विश्वाचे आर्त

कळसाच्या दर्शनानेही होते खरे देव दर्शन

कळस दिसल्यानंतर विसाव्याचे ठिकाण मिळाल्याचा आनंद प्रवाशांना होत असे. या आनंदाने प्रवासाचा सर्व थकवा दूर होत असे. कारण कळस हा प्रवासातील मोठा आधार त्याकाळी होता. कळस जरी दूरवर असला तरी त्याच्याकडे पाहात ते ठिकाण गाठण्यात अडचणी येत नसत.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

लोकीं तरी आथी ऐसें । जे दुरुनि कळसु दिसे ।
आणि भेटीचि हातवसे । देवतेची तिये ।। ३१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा

ओवीचा अर्थ – लोकांत तरी अशी समजूत आहे की, दुरून देवळाचा कळस दिसल्याबरोबर त्या देवळांतील देवतेची भेटच ( दर्शनच ) हस्तगत झाली असे होते.

पूर्वीच्या काळी लोकवस्तीच्या तुलनेत वृक्षसंपदा खूप होती. आत्तासारखी दळणवळणाची साधने नव्हते. पायी चालत किंवा घोडसवारी किंवा अन्य प्राण्याच्या मदतीने प्रवास केला जात असे. अशावेळी वाटा माहीत असणे खूप गरजेचे होते. वाटा माहीत नसतील तर प्रवासात चुकण्याची शक्यता अधिक होती. वनसंपदेच्या विपुलतेमुळे लोकवस्ती कोठे आहे ? वन्य प्राण्यांचा वावर कोठे आहे ? अशा गोष्टी शोधाव्या लागत. लोकवस्तीची ओळख पटकण व्हावी याच उद्देशाने मंदिरांचे कळस हे उंच बाधले जात होते. दुरून मंदिराचा कळस दिसल्यानंतर तेथे लोकवस्ती आहे ? गाव आहे याची वाटसरूंना माहिती होत असे. संध्याकाळची आरती, घंटानाद हा अधारापूर्वी पोहोचण्यासाठी प्रवाशांना मदतगार ठरत असे.

कळस दिसल्यानंतर विसाव्याचे ठिकाण मिळाल्याचा आनंद प्रवाशांना होत असे. या आनंदाने प्रवासाचा सर्व थकवा दूर होत असे. कारण कळस हा प्रवासातील मोठा आधार त्याकाळी होता. कळस जरी दूरवर असला तरी त्याच्याकडे पाहात ते ठिकाण गाठण्यात अडचणी येत नसत. थकलेल्या प्रवाशांना देवळाचा कळस हा देवदर्शन झाल्यासारखाच वाटत असे. प्रवासातील उचित ध्येय दिसल्यानंतरचा आनंदच तो प्रवास सुखकर करतो. ते ध्येय गाठल्यानंतर मिळणारा आनंद वेगळाच.

अध्यात्माच्या प्रवासात आत्मज्ञान हा कळस आहे. तो दिसल्यानंतर मिळणारा आनंद सर्व प्रवास सुखकर करणारा असतो. कळस दिसण्यासाठी आणि गाठण्यासाठी मात्र आपणाला भटकंती ही करावी लागतेच. वाट चुकणार नाही, भरकटणार नाही याची काळजी मात्र शिष्याने घ्यायला हवी. आत्मज्ञानाचा कळस हा त्या देवळातील देवाचे दर्शनच घडवत असतो. त्या आनंदातच त्या आत्मज्ञानाच्या देवळापर्यंत पोहोचायचे आहे. वाटेत काटे असतील, वन्यप्राण्यांचा त्रास असेल, चालुन चालुन थकवाही येतो, पण हे सर्व अडथळे दूर सारत आत्मज्ञानाचा कळस गाठायचा असतो. साधनेतील सर्व अडथळे दूर सारत आत्मज्ञानाचे दर्शन घेत, त्या अनुभुतीतूनच प्रेरणा घेत त्या मंदिरापर्यंत पोहोचायचे असते.

कळसाचे असे हे महत्त्व आहे. पण आता वाढत्या तंत्रज्ञानाच्या युगात दळणवळणाची साधनेही सहज उपलब्ध झाली आहेत. प्रवास सुखकर झाला आहे. पण तरीही आपणास कळस गाठता येत नाही. कारण वाढत्या गर्दीत, लोकवस्तीत हा कळस दिसेनासा झाला आहे. त्याची उंची कितीही वाढवली तरी तो दिसत नाही ,कारण त्या कळसाची खरी ओळखच आपण विसरलो आहोत. टोलेजंग मूर्ती, पुतळे आणि कळस उभारून अध्यात्माचा दिखावा करण्यापेक्षा खरे अध्यात्म जाणून घेऊन वाटचाल करायला हवी. तरच जीवनाचा प्रवास सुखकर होईल.

