Dr. Atul Mohod Appointed Director General of Sardar Swaran Singh National Institute of Bio-Energy
दापोली : येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. अतुल मोहोड यांची पंजाबमधील कपूरथला येथील सरदार स्वर्ण सिंह राष्ट्रीय जैव ऊर्जा संस्थेच्या (Sardar Swaran Singh National Institute of Bio-Energy) महासंचालकपदी तीन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती झाली आहे.
देशातील जैव ऊर्जा क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठित संस्थेच्या सर्वोच्च पदावर निवड झाल्याने डॉ. मोहोड यांच्या रूपाने कोकण कृषी विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
या निवडीबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी डॉ. मोहोड यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारीत कार्यरत असलेली सरदार स्वर्ण सिंह राष्ट्रीय जैव ऊर्जा संस्था ही जैव ऊर्जा क्षेत्रातील संशोधन, शिक्षण, विस्तार आणि तंत्रज्ञान विकासासाठी देशातील अग्रगण्य संस्था मानली जाते. जैव इंधन व जैव ऊर्जा क्षेत्रातील राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांशी सामंजस्य करार करून संशोधन व तंत्रज्ञान प्रसाराचे महत्त्वपूर्ण कार्य ही संस्था करते.
डॉ. मोहोड यांनी गेल्या २५ वर्षांत विद्यापीठाच्या अपारंपरिक ऊर्जा स्रोत विभागात सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, विभागप्रमुख, सहयोगी अधिष्ठाता आदी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. तसेच विद्यापीठ अभियंता म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली दापोली येथे एनर्जी पार्कची उभारणी, गॅसिफायर तंत्रज्ञानाचा विकास, कोकणातील शेतमालातील काडीकचरा व जंगली झाडाझुडपांपासून जैविक कोळसा (बायोचार) निर्मितीचे तंत्रज्ञान विकसित करणे, तसेच अपारंपरिक ऊर्जा स्रोतांवर आधारित विविध प्रकारची वाळवणी यंत्रे विकसित करण्यासाठी केलेले संशोधन विशेष उल्लेखनीय ठरले आहे.
या गौरवपूर्ण नियुक्तीनिमित्त विस्तार शिक्षण संचालनालयाच्या वतीने विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी सहकारी अधिकारी, शास्त्रज्ञ व कर्मचाऱ्यांनी डॉ. मोहोड यांचा सत्कार करून त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचे दर मोठ्या प्रमाणावर कमी होत असताना भारतीय ग्राहकांना डिझेल, पेट्रोल व…
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील 'मिसिंग लिंक' प्रकल्पाच्या पहिल्याच पावसातील त्रुटींवरून सुरू झालेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
भारतातील विविध भाषा, संस्कृती आणि ज्ञानपरंपरा यांना जोडणारा सेतू उभारण्याची कल्पना आज कृत्रिम बुद्धिमत्ता आणि…
‘निद्रानाशाची रोजनिशी’तून महेश लोंढे यांचा जागत्या काळाशी संवादमाणसाच्या निद्रानाशामागे केवळ झोपेचा अभाव नसतो; त्यामागे काळाचे…
महाराष्ट्राचा शेतकरी सध्या अस्मानी आणि सुलतानी संकटांच्या दुहेरी कचाट्यात सापडला आहे. एकीकडे लहरी हवामान, पावसाची…
शहाजीराजांच्या बहुभाषिक आणि समन्वयवादी दृष्टिकोनातून प्रेरणा घेत, साने गुरुजींच्या आंतरभारतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत आणि…