📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 13, 2026
कविता

काय ते एकदा नीट ठरवा

An enlightening poem by Shripad Bhalchandra Joshi commenting on the current political situation
कोणी केव्हाही 
जाऊ शकतो
कोणाही
बरोबर

जाता येता
रोज, आपली
किंमत वाढवून
घेऊ शकतो

आदेश तुमचा
कोणाच्याही आदेशाने
सोयीनुसार कोणालाही
विकू शकतो

पुनः निघू शकतो
एकत्रही
बघायला
डोंगर, झाडी

करणार काय आहोत
अशांचे पुढे, परत तर
बोलावण्याचा
अधिकारच नाही

काय ते
एकदा
नीट
ठरवा

ते तर करणार तेच,
नुरा कुस्तीत इथल्या
कोणालाही
हरवा, जिंकवा

शोधू त्यांना नका,
शोधा काय हवे
ते आपल्यालाच
आपले

बरेच दिवस
झाले आहेत, सारे
सारेच घालवून
बसले

नुसते पागलखाने भोवती,
त्यात आपणही
करून घ्यायची का
आपली भरती?

हेच चालणार आहे, हेच घेणार आहोत चालवून
की सोडणार आहोत पुनः सारे हलवून ?

- श्रीपाद भालचंद्र जोशी

Related posts

दाढीवाले…काल,आज आणि उद्या

स्त्री जाणिवेचा अस्वस्थ पदर

तर जगणं होत नाही जड …..

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406