विश्वाचे आर्त

आव्हान स्वीकारून दूर करा ज्ञानाच्या मार्गातील अडथळे

जनतेला संभ्रमावस्थेत ठेवून स्वतःचा कार्यभाग साधला जात आहे. ज्ञानाच्या मार्गात अडथळे उभे करून विकासापासून वंचित ठेवण्याचे प्रयत्न केले जातात. जनता ज्ञानी झाली तर त्याचा तोटा आपणाला होईल अशी भिती त्यांना वाटते आहे. यासाठीच आपण जागरूक होऊन ज्ञानाच्या मार्गात निर्माण केले जाणारे अडथळे दूर करायला हवेत. ज्ञानाच्या मार्गात अडथळे निर्माण केले तरी ते एक आव्हान म्हणून त्याचा स्वीकार करायला हवा.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

कां उपजोंचि जें न लाहे । जें उपजलेंही अव्हांटा सूये ।
तें ज्ञानीं विरूद्ध काय आहें । हें जाणावें की ।। ५६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा

ओवीचा अर्थ – अथवा जें ज्ञानास उत्पन्नच होऊ देत नाहीं, अथवा ज्ञान उत्पन्न झालें असतां जे ज्ञानाला भलत्या मार्गात घालतें असें ज्ञानाच्या विरुद्ध काय आहे, हे समजले पाहिजे.

झपाट्याने बदलत चाललेल्या या जगात पुराणातील तत्त्वज्ञान उगाळत बसून काय मिळणार ? तंत्रज्ञानाच्या बदलाचा वेग राखता आला नाही तर आपले जगणेही मुश्कील होणार आहे. असे विचार मांडले जातात. पण इतिहासातूनच अनेक गोष्टी शिकता येतात. यासाठी इतिहास हा तितकाच महत्त्वाचा असतो. कारण तो जगण्याची उर्जा देत असतो. आध्यात्मिक संस्कृतीचे संवर्धन हे यासाठीच गरजेचे आहे. आध्यात्मिक ज्ञान हे जुने नसते. ते नित्य नुतन असते. कोणत्याही परिस्थितीत त्याचा उपयोग होऊ शकतो. ते नित्य मार्गदर्शक ठरते. या ज्ञानाचे हे महत्त्व जाणून घेणे गरजेचे आहे.

जगात भौतिक आणि सांस्कृतिक बदल मोठ्या प्रमाणात झाले आहेत. माणसाच्या गरजा आता वाढल्या आहेत. अन्न, वस्त्र, निवारा या गरजा भागवण्यासाठी अनेक स्त्रोत उत्पन्न झाले आहेत. पण माणूस या मायावी जगात गुरफटला गेला आहे. अशाने तो ज्ञानापासून दूर गेला आहे. मनोरंजनाची साधने इतकी झाली आहेत की त्याचे मन त्यातून बाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. त्याला त्याची जाणीव करून देऊनही तो त्यातच गुरफटलेला आहे. याला टाळूनही विकास करणे आता अशक्य वाटत आहे. इतकी या गोष्टीची सवय त्याला जडली आहे. ज्ञान उत्पन्नच होऊ नये यासाठी निर्माण केलेला हा अडथळा दूर सारता आला तरच खऱ्या अर्थाने विकासाची बीजे रोवता येणार आहेत.

आत्मज्ञानाच्या विकासात येणारे अडथळे दूर सारण्यासाठी ज्ञानाची नित्य येणारी अनुभुती अनुभवायला हवी. यासाठी अवधान हे महत्त्वाचे आहे. येणारे अनुभव अवधानाने समजून घेऊन विकास साधायला हवा. सध्या सर्वच क्षेत्रात लक्ष्य विचलित करण्याचे प्रयत्न जाणून बोजून केले जातात. मग ते राजकारण असो वा अन्य कोणतेही क्षेत्र. जनतेला संभ्रमावस्थेत ठेवून स्वतःचा कार्यभाग साधला जात आहे. ज्ञानाच्या मार्गात अडथळे उभे करून विकासापासून वंचित ठेवण्याचे प्रयत्न केले जातात. जनता ज्ञानी झाली तर त्याचा तोटा आपणाला होईल अशी भिती त्यांना वाटते आहे. यासाठीच आपण जागरूक होऊन ज्ञानाच्या मार्गात निर्माण केले जाणारे अडथळे दूर करायला हवेत. ज्ञानाच्या मार्गात अडथळे निर्माण केले तरी ते एक आव्हान म्हणून त्याचा स्वीकार करायला हवा. सकारात्मक विचाराने त्याकडे पाहून आपली प्रगती साधायला हवी. पण यासाठी जेवढे जागरूक, दक्ष अन् सावध राहाता येईल तितके आपण राहीले पाहीजे.

