fliif Reader app download

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
June 16, 2026
Home » डॉ. राजनीश कामत यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती
काय चाललयं अवतीभवती

डॉ. राजनीश कामत यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

Governor Jishnu Dev Varma appoints Dr Rajnish Kamat as the new Vice Chancellor of Shivaji University, Kolhapur for a five-year term.

मुंबई – येथील डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राजनीश कामत यांची कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यपाल तथा कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी गुरुवारी (दि. २१ ) डॉ. राजनीश कामत यांच्या नियुक्तीची घोषणा केली. डॉ. राजनीश कामत यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी किंवा ते वयाची पासष्ट वर्षे पूर्ण करतील, यापैकी जी तारीख अगोदर असेल त्या तारखेपर्यंत असेल. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिगंबर शिर्के यांचा कार्यकाळ ७ ऑक्टोंबर २०२५ रोजी संपल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ सुरेश गोसावी यांचेकडे विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता.

डॉ कामत यांनी शिवाजी विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स विषयात एम. एससी. तसेच गोवा विद्यापीठातून पीएच.डी. प्राप्त केली आहे. त्यांना अध्यापन, संशोधन व प्रशासनाचा व्यापक अनुभव आहे. डॉ. कामत यांच्या २११ संशोधन पत्रिका आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रसिद्ध झाल्या असून त्यांची १६ पुस्तके देखील प्रकाशित झाली आहेत. त्यांना अध्यापन, संशोधन तसेच प्रशासन क्षेत्रात व्यापक अनुभव आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुंच्या निवडीसाठी राज्यपालांनी कोईम्बतूर येथील भारतीय विद्यापीठाच्या गणित विभागाचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख (निवृत्त) डॉ. पी. कंदास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती. महात्मा गांधी चित्रकूट ग्रामोदय विद्यापीठाचे (मध्य प्रदेश) माजी कुलगुरू प्रा. एन. सी. गौतम हे या समितीवर विद्यापीठ अनुदान आयोगाचे (UGC) प्रतिनिधी होते.

इंदोर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे संचालक डॉ. सुहास जोशी आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी हे समितीचे अन्य सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ. राजनीश कामत यांच्या नियुक्तीची घोषणा केली.

Related posts

लक्षात ठेवा, चुकातूनच माणूस घडतो…

सद्गुणी लोकशाहीत रुपांतर करण्यासाठी सत्यान्वेषी राजकारण नव्याने उभे करण्याची गरज

प्रसार माध्यमांनी स्वातंत्र्यलढ्यातील अज्ञात योद्ध्यांच्या शौर्यगाथा पुढे आणाव्यात – नरेंद्र मोदी

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!