📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 3, 2026
काय चाललयं अवतीभवती

विषमुक्त शेती संशोधनासाठी श्रुतिका बागुल यांना ‘ऑरेंज सिटी आयकॉन अवॉर्ड २०२६’ Orange City Icon Award 2026 To Shrutika Bagul

विषमुक्त शेती संशोधन, देशी गोवंश संवर्धन आणि सेंद्रिय शेतीतील उल्लेखनीय कार्याबद्दल श्रुतिका बागुल यांना ऑरेंज सिटी आयकॉन अवॉर्ड २०२६ प्रदान करण्यात आला.

नागपूर : विषमुक्त आणि रसायनमुक्त शेतीसाठी संशोधन,देशी गायींचे संवर्धन तसेच सेंद्रिय शेतीसाठी नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्याच्या कार्याची दखल घेत विठुराया गोशाळा फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रुतिका बागुल यांना ‘ऑरेंज सिटी आयकॉन अवॉर्ड २०२६’ प्रदान करण्यात आला.२६ जुलै २०२६ रोजी नागपूर येथे झालेल्या विशेष समारंभात हा प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.

“विषमुक्त शेतीसाठी संशोधनाचा ध्यास; श्रुतिका बागुल यांची प्रेरणादायी वाटचाल” या संकल्पनेवर आधारित हा सन्मान त्यांच्या संशोधननिष्ठ कार्याला मिळालेली महत्त्वपूर्ण पावती मानला जात आहे.

महिमा बहुउद्देशीय सामाजिक संस्था, नागपूर यांच्या वतीने आयोजित “नारी शक्ती,समाज की प्रगती” या विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.संस्थेच्या संचालिका शीतल पाटील यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यसभेच्या सदस्या मायाताई एनावटे तसेच इन्फंट इंडिया संस्थेचे संचालक दत्ता भाऊ बरगजे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत श्रुतिका बागुल यांचा गौरव करण्यात आला.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना श्रुतिका बागुल म्हणाल्या, “हा सन्मान केवळ माझा नसून विठुराया गोशाळा फाउंडेशन, सप्तरंगा रिसर्च अँड ऑर्गेनिक प्रा. लि.च्या संपूर्ण टीमचा, मार्गदर्शकांचा, शेतकरी बांधवांचा आणि आमच्या कार्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा आहे. या पुरस्कारामुळे विषमुक्त शेती, देशी गोवंश संवर्धन आणि सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाली आहे.”

विठुराया गोशाळा फाउंडेशन आणि सप्तरंगा रिसर्च अँड ऑर्गेनिक प्रा.लि.यांच्या माध्यमातून विषमुक्त शेती,शाश्वत कृषी पद्धती,देशी गोवंश संवर्धन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त सेंद्रिय उत्पादने विकसित करण्याचे कार्य सुरू असून,संशोधन व नवकल्पनांच्या माध्यमातून निरोगी,पर्यावरणपूरक आणि शाश्वत शेतीव्यवस्था उभारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

या पुरस्कारामुळे विषमुक्त शेतीसाठी सुरू असलेल्या संशोधनाला आणि सेंद्रिय शेती चळवळीला नवी ऊर्जा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Related posts

स्मृतीशेष चमेली-भाऊराव हिंगोणेकर प्रतिष्ठानतर्फे पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

परदेशात नोकरीसाठी आंतरराष्ट्रीय रोजगार मेळावा

कवी सफरअली इसफ यांना यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406