Senior historian Dr Jaisingrao Pawar passed away at 85 in Kolhapur. Known for his research on Chhatrapati Shivaji Maharaj and Maratha history, he contributed greatly to evidence-based history writing.
कोल्हापूर – ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार ( वय ८५ ) यांचे आज पहाटे निधन झाले. प्रकृती बरी नसतानाही त्यांनी इतिहासाचा जागर शेवटपर्यंत त्यांनी कायम ठेवला होता.
महाराष्ट्राच्या इतिहास संशोधन परंपरेत प्रा. जयसिंगराव पवार यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. शिवचरित्राचा सखोल अभ्यास करून त्यांनी मराठा इतिहासाचे अनेक पैलू उलगडून दाखवले. पुराव्याधारित इतिहास लेखनाची परंपरा बळकट करण्यासाठी त्यांनी केलेले संशोधन आणि लेखन हे महाराष्ट्राच्या बौद्धिक परंपरेतील महत्त्वाचे योगदान आहे. इतिहास हा केवळ भूतकाळाचा आलेख नसून समाजाला दिशा देणारा ज्ञानस्रोत आहे, ही जाणीव त्यांच्या कार्यातून स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहास संशोधन क्षेत्रात डॉ. पवार यांचे स्थान कायम आदराचे राहील.
इतिहास संशोधनाबरोबरच जयसिंगराव पवार यांनी व्याख्यानमालेच्या माध्यमातूनही इतिहासप्रबोधनाचे कार्य केले. महाराष्ट्रातील विविध शैक्षणिक संस्था, साहित्य संमेलने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांनी इतिहास विषयावर व्याख्याने दिली. या व्याख्यानांमध्ये ते शिवचरित्रातील अनेक घटनांचा अभ्यासपूर्ण उहापोह करतात. शिवाजी महाराजांचे नेतृत्व, स्वराज्य संकल्पना आणि त्या काळातील सामाजिक परिस्थिती यांचे विश्लेषण करून ते इतिहास समजावून सांगतात. त्यांच्या व्याख्यानशैलीत विद्वत्तेबरोबरच ओघवती भाषा आणि उदाहरणांचा वापर असल्यामुळे श्रोत्यांना इतिहास समजून घेणे सोपे जात होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु पाटगावचे परमपूज्य मौनी महाराज यांच्या संशोधनाच्या निमित्ताने त्यांच्याशी नेहमीच संपर्क होता. मौनी महाराज यांचा इतिहास सांगणारे संकेतस्थळ काढण्यात त्यांची खूप मोलाची मदत झाली. शिवाजी महाराज यांची तेरा संतांची भेट घेतली होती. गुरुस्थानी त्यांना मानले होते. या संतांची माहिती व पुरावे त्यांच्याकडूनच आम्हाला उपलब्ध झाले होते. पुराव्याधारित इतिहास लेखणाची परंपरा त्यांनी बळकट केली.
राजेंद्र घोरपडे, संपादक, इये मराठीचिये नगरी
तुळजापूर : मराठवाडा साहित्य परिषद, शाखा तुळजापूर यांच्या वतीने 'जागर साहित्य पुरस्कार' जाहीर करण्यात आला…
स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी भाग - ६ एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या प्रवासातील तेंगबोचेकडे जाणारा टप्पा म्हणजे हिमालयाच्या…
सहारा म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते अंतहीन वाळूचं साम्राज्य. पण याच वाळवंटाच्या मध्यभागी हिरवाईने…
"योग्य वेळ" येण्याची वाट पाहत आयुष्य पुढे ढकलणाऱ्या प्रत्येक माणसासाठी ज्ञानेश्वर माऊलींची ही ओवी जागृतीचा…
तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…
स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…