विश्वाचे आर्त

देशी अन् विदेशी गायीच्या दुधातील फरक

गोचिडाला जसे दुधाची गोडी माहीत नसते तसे आज मानवाचे झाले आहे. गोड, पवित्र सोडून गोचीडाप्रमाणे तो अशुद्ध रक्ताचेच शोषण करू इच्छित आहे. मानवाची बदललेली ही विचारसरणीच मानवास घातक ठरत आहे. योग्य काय अयोग्य काय याचा विचारच होत नाही. फक्त उत्पादन किती होते. नफा किती मिळतो याचाच विचार केला जात आहे. होणारे उत्पादन आरोग्यास उपयुक्त आहे का नाही याचा विचारच होत नाही.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे,
मोबाईल – 9011087406

पाहें पां दूध पवित्र आणि गोड । पासीं त्वचेचिया पदराआड ।
परि तें अव्हेरुनि गोचिड। अशुद्ध काय नेघती ।।57 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 9 वा

ओवीचा अर्थ – अर्जुना असें पाहा कीं, दूध हें पवित्र असून शिवाय गोड आहे व तें जवळच सडांच्या कातडीच्या पदरापलीकडे आहे. परंतु गोचिड तें टाकून देऊन रक्तच पीत नाही काय ?

देशी गायीचे दूध आणि विदेशी गायींचे दूध यामध्ये मोठा फरक आहे. न्यूझीलंड आणि आफ्रिकेतील संशोधनानुसार विदेशी गोवंशाच्या दुधाने क्षयरोग, हृदयरोग यासारखे विकार होतात. युरोपीय गाईंच्या दुधात ए-1 बीटाकेसीन असते. त्याचे आतड्यांत पचन होऊन बीटा केझोमऑरफिन-7 हे पेप्टाइड तयार होते. हे पेप्टाइड रक्तात शोषले गेल्यास मधुमेह, हृदयरोग, स्वमग्नता आणि सिझोफेनियासारखे रोग माणसांना होतात. डॉ. कीथ वूडफोर्ड यांनी या बीटा केझोमॉरफिन-7 ला डेव्हिल इन द मिल्क असे म्हटले आहे. असे असेल तर दूध पवित्र आणि गोड कसे. हा उल्लेख युरोपियन गायींच्या दुधास लागू होत नाही.

विदेशात झालेल्या संशोधनानुसारच भारतीय देशी गायींचे दूध हे सुरक्षित दूध म्हटले गेले आहे. देशी गायींच्या दुधाची प्रत उत्कृष्ट आणि मानवी आहारास पोषक असल्याने त्याची तुलना संकरित गायीच्या दुधाशी होऊच शकत नाही. यासाठी भारतीय वंशाचा गायी किती महत्त्वाच्या आहेत याचा विचार करून देशी गायींचे संवर्धन करण्याचा विचार व्हायला हवा. सध्या भारतात गेली काही दशके विदेशी वळूचे वीर्य वापरून गोसंकर केला जात आहे. अशा संकरामुळेच भारतात क्षयप्रवण पशूंच्या संख्येत वाढ झाली आहे. याबाबत आता नव्याने पाऊले उचलण्याची गरज आहे. देशी गायींच्या वंशाचे संवर्धन हे गरजेचे आहे.

भारतीय गाईचे दूध, गोमूत्र, दही, तूप आणि शेण हे औषधी गुणांमुळे उपयुक्त आहेत. गाईचे तूप आयुर्वेदात औषध म्हणून वापरले जाते. गोमूत्र कीडनाशक म्हणून वापरले जाते. देशी गायीच्या दुधात रोगप्रतिकारक क्षमता असते. परजीव प्रादुर्भावास हे दूध प्रतिबंध करते. पण भारतीयांनी दूध कमी मिळते या कारणास्तव देशी गायींची कत्तल केली. विदेशी गायींचे वंश वाढविले. वाढत्या महागाईत आता या गायींच्या संगोपनाचा खर्च परवडणारा नाही. असे म्हटले जाते. रोगच दुधाच्या उत्पादनापेक्षा आरोग्यास उपयुक्त उत्पादने घेणे कधीही चांगले नाही का ?

गोचिडाला जसे दुधाची गोडी माहीत नसते तसे आज मानवाचे झाले आहे. गोड, पवित्र सोडून गोचीडाप्रमाणे तो अशुद्ध रक्ताचेच शोषण करू इच्छित आहे. मानवाची बदललेली ही विचारसरणीच मानवास घातक ठरत आहे. योग्य काय अयोग्य काय याचा विचारच होत नाही. फक्त उत्पादन किती होते. नफा किती मिळतो याचाच विचार केला जात आहे. होणारे उत्पादन आरोग्यास उपयुक्त आहे का नाही याचा विचारच होत नाही. देशी गोवंश असणारे खिल्लार, डांगी, लाल कंधारी चोवीस तासात चार लिटर दूध देते. तर गवळाऊ आणि देवणी या गायी सहा लिटर दूध देतात. हे दूध पवित्र तर आहेच शिवाय शुद्धही आहे. तसेच संपूर्ण घराचे आरोग्य राखणारे आहे. देशी गायीचे गोमूत्र परिसर स्वच्छ ठेवते यामुळे घराचे आरोग्य उत्तम राहते. यासाठीच हवे देशी गायींचे संवर्धन.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

हळदीचे कंद सडतायत, पीक मरतंय? कारणे ओळखा, वेळीच करा प्रभावी व्यवस्थापन ! Turmeric Rhizome Rot and Wilt

हळद पिकातील कंद सड व मर : कारणे, लक्षणे आणि प्रभावी व्यवस्थापन हळद आणि अद्रक…

5 hours ago

सृष्टी निर्माण झाली कशी? श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेले गूढ काय?

सृष्टीकडे पाहिले की असंख्य रूपे, जीव, शक्ती आणि घडामोडी आपल्याला दिसतात. या विराट पसाऱ्यामागे नेमकी…

1 day ago

सर्व महामानवांच्या सामर्थ्याची बेरीज म्हणजे भारत: डॉ. श्रीपाल सबनीस

कोल्हापूर : भारत हा कोणत्याही एका महामानवाचा,एका धर्माचा किंवा एका विचारपरंपरेचा नाही. बुद्ध, महावीर, संत…

2 days ago

अंदाजाची शेती संपणार? ड्रोन, सेन्सर अन् एआय ठरवणार पिकांचे भवितव्य ! Smart Farming with Drone and AI Techique

डिजिटल क्रांती: समृद्ध शेतीचा पाया/ 'स्मार्ट शेती, भरघोस प्रगती' ड्रोनची फवारणी, मोबाईलवर मातीचे रिपोर्ट आणि…

2 days ago

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य पुरस्कार २०२६ जाहीर

ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे (नाशिक)यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवनगौरव पुरस्कार,संहिता राजन (पुणे)…

2 days ago

२२ परीक्षा रद्द, दोन हजार नोकऱ्या मात्र धोक्यात!

स्टेटलाइन - झारखंडच्या राजकारणात सध्या सत्तेच्या खुर्चीपेक्षा विद्यार्थ्यांच्या संतापाची ताकद मोठी ठरताना दिसत आहे. रांचीच्या…

2 days ago