An enlightening poem by Shripad Bhalchandra Joshi commenting on the current political situation
कोणी केव्हाही
जाऊ शकतो
कोणाही
बरोबर
जाता येता
रोज, आपली
किंमत वाढवून
घेऊ शकतो
आदेश तुमचा
कोणाच्याही आदेशाने
सोयीनुसार कोणालाही
विकू शकतो
पुनः निघू शकतो
एकत्रही
बघायला
डोंगर, झाडी
करणार काय आहोत
अशांचे पुढे, परत तर
बोलावण्याचा
अधिकारच नाही
काय ते
एकदा
नीट
ठरवा
ते तर करणार तेच,
नुरा कुस्तीत इथल्या
कोणालाही
हरवा, जिंकवा
शोधू त्यांना नका,
शोधा काय हवे
ते आपल्यालाच
आपले
बरेच दिवस
झाले आहेत, सारे
सारेच घालवून
बसले
नुसते पागलखाने भोवती,
त्यात आपणही
करून घ्यायची का
आपली भरती?
हेच चालणार आहे, हेच घेणार आहोत चालवून
की सोडणार आहोत पुनः सारे हलवून ?
- श्रीपाद भालचंद्र जोशी
पुण्याचे डिजिटल शिखर १७ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत पुण्यात पार पडलेली 'ब्रिक्स आयसीटी…
चमत्कारांच्या नावाखाली होणारी फसवणूक, अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेला समाज, जात-धर्माच्या भिंती आणि प्रश्न विचारण्यालाच लागलेली भीती—या…
गुरूंचा महिमा शब्दांत कितीही सांगितला, तरी तो पूर्णपणे व्यक्त होऊ शकत नाही. कारण गुरू हे…
स्टेटलाइन भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तब्बल २०९ दिवसांनी नितीन नबीन यांनी पक्षाची नवी…
कवयित्री मनीषा पाटील यांच्या 'काहूर' काव्यसंग्रहाचे प्रकाशनप्रकाशन सोहळ्याला अनेक मान्यवर साहित्यिकांची उपस्थिती कणकवलीः'काहूर ' म्हणजे…
एका भटक्याची डायरी प्रशांत महासागराच्या अथांग निळाईत वसलेली हवाईची बेटे म्हणजे निसर्गाच्या अद्भुत प्रयोगशाळाच! कुठे…