विश्वाचे आर्त

भरोनि सद्भावाची अंजुळी । मियां वोवियाफुले मोकळी । ( एकतरी ओवी अनुभवावी )

मनाचे आरोग्य योग्य ठेवण्यासाठी असे दान गरजेचे आहे. बऱ्याचदा हेच नेमके घडत नाही. यामुळेच आत्महत्या, नैराश्य पदरी पडते. मनाचे आरोग्य राखायचे असेल तर तशी मानसिकता आपण निर्माण करायला हवी. मनाचा योग्य विकास करावाच लागेल.


- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 9011087406

भरोनि सद्भावाची अंजुळी । मियां वोवियाफुले मोकळी ।
अर्पिली अंध्रियुगुली । विश्वरुपाचा ।। 708 ।। अध्याय 11 वा

ओवीचा अर्थ – मी शुद्ध भावनारुप ओंजळीत ही ओव्यारुपी मोकळी फुले भरुन विश्वरुपाच्या दोन्ही पायांवर अर्पन केली ( असे ज्ञानेश्वरमहाराज म्हणतात)

शुद्ध भावनेने दिलेले दान केव्हाही फलद्रुप होते. देणाऱ्याने प्रेमाने दिले तर घेणाऱ्यालाही त्याचा उचित लाभ होतो. देणाऱ्याची व घेणाऱ्याची भावना कशी आहे याला महत्त्व आहे. दान करताना आणि दान स्विकारताना या गोष्टीचा जरूर विचार करावा. देणारा प्रेमाने देत असेल तर त्याचा जरूर स्विकार करावा. तसे करणे हा धर्म आहे. यात देणाऱ्याला आणि घेणाऱ्यालाही त्या गोष्टीपासून, त्या वस्तूपासून त्रास होत नाही. दान देताना मानसिकता कशी आहे याचा परिणाम दोघांवरही होतो. दान करताना कधीही लाभाचा विचार करून दान करू नये तसे केले तर आपल्यापदरी दुःखच भेटू शकते. कारण लाभ प्रत्येक गोष्टीतून होतोच असे नाही. फळाची अपेक्षा ठेऊन कोणतेही कर्म करू नये. हे यासाठीच सांगितले आहे.

मुळात आपण मात्र फळ मिळेल याच इच्छेपोटी कर्म करत असतो. त्या आशेने त्याकडे पाहात असतो. फळ मिळणार नसेल तर फारसा रसही त्यात आपणास वाटत नाही. फळ मिळाले नाही तर दुःखही होते. मग मदत कशासाठी करायची? आपणास काहीच लाभ होणार नाही मदत का करायची? असे वाटणे स्वाभाविक आहे. पण तसा विचार न करता मदत करायची कारण त्याचे दुःख वाटत नाही. मनाचा मोठेपणा त्यात असतो. अंतःकरणाची उदारता त्यात असते. अशा या दानाने मनाला सुख, समाधान भेटते. घेणाऱ्यानेही त्याचा योग्य उपयोग केला तर त्या सुखात आणखी मोठी भर पडते. दान सार्थकी लागल्याचे समाधान खूप मोठे असते. घेणाराही आपल्या मदतीला योग्यवेळी धावून येतो.

मनाचे आरोग्य योग्य ठेवण्यासाठी असे दान गरजेचे आहे. बऱ्याचदा हेच नेमके घडत नाही. यामुळेच आत्महत्या, नैराश्य पदरी पडते. मनाचे आरोग्य राखायचे असेल तर तशी मानसिकता आपण निर्माण करायला हवी. मनाचा योग्य विकास करावाच लागेल. सज्जन विचार मनाला नेहमीच उत्साही ठेवतात. उर्जा देत राहातात. विश्वरुप दर्शनाने अर्जुनाचे मन प्रसन्न झाले होते. भगवंताची खरी ओळख त्याला झाली होती. त्याच्या मनातील सर्व शंका दूर झाल्या होत्या. त्याच्या भगवंताच्याप्रती प्रेम उत्पन्न झाले होते. भक्ती उत्पन्न झाली होती. त्यामुळेच प्रसन्न भावनेने त्याने विश्वरुपाच्या त्या चरणांवर फुले वाहीली.

आपण देवळात जातो. तेव्हा हारवाले हार विकत असतात. हार विकत घेताना आपला भाव कसा असतो हे महत्त्वाचे आहे. हा हार काय कचऱ्यात जाणार मग काय इतका खर्च कशाला करायचा. त्यापेक्षा साधा हार घेऊ. फुले विकत घेताना आपली मानसिकता अशी असते. त्यापेक्षा फुले विकत न घेता शुद्ध अंतकरणाने नमस्कार केला तरी तो भगवंतास पोहोचतो. आपण दर्शन घेताना कोणत्या भावनेने घेतो हे सुद्धा महत्त्वाचे आहे. जर अंतःकरण शुद्ध असेल तर ते भगवंताजवळ जरूर पोहोचते. त्याचा लाभ भगवंतासह भक्तालाही होतो. यासाठी दान देताना अंतःकरणातील भाव महत्त्वाचा आहे हे विचारात घ्यायला हवे व तसे आचरण ठेवायला हवे. अन्यथा त्यापेक्षा दान न दिलेलेच बरे.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

अशांत जगाचं काहूर शांत करण्याची ताकद कवितेत – कृष्णात खोत

कवयित्री मनीषा पाटील यांच्या 'काहूर' काव्यसंग्रहाचे प्रकाशनप्रकाशन सोहळ्याला अनेक मान्यवर साहित्यिकांची उपस्थिती कणकवलीः'काहूर ' म्हणजे…

22 hours ago

ज्वालामुखीच्या धगधगत्या पोटात… हवाईची अद्भुत सफर

एका भटक्याची डायरी प्रशांत महासागराच्या अथांग निळाईत वसलेली हवाईची बेटे म्हणजे निसर्गाच्या अद्भुत प्रयोगशाळाच! कुठे…

1 day ago

वर्षा ऋतूत आरोग्याची कोणती काळजी घ्यावी ? Dr Radha Khadakkar Advice

पावसाळ्यात वातावरणातील गारवा, सततचा ओलावा आणि बदलते हवामान यामुळे पचनशक्ती मंदावते आणि शरीराची प्रतिकारक्षमताही प्रभावित…

2 days ago

नोकरीच्या शोधात शहराकडे जाण्याऐवजी गावातच उद्योग कसा उभारता येईल ?

धान्यापासून उद्योगाकडे : एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योजकतेला नवी दिशा बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि तांदूळ…

2 days ago

रानफुलास

महाराष्ट्रातील अग्रगण्य कवयित्री, बहिणाबाई चौधरी यांचा तिथीप्रमाणे आज १४७ वा जन्मदिवस.( जन्म श्रावण शु" पंचमी,…

3 days ago

‘युगानुयुगे तूच’चा आता पंजाबी अनुवाद

सत्यपाल भिकी यांनी केले भाषांतर; हिंदी अनुवादानंतर पंजाबी आवृत्ती मुंबई ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

3 days ago