारक्षमताही प्रभावित…

3 days ago

नोकरीच्या शोधात शहराकडे जाण्याऐवजी गावातच उद्योग कसा उभारता येईल ?

धान्यापासून उद्योगाकडे : एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योजकतेला नवी दिशा बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि तांदूळ…

3 days ago