ज्ञानी होत आहेत. त्यांच्यात ज्ञान उत्पन्न होत आहे हे पाहून त्यांना भलत्याच मार्गाला लावण्याचे प्रकारही केले जातात. मुद्दाम तसे प्रयत्न केले जातात. हा डाव ओळखून आपण यावर सावध होत योग्य तोडगा काढायला हवा. या घटनेत स्वतःचा संयम ढळणार नाही याची काळजी घ्यायला हवी. संयम ढळल्यास आपल्याला अपयशाची भिती वाटू शकते. पण कोणताही नकारात्मक विचार मनात येणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

रात्रदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असे समजून आपण कार्यरत राहायला हवे. ज्ञानप्राप्तीमध्ये उत्पन्न होणारे अज्ञानाचे अडथळे ज्ञानाच्या तलवारीने कापायला हवेत. हे एक युद्ध आहे, असे समजून त्याविरुद्ध लढा उभा करायला हवा. लढाईत सदैव सतर्क राहावे लागते. कोठून हल्ला होईल हे सांगता येत नाही. कारण शत्रू काही सांगून हल्ला करत नाही. यासाठीच शत्रूच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवावे लागते. ज्ञानाच्या मार्गात उत्पन्न होणाऱ्या अडथळ्यावरही अशीच बारीक नजर असायला हवी. ज्ञानाच्या विरुद्ध काय आहे हे जाणून घेऊन त्यावर मात करण्यासाठी समर्थ असायला हवे.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

हळदीचे कंद सडतायत, पीक मरतंय? कारणे ओळखा, वेळीच करा प्रभावी व्यवस्थापन ! Turmeric Rhizome Rot and Wilt

हळद पिकातील कंद सड व मर : कारणे, लक्षणे आणि प्रभावी व्यवस्थापन हळद आणि अद्रक…

1 day ago

सृष्टी निर्माण झाली कशी? श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेले गूढ काय?

सृष्टीकडे पाहिले की असंख्य रूपे, जीव, शक्ती आणि घडामोडी आपल्याला दिसतात. या विराट पसाऱ्यामागे नेमकी…

3 days ago

सर्व महामानवांच्या सामर्थ्याची बेरीज म्हणजे भारत: डॉ. श्रीपाल सबनीस

कोल्हापूर : भारत हा कोणत्याही एका महामानवाचा,एका धर्माचा किंवा एका विचारपरंपरेचा नाही. बुद्ध, महावीर, संत…

3 days ago

अंदाजाची शेती संपणार? ड्रोन, सेन्सर अन् एआय ठरवणार पिकांचे भवितव्य ! Smart Farming with Drone and AI Techique

डिजिटल क्रांती: समृद्ध शेतीचा पाया/ 'स्मार्ट शेती, भरघोस प्रगती' ड्रोनची फवारणी, मोबाईलवर मातीचे रिपोर्ट आणि…

3 days ago

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य पुरस्कार २०२६ जाहीर

ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे (नाशिक)यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवनगौरव पुरस्कार,संहिता राजन (पुणे)…

3 days ago

२२ परीक्षा रद्द, दोन हजार नोकऱ्या मात्र धोक्यात!

स्टेटलाइन - झारखंडच्या राजकारणात सध्या सत्तेच्या खुर्चीपेक्षा विद्यार्थ्यांच्या संतापाची ताकद मोठी ठरताना दिसत आहे. रांचीच्या…

3 days ago