Dark storm clouds over Vidarbha with a possibility of hailstorm and rain, depicting severe weather conditions.
आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.
माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.
माणिकराव खुळे – विदर्भातील अकरा जिल्ह्यात आज गुरुवार ते रविवार दि. २० ते २३ मार्च दरम्यानच्या चार दिवसात अवकाळी वातावरणाचा परिणाम जाणवेल, असे वाटते.
विशेषतः विदर्भातील अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ तसेंच मराठवाड्यातील नांदेड अश्या आठ जिल्ह्यात गुरुवार ते शनिवार दि. २० ते २२ मार्च दरम्यान अवकाळी बरोबर गारपीट होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
माणिकराव खुळे – मध्य महाराष्ट्रातील खानदेश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात सध्या जरी अवकाळीचा परिणाम नसला तरी रविवार दि. २३ ते मंगळवार दि. २५ मार्च दरम्यानच्या तीन दिवस ढगाळ वातावरणच राहून झालाच तर अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
पावसापेक्षा विजा, वारा व गडगडाटी सारख्या अवकाळी वातावरणाची शक्यता अधिक जाणवते. गारपीटीची शक्यता मात्र ह्या १० जिल्ह्यात जाणवणार नाही, असे वाटते.
माणिकराव खुळे – आज दि. २० ते २४ मार्च दरम्यानच्या पाच दिवसात, कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात दिवसाच्या दुपारच्या कमाल तापमानात काहीशी घट होवून तापमान सध्यापेक्षा २-३ डिग्रीने कमाल तापमान घटण्याची शक्यता असुन महाराष्ट्रात कोठेही सध्या उष्णतेच्या लाटेची शक्यता नाही.
मुंबईसह कोकणातील सात जिल्ह्यात मात्र सध्या असलेल्या तापमानात विशेष बदल न होता, कायम राहील,
असे वाटते.
माणिकराव खुळे – बंगालचा उपसागारातील ९०० मीटर उंचीपर्यंतच्या प्रत्यावर्ती चक्रीय वारे व म. प्रदेशाच्या नैरूक्त भागात १५०० मीटर उंचीपर्यंतच्या आवर्ती चक्रीय वारे अश्या दोन्हीही वाऱ्यांचा विदर्भादरम्यान होणाऱ्या संगमातून ऊबदार बाष्पाचा अवकाशात उरध्वगमन होवून उंचावरील थंडाव्यातून सांद्रीभवनातून उष्णतेच्या संवहनी क्रियेद्वारे अवकाळी पाऊस व गारपीटीची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबई : लेखक डॉ. मिलिंद न. जोशी यांच्या चार नव्या पुस्तकांचा अनौपचारिक प्रकाशन सोहळा विलेपार्ले…
ॲड. देवदत्त परुळेकर लिखित 'आजच्या काळासाठी तुकाराम' ग्रंथावर परिसंवाद कणकवली - काळ नेहमीच वाईट असतो,…
२ ऑगस्ट रोजी ऑफलाइन होणार सामायिक प्रवेश परीक्षा मुंबई : राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था…
मानवतेचा नवा आराखडा "इतिहास म्हणजे केवळ काळाच्या उदरात गडप झालेल्या घटनांचा पडसाद नसून, तो भविष्यासाठी…
आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर…
ज्ञानेश्वर माऊलींच्या नवव्या अध्यायातील ही ओवी भक्तीचा अत्यंत गूढ पण सहज आचरणात आणता येणारा मार्ग…