काय चाललयं अवतीभवती

छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्वराज्यासाठीच्या लढ्यात स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभाषा या तीन महत्त्वाच्या तत्त्वांवर भर – अमित शाह

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह हिंदी दिवस 2025 च्या निमित्ताने गुजरातमध्ये गांधीनगर येथे आयोजित पाचव्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी शिवाजी महाराज यांचे भाषा धोरण यावर भाष्य केले.

गांधीनगर – केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी हिंदी दिवस 2025 च्या निमित्ताने गुजरातची राजधानी गांधीनगर येथे आयोजित 5व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली. या कार्यक्रमात गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल, केंद्रीय गृह राज्यमंत्रीबंडी संजय कुमार आदी उपस्थित होते. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांनी यावेळी अनेक प्रकाशनांचे प्रकाशनही केले.

या परिषदेला संबोधित करताना केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की, हिंदी ही भारतीय भाषांची सोबती आहे आणि हिंदी व इतर भारतीय भाषांमध्ये कोणताही संघर्ष नाही. शाह म्हणाले की, याचे सर्वात मोठे उदाहरण गुजरात आहे.

गेल्या पाच वर्षांपासून अखिल भारतीय राजभाषा संमेलन दिल्लीबाहेर देशाच्या वेगवेगळ्या भागांत आयोजित केले जात आहे. ज्यामुळे हिंदी आणि इतर भारतीय भाषांमधील संवाद अधिक मजबूत करण्याची चांगली संधी मिळाली आहे, असे अमित शाह यांनी सांगितले. गेल्या चार संमेलनांचा अनुभव असा आहे की, अशा परिषदा नवीन दृष्टीकोन, ऊर्जा आणि प्रेरणा देतात, याकडे शाह यांनी लक्ष वेधले. हिंदी ही केवळ संवादाची आणि प्रशासनाची भाषा न राहता ती विज्ञान, तंत्रज्ञान, न्याय आणि पोलीस यंत्रणेची भाषाही झाली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

‘सारथी’ (Sarathi) अनुवाद प्रणाली हिंदीतून सर्व मान्यताप्राप्त भारतीय भाषांमध्ये सोपे भाषांतर करण्यास मदत करते, असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले. शाह यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या संबंधित भाषांमध्ये पत्र पाठवण्याचे आवाहन केले आणि आश्वासन दिले की, उत्तरे त्याच भाषेत पाठवली जातील. सारथी प्रणाली कोणत्याही भाषेत भाषांतर करण्यासाठी आणि हिंदीमधील उत्तराचे प्राप्तकर्त्याच्या भाषेत भाषांतर करण्यासाठी सक्षम आहे, यावर त्यांनी भर दिला. येत्या काही दिवसांत, ‘सारथी’ द्वारे संवाद प्रत्येकाच्या मातृभाषेत होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठीच्या लढ्यात स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभाषा या तीन महत्त्वाच्या तत्त्वांवर भर दिला होता, असे अमित शाह यांनी सांगितले. ही सर्व तत्त्वे राष्ट्रप्रेमाशी जोडलेली आहेत. ज्या देशात बोलली जाणारी भाषा आपली नाही, तो देश खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याची किंवा अभिमानाची भावना अनुभवू शकत नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले.

आपल्या भाषांविषयीचा अभिमान वाढवण्यासाठी शब्द सिंधू (Shabd Sindhu) शब्दकोष तयार करण्यात आला, ज्याची सुरुवात 51,000 शब्दांनी झाली होती आणि आता त्यात 7 लाखांपेक्षा जास्त शब्द आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. 2029 पर्यंत तो जगातील सर्व भाषांमधील सर्वात मोठा शब्दकोश बनेल, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला. हा शब्दकोष हिंदीला अधिक लवचिक बनवत आहे, जे हिंदीला व्यापक प्रमाणात वापरली जाणारी भाषा बनवण्यासाठी अतिशय गरजेचे आहे. शब्द सिंधूचा वापर हिंदीला बहुउपयोगी, स्वीकृत आणि सर्वमान्य बनवेल, असे त्यांनी अधोरेखित केले.

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी
Tags: administrationAmit Shahcommunication in mother tongueconstitutional languagesCulturedigital translation toolsEducationFeedbackGandhinagargovernanceHindiHindi Diwas 2025IdentityIndian Languagesjudicial proceedingsjusticelanguage policyLanguage Policy Indialanguage prideLanguage Rightslinguistic diversitylinguistic unityminor languagesmultilingualismnational identityPolicepublic administrationRajbhasha ConferenceRegional LanguagesSanskritizationSarathi translation systemscriptShabd SindhuShivaji Maharajstate communicationSwabhashaSwadharmaSwarajyaTechnologyterminologyTranslationtranslation systemvocabulary expansionअमित शाहओळखगव्हर्नन्सगांधीनगरछत्रपती शिवाजी महाराजतंत्रज्ञानन्यायन्यायालयीन भाषापोलीसप्रदेश भाषाप्रशासनबहुभाषिकताभाषा धोरणभाषा हक्कभाषांतरभाषिक ऐक्यभाषेचा विकासमातृभाषा अभिमानमातृभाषेत संवादराजभाषा परिषदेशब्द सिंधूशब्दकोशशब्दसंग्रहशब्दावलीशिक्षणसंपादनसरकारसंवादसंस्कृतीसारथी प्रणालीसार्वजनिक प्रशासनस्थानिक भाषास्वधर्मस्वभाषास्वराज्यहिंदी दिवस 2025हिंदी व भारतीय भाषा

Recent Posts

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

2 hours ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

15 hours ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

20 hours ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

1 day ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

1 day ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

2 days ago