पूर्वीच्याकाळी राजे, महाराजांनी महागडे सोन्याचे, प्लॅटिनमचे कळस गरजेच्यावेळी चोरून जनतेचे रक्षण केले. जनतेला परकियांच्या तावडीतून सोडवून स्वातंत्र्य दिले. असेच पराक्रम स्वातंत्र्यसैनिकांनीही केले आहेत. ही त्यांची कृती अधर्मी होत नाही, तर उलट खऱ्या धर्म रक्षणाची कृती आहे. प्राप्त परिस्थितीत जनतेला मुक्त करणे हे त्यांचे कर्तव्य होते. तो त्यांचा धर्म होता. यासाठी त्यांनी जनतेला जागृत करण्यासाठी, शिक्षित करण्यासाठी आवश्यक संपत्तीसाठी मंदिराच्या कळसांचा आधार घेतला. ती चोरी ठरत नाही तर तो धर्म रक्षणासाठी उभारलेला लढा असतो. उलट देवळांची संपत्ती ही राजाची अन् त्याच्या प्रजेचीच संपत्तीच आहे. परकीय येऊन सत्ताधिश झाले तरी त्या संपत्तीचे खरे हक्कदार तो राजा अन् त्याची प्रजाच आहे. त्यामुळे स्वतःच्याच घरातील, राज्यातील वस्तूचा योग्य उपयोग करणे ही चोरी ठरत नाही. देव, देश अन् धर्मासाठी उभारलेला तो लढा कळसाच्या दर्शनाने यशस्वी झाला. असा हा कळस दिसताच देवळातील खऱ्या देवाचे दर्शनच घडते.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

वारीत असा कोणता ‘आनंदाचा अर्थशास्त्रीय’ मंत्र दडला आहे, जो जगालाही शिकवू शकतो ? Economics of happiness mantra hidden in Wari

वारी आणि आनंदाचे अर्थशास्त्र: एक अनोखी जीवनदृष्टी आनंद विकत घेण्यासाठी किती पैसा लागतो? आधुनिक अर्थशास्त्र…

2 hours ago

ॲसिडिटीच्या उपचाराने चेहऱ्यावर ग्लो आणि केस गळणे बंद ? जाणून घ्या आयुर्वेदाची जादू ! Does treating acidity cause facial glow and stop hair loss ? Ayurveda Magic

बऱ्याचदा आपण एखाद्या आजारावर औषध घेतो,पण त्रास काही पूर्णपणे जात नाही;कारण आपण फक्त लक्षणांवर उपचार…

3 hours ago

पुण्यात २८ जुलैला ‘तंजावर मराठा साम्राज्यातील राजांचे योगदान’ पुस्तकाचे प्रकाशन Contributions of Thanjavur Maratha Kings Book Publication

पुणे : तंजावरच्या मराठा साम्राज्याचा वैभवशाली इतिहास मराठी वाचकांसमोर आणणाऱ्या 'तंजावर मराठा साम्राज्यातील राजांचे योगदान'…

16 hours ago

धान्यांपासून लाखोंचा उद्योग ! एक्सट्रुजन तंत्रज्ञान बदलणार ग्रामीण उद्योजकतेचे चित्र ? From grains to a multi-million dollar industry

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका किंवा हरभरा… या पारंपरिक पिकांपासून आधुनिक, पौष्टिक आणि बाजारपेठेत मोठी मागणी…

1 day ago

राजर्षी असो वा ब्राह्मण…मोक्षाचा खरा मार्ग कोणता? Whether a King sage or a Brahmin…what is the true path to salvation?

जीवनातील प्रत्येक निर्णय, प्रत्येक कृती आणि प्रत्येक विचार जर परमेश्वराच्या चरणी अर्पण झाला, तर माणसाच्या…

2 days ago

साखरेचा गोडवा वाढणार ? महाराष्ट्रात ऊस उत्पादनाने गाठला नवा टप्पा

महाराष्ट्रातील ऊस लागवड क्षेत्र, उत्पादन आणि उत्पादकता यांचा तपशील क्षेत्र (लाख हेक्टरमध्ये), उत्पादन (लाख टनांमध्ये)…

2 days